शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर भाजपाच्या नेत्यांना विचारूनच राष्ट्रवादीचे विलिनीकरण”; अजितदादांच्या नेत्यांचे विधान
2
रश्मी वहिनींसह उद्धव ठाकरे पोहोचले संजय राऊतांच्या घरी; नेमके कारण काय? चर्चांना उधाण
3
शाळा बंद करण्यापेक्षा मदरसे बंद करून दाखवा; मंत्री नितेश राणेंचं राज ठाकरेंना आव्हान
4
२ मुख्यमंत्र्यांना अटक करून चर्चेत आलेले ईडीमधील दिग्गज अधिकाऱ्याने अचानक का दिला राजीनामा?
5
Reliance Q1 Results: ही आहे मुकेश अंबानींची जादू; ३ महिन्यांत केली २६,९९४ कोटी रुपयांची कमाई, जाणून घ्या
6
Changur Baba : २२ बँक खाती, ६० कोटींचा व्यवहार... मुंबई ते पनामा मनी लाँड्रिंग नेटवर्क; छांगुर बाबा प्रकरणात मोठा खुलासा
7
अलर्ट! चप्पलचीही असते एक्सपायरी डेट; 'ही' लक्षणं दिसताच ताबडतोब बदला अन्यथा होईल पश्चाताप
8
Lunchbox recipe: मुलं पालकाची भाजी खात नाहीत? डब्यात द्या टेस्टी पालक पुडला; दोनाऐवजी चार खातील
9
धक्कादायक! ठाण्यात रेल्वे प्लॅटफॉर्मवर महिलेवर बलात्काराचा प्रयत्न, विरोध करताच मालगाडीसमोर ढकललं
10
ऋतुराज गायकवाडनं चांगली संधी गमावली! आयत्या वेळी इंग्लंडला न जाण्याचा निर्णय घेत संघाला दिला धक्का
11
मुलींसाठी पार्टनरने घेतली होती खेळणी, पण रशियन महिलेची भेटच झाली नाही; गुहेतील कुटुंबाबत नवी माहिती
12
'अशी ही बनवाबनवी'चं शूटिंग झालेलं या ठिकाणी, लीलाबाई काळभोर यांचा बंगला आहे तरी कुठे?, जाणून घ्या
13
या देशात दोन भारतीय नागरिकांची हत्या, एकाचे दहशतवाद्यांनी अपहरण केले; दूतावास अ‍ॅक्शनमोडवर
14
अतूट नातं! "पतीची सेवा करणं हेच..."; पाठीवर घेऊन पत्नीने पूर्ण केली १५० किमीची कावड यात्रा
15
Video: संयुक्त राष्ट्राच्या कार्यक्रमात खणखणीत मराठीत भाषण; वर्षा देशपांडे यांचं होतंय कौतुक
16
मुंबईच्या रस्त्यांवरुन Ola-Uber आणि Rapido का आहेत गायब? जाणून घ्या का सुरुये बेमुदत संप
17
Asia Cup 2025 : आशिया कप स्पर्धेसंदर्भातील बैठकीला जाण्यास BCCI नाही तयार, कारण...
18
“राज ठाकरे यांचे आव्हान दुबेला नाही, तर भाजपाला; आम्ही १०० टक्के एकत्र आहोत”: संजय राऊत
19
ठाकरे ब्रॅँड बाजारात चालत नाही, जनतेला आवडत नाही; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
20
पक्षातून मोठ्या प्रमाणात आऊटगोइंग सुरू आहे, त्याला उपाय काय? उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले

लोकसभा अधिवेशनाला मुदतवाढ म्हणजे हुकूमशाही

By admin | Updated: May 9, 2015 05:31 IST

लोकसभा अधिवेशनाचा कार्यकाळ आणखी तीन दिवसांसाठी वाढविण्याच्या निर्णयाचा जोरदार विरोध करीत समस्त विरोधकांनी सरकारवर हल्लाबोल केला

नवी दिल्ली : लोकसभा अधिवेशनाचा कार्यकाळ आणखी तीन दिवसांसाठी वाढविण्याच्या निर्णयाचा जोरदार विरोध करीत समस्त विरोधकांनी सरकारवर हल्लाबोल केला. हा निर्णय ‘हुकूमशाही’ प्रवृत्तीचा असल्याचे विरोधक म्हणाले, तर संसदेऐवजी मीडियातून याबद्दलची माहिती मिळाल्याबद्दल सदस्यांनी तीव्र आक्षेप घेतला.या आधीच्या परंपरेप्रमाणेच हा निर्णय घेण्यात आला; परंतु राज्यसभेची बैठक गुरुवारी रात्री उशिरापर्यंत सुरू राहिल्याने आणि संसदीय कामकाजमंत्री एम. वेंकय्या नायडूंसह अन्य अनेक मंत्री राज्यसभेत व्यग्र असल्याकारणाने काही पक्षांच्या नेत्यांना हा निर्णय कळविता आला नाही, अशी सारवासारव करीत सरकारने विरोधकांची टीका फेटाळली. काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि डाव्या आघाडीच्या सदस्यांनी लोकसभा अधिवेशनाची मुदत वाढविण्याच्या निर्णयाला जोरदार विरोध केला. या पक्षांच्या सदस्यांसोबतच अन्य पक्षांचे सदस्यही हौदात गोळा झाले आणि सरकारविरोधी घोषणा देऊ लागले. या गदारोळामुळे कामकाज तीनदा तहकूब करण्यात आले. ‘तानाशाही नही चलेगी’ आणि ‘मोदी सरकार जबाब दो’ अशा घोषणांनी सभागृह दणाणून गेले होते. निर्णय घेताना आपल्याशी संपर्क साधला गेला नाही, असा विरोधकांचा आक्षेप होता.लोकसभा अधिवेशनाची मुदत तीन दिवसांसाठी वाढविण्याच्या सरकारच्या निर्णयाला कामकाज सल्लागार कमिटीने मंजुरी दिल्यानंतर; लोकसभेची बैठक १३ मेपर्यंत वाढविण्यात आल्याचे अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी जाहीर केले आणि सभागृहात गदारोळ सुरू झाला. शून्य प्रहरात हा मुद्दा उपस्थित करण्याची अनुमती महाजन यांनी विरोधकांना दिली. (लोकमत न्यूज नेटवर्क)