शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

मुस्लिमांविरुद्ध दहशतवादाचे खोटे आरोप चिंतेचा विषय - सदानंद गौडा

By admin | Updated: June 1, 2016 08:48 IST

केंद्रीय कायदा मंत्री सदानंद गौडा यांनी मुस्लिम तरुणांवर केले जाणारे दहशतवादाचे खोटे आरोप आणि त्यानंतर पुराव्यांच्या कमतरतेमुळे होणारी निर्दोष मुक्तता हा चिंतेचा विषय असल्याचं म्हटलं आहे

ऑनलाइन लोकमत - 
अलिगड, दि. 01 - मुस्लिमांसाठी नेहमी चिंतेचा राहिलेल्या विषयावर केंद्रीय कायदा मंत्री सदानंद गौडा यांनी भाष्य करत मुस्लिम तरुणांवर केले जाणारे दहशतवादाचे खोटे आरोप आणि त्यानंतर पुराव्यांच्या कमतरतेमुळे होणारी निर्दोष मुक्तता हा चिंतेचा विषय असल्याचं म्हटलं आहे. अशा प्रकारच्या प्रकरणांना हाताळण्यासाठी नवीन कायदेशीर सुधारणा करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली आहे. 
 
नरेंद्र मोदी सरकारच्या दुस-या वर्षपुर्तीनिमित्त आयोजित 'विकास पर्व' कार्यक्रमात बोलताना सदानंद गौडा यांनी हे वक्तव्य केलं आहे. 'दहशतवादांच्या प्रकरणात खोट्या आरोपांखाली मुस्लिम तरुणांना अटक करणे चिंतेचा विषय आहे. आम्ही बदल आणण्याचा विचार करत आहोत. कायदेशीर प्रक्रिया, जामीन, फिर्यादी त्रुटींमध्ये सुधारणा आणण्यासाठी कायदा आयोग काम करत आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश या पॅनलचं नेतृत्व करत असून कायदेशीर तज्ञांच्या सहाय्याने अहवाल तयार केला जात आहे', अशी माहिती सदानंद गौडा यांनी दिली आहे.
 
 
खोट्या आरोपांखाली अटक झाल्याने अनेक मुस्लिम तरुणांना आपलं सुरुवातीचं आयुष्य कारागृहात घालवावं लागलं आहे. कारागृहातून सुटका झाल्यानंतर बदललेल्या जगात आपलं अस्तित्व उभं करणं त्यांना कठीण जातं. 
 
काही दिवसांपुर्वी बाबरी प्रकरणात निसारुद्दीन अहमदची तब्बल 23 वर्षानंतर जयपूरच्या कारागृहातून सुटका झाली होती. निसारुद्दीन अहमदव्यतिरिक्त अन्य जणांचीही सुटका करण्यात आली होती. मोहम्मद आमीरविरोधात केलेल्या 19  आरोपांपैकी 17 आरोपांतून त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. मात्र तोपर्यंत त्याने 14 वर्षांची शिक्षा भोगली होती. 1996-9 दरम्यान 10 महिन्यात दिल्ली, रोहतक, पानीपत, गाझियाबादमध्ये 20 कमी तीव्रतेचे स्फोट करण्याचा कट केल्याचा त्याच्यावर आरोप लावण्यात आला होता. 
 
 
गेल्या काही काळात अशा अनेक घटना पाहायला मिळतात जेथे अटक केलेल्या मुस्लिम तरुणांविरोधात पुरावे नसल्याने त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. हरकत-उल-जिहाद-अल-इस्लमाचे दहशतवादी असल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या 6 तरुणांची लखनऊच्या विशेष न्यायालयाने पुराव्याअभावी सुटका केली होती. मुंबई पोलिसांनी 2006 मध्ये दहशतवादाच्या आरोपाखाली अटक केलेल्या 5 मुस्लिम तरुणांचीही यावर्षी सुटका करण्यात आली. हिजबूल मुजाहिद्दीनचा ऑपरेटीव्ह असल्याच्या संशयावरुन अटक करण्यात आलेल्या गुलजार अहमद बानीची स्थानिक न्यायालयाने पुरावा नसल्याने सुटका केली होती. 2001 पासून गुलजार अहमद बानी कारागृहात शिक्षा भोगत होता.