शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
2
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
3
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
4
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
5
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
6
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
7
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
8
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
9
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
10
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
11
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
12
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
13
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
14
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
15
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
16
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
17
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
18
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
19
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
20
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
Daily Top 2Weekly Top 5

मुस्लिमांविरुद्ध दहशतवादाचे खोटे आरोप चिंतेचा विषय - सदानंद गौडा

By admin | Updated: June 1, 2016 08:48 IST

केंद्रीय कायदा मंत्री सदानंद गौडा यांनी मुस्लिम तरुणांवर केले जाणारे दहशतवादाचे खोटे आरोप आणि त्यानंतर पुराव्यांच्या कमतरतेमुळे होणारी निर्दोष मुक्तता हा चिंतेचा विषय असल्याचं म्हटलं आहे

ऑनलाइन लोकमत - 
अलिगड, दि. 01 - मुस्लिमांसाठी नेहमी चिंतेचा राहिलेल्या विषयावर केंद्रीय कायदा मंत्री सदानंद गौडा यांनी भाष्य करत मुस्लिम तरुणांवर केले जाणारे दहशतवादाचे खोटे आरोप आणि त्यानंतर पुराव्यांच्या कमतरतेमुळे होणारी निर्दोष मुक्तता हा चिंतेचा विषय असल्याचं म्हटलं आहे. अशा प्रकारच्या प्रकरणांना हाताळण्यासाठी नवीन कायदेशीर सुधारणा करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली आहे. 
 
नरेंद्र मोदी सरकारच्या दुस-या वर्षपुर्तीनिमित्त आयोजित 'विकास पर्व' कार्यक्रमात बोलताना सदानंद गौडा यांनी हे वक्तव्य केलं आहे. 'दहशतवादांच्या प्रकरणात खोट्या आरोपांखाली मुस्लिम तरुणांना अटक करणे चिंतेचा विषय आहे. आम्ही बदल आणण्याचा विचार करत आहोत. कायदेशीर प्रक्रिया, जामीन, फिर्यादी त्रुटींमध्ये सुधारणा आणण्यासाठी कायदा आयोग काम करत आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश या पॅनलचं नेतृत्व करत असून कायदेशीर तज्ञांच्या सहाय्याने अहवाल तयार केला जात आहे', अशी माहिती सदानंद गौडा यांनी दिली आहे.
 
 
खोट्या आरोपांखाली अटक झाल्याने अनेक मुस्लिम तरुणांना आपलं सुरुवातीचं आयुष्य कारागृहात घालवावं लागलं आहे. कारागृहातून सुटका झाल्यानंतर बदललेल्या जगात आपलं अस्तित्व उभं करणं त्यांना कठीण जातं. 
 
काही दिवसांपुर्वी बाबरी प्रकरणात निसारुद्दीन अहमदची तब्बल 23 वर्षानंतर जयपूरच्या कारागृहातून सुटका झाली होती. निसारुद्दीन अहमदव्यतिरिक्त अन्य जणांचीही सुटका करण्यात आली होती. मोहम्मद आमीरविरोधात केलेल्या 19  आरोपांपैकी 17 आरोपांतून त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. मात्र तोपर्यंत त्याने 14 वर्षांची शिक्षा भोगली होती. 1996-9 दरम्यान 10 महिन्यात दिल्ली, रोहतक, पानीपत, गाझियाबादमध्ये 20 कमी तीव्रतेचे स्फोट करण्याचा कट केल्याचा त्याच्यावर आरोप लावण्यात आला होता. 
 
 
गेल्या काही काळात अशा अनेक घटना पाहायला मिळतात जेथे अटक केलेल्या मुस्लिम तरुणांविरोधात पुरावे नसल्याने त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. हरकत-उल-जिहाद-अल-इस्लमाचे दहशतवादी असल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या 6 तरुणांची लखनऊच्या विशेष न्यायालयाने पुराव्याअभावी सुटका केली होती. मुंबई पोलिसांनी 2006 मध्ये दहशतवादाच्या आरोपाखाली अटक केलेल्या 5 मुस्लिम तरुणांचीही यावर्षी सुटका करण्यात आली. हिजबूल मुजाहिद्दीनचा ऑपरेटीव्ह असल्याच्या संशयावरुन अटक करण्यात आलेल्या गुलजार अहमद बानीची स्थानिक न्यायालयाने पुरावा नसल्याने सुटका केली होती. 2001 पासून गुलजार अहमद बानी कारागृहात शिक्षा भोगत होता.