शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
4
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
7
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
8
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
9
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
10
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
11
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
12
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
13
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
14
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
15
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
16
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
17
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
18
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
19
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
20
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
Daily Top 2Weekly Top 5

मुस्लिमांविरुद्ध दहशतवादाचे खोटे आरोप चिंतेचा विषय - सदानंद गौडा

By admin | Updated: June 1, 2016 08:48 IST

केंद्रीय कायदा मंत्री सदानंद गौडा यांनी मुस्लिम तरुणांवर केले जाणारे दहशतवादाचे खोटे आरोप आणि त्यानंतर पुराव्यांच्या कमतरतेमुळे होणारी निर्दोष मुक्तता हा चिंतेचा विषय असल्याचं म्हटलं आहे

ऑनलाइन लोकमत - 
अलिगड, दि. 01 - मुस्लिमांसाठी नेहमी चिंतेचा राहिलेल्या विषयावर केंद्रीय कायदा मंत्री सदानंद गौडा यांनी भाष्य करत मुस्लिम तरुणांवर केले जाणारे दहशतवादाचे खोटे आरोप आणि त्यानंतर पुराव्यांच्या कमतरतेमुळे होणारी निर्दोष मुक्तता हा चिंतेचा विषय असल्याचं म्हटलं आहे. अशा प्रकारच्या प्रकरणांना हाताळण्यासाठी नवीन कायदेशीर सुधारणा करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली आहे. 
 
नरेंद्र मोदी सरकारच्या दुस-या वर्षपुर्तीनिमित्त आयोजित 'विकास पर्व' कार्यक्रमात बोलताना सदानंद गौडा यांनी हे वक्तव्य केलं आहे. 'दहशतवादांच्या प्रकरणात खोट्या आरोपांखाली मुस्लिम तरुणांना अटक करणे चिंतेचा विषय आहे. आम्ही बदल आणण्याचा विचार करत आहोत. कायदेशीर प्रक्रिया, जामीन, फिर्यादी त्रुटींमध्ये सुधारणा आणण्यासाठी कायदा आयोग काम करत आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश या पॅनलचं नेतृत्व करत असून कायदेशीर तज्ञांच्या सहाय्याने अहवाल तयार केला जात आहे', अशी माहिती सदानंद गौडा यांनी दिली आहे.
 
 
खोट्या आरोपांखाली अटक झाल्याने अनेक मुस्लिम तरुणांना आपलं सुरुवातीचं आयुष्य कारागृहात घालवावं लागलं आहे. कारागृहातून सुटका झाल्यानंतर बदललेल्या जगात आपलं अस्तित्व उभं करणं त्यांना कठीण जातं. 
 
काही दिवसांपुर्वी बाबरी प्रकरणात निसारुद्दीन अहमदची तब्बल 23 वर्षानंतर जयपूरच्या कारागृहातून सुटका झाली होती. निसारुद्दीन अहमदव्यतिरिक्त अन्य जणांचीही सुटका करण्यात आली होती. मोहम्मद आमीरविरोधात केलेल्या 19  आरोपांपैकी 17 आरोपांतून त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. मात्र तोपर्यंत त्याने 14 वर्षांची शिक्षा भोगली होती. 1996-9 दरम्यान 10 महिन्यात दिल्ली, रोहतक, पानीपत, गाझियाबादमध्ये 20 कमी तीव्रतेचे स्फोट करण्याचा कट केल्याचा त्याच्यावर आरोप लावण्यात आला होता. 
 
 
गेल्या काही काळात अशा अनेक घटना पाहायला मिळतात जेथे अटक केलेल्या मुस्लिम तरुणांविरोधात पुरावे नसल्याने त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. हरकत-उल-जिहाद-अल-इस्लमाचे दहशतवादी असल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या 6 तरुणांची लखनऊच्या विशेष न्यायालयाने पुराव्याअभावी सुटका केली होती. मुंबई पोलिसांनी 2006 मध्ये दहशतवादाच्या आरोपाखाली अटक केलेल्या 5 मुस्लिम तरुणांचीही यावर्षी सुटका करण्यात आली. हिजबूल मुजाहिद्दीनचा ऑपरेटीव्ह असल्याच्या संशयावरुन अटक करण्यात आलेल्या गुलजार अहमद बानीची स्थानिक न्यायालयाने पुरावा नसल्याने सुटका केली होती. 2001 पासून गुलजार अहमद बानी कारागृहात शिक्षा भोगत होता.