शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्यांच्याकडे काहीच नाही, त्यांच्याकडे संविधानाची गॅरंटी आहे"; नामिबियात PM मोदींच्या भाषणाला स्टँडिंग ओव्हेशन
2
संजय गायकवाडांचा कँटिनमध्ये राडा; अन्न आणि औषध प्रशासनाची अजंता केटरर्सवर मोठी कारवाई
3
ट्रम्प यांनी पुन्हा फोडला टॅरिफ बॉम्ब...! इराक, फिलिपिन्ससह 'या' 6 देशांना बसणार फटका
4
'डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कधीही होऊ शकतो 'ड्रोन हल्ला', खामेनेई यांच्या जवळच्या माणसाची अमेरिकेला खुली धमकी!
5
कुणाचा तरी राग माझ्यावर का काढता? अर्थसंकल्प कशाला मांडता म्हणणाऱ्या जाधवांना अजितदादांचे प्रत्युत्तर
6
"...तर मॉस्को अन् बिजिंग बॉम्बनं उडवेन!" ट्रम्प यांची पुतीन-जिनपिंग यांना खुली धमकी? 'ऑडिओ' लीक!
7
"गौतम गंभीरला काहीही बोलू नका; भारत मालिका हरला तरीही..."; योगराज सिंह यांनी कुणाला ठणकावलं?
8
“...तर राज्याच्या साधनसंपत्तीत भर, आर्थिक शिस्तीचे पालन करीतच अर्थकारभार”: DCM अजित पवार
9
युतीबाबत न बोलण्याचे राज ठाकरेंचे स्पष्ट आदेश, उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
10
"मराठी अस्मिता जपली पाहिजे पण..."; भाषेच्या वादात जान्हवी कपूरची उडी; बॉयफ्रेंड शिखर पहारियाची पोस्ट केली शेअर
11
सावधान! हे अ‍ॅप तुमच्या हॉट्स अ‍ॅपचे मेसेज वाचू शकते, आताच सेटिंग्स बदला
12
अकोल्यात तरुणीवर कारमध्ये अत्याचाराचा प्रयत्न, आराेपीच्या गुप्तांगावर लाथ मारत करून घेतली स्वतःची सुटका
13
ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले...
14
शाळेत शिकणारी मुलगी प्रेगनंट राहिल्यास १ लाख रुपये मिळणार; रशियाच्या या योजनेची होतेय चर्चा
15
मीरारोडचे पोलीस आयुक्त मधुकर पांडेंची बदली; मराठी मोर्चाला परवानगी नाकारल्याने मुख्यमंत्रीही वैतागले
16
पुन्हा रॉकेट बनला MRF चा शेअर, गेला ₹ 150000 पार; लोकांना केलं मालामाल! दिला बंपर परतावा
17
“महाराष्ट्रातील मतचोरीचा पॅटर्न बिहारमध्ये वापरायचा भाजपा, निवडणूक आयोगाचा प्रयत्न”: सपकाळ
18
"आमच्यावर आरोप केला जातो, शिवसेनेने मराठी माणसासाठी काय केलं? माझं सरकार यांनी पाडलं नसतं तर...! काय म्हणाले उद्धव ठाकरे?
19
रामललांसाठी आणखी एक अस्सल सागवानी लाकडाचे खास भव्य मंदिर बनणार; अयोध्येत कुठे बांधले जाणार?
20
Maruti Suzuki ते Mahindra..; जगातील सर्वात श्रीमंत कार कंपन्यांमध्ये भारतीय कंपन्यांचा दबदबा

३,७७० कोटींचा काळा पैसा उघड

By admin | Updated: October 1, 2015 22:37 IST

काळा पैसा स्वेच्छेने घोषित करण्यासाठी सरकारने एकदाच अटीपालन सुविधा (कम्प्लायन्स विंडो) उपलब्ध केल्यानंतर ६३८ अर्जांमधून विदेशात असलेली ३,७७० कोटी रुपयांची मालमत्ता उघड झाली आहे

नवी दिल्ली : काळा पैसा स्वेच्छेने घोषित करण्यासाठी सरकारने एकदाच अटीपालन सुविधा (कम्प्लायन्स विंडो) उपलब्ध केल्यानंतर ६३८ अर्जांमधून विदेशात असलेली ३,७७० कोटी रुपयांची मालमत्ता उघड झाली आहे. या योजनेची बुधवारपर्यंत मुदत होती. तथापि, ही संपत्ती घोषित होताच राजकीय वाद उफाळला आहे.या योजनेंतर्गत ६३८ अर्ज आले असून एकूण ३,७७० कोटींची विदेशी मालमत्ता उघड करण्यात आली. ही आकडेवारी अंतिम नसून त्यात बदल होऊ शकतो, असे अर्थमंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे. अशी संपत्ती घोषित करणाऱ्यांना ३१ डिसेंबर २०१५ पर्यंत ३० टक्के दराने कर द्यावा लागेल. या मुदतीपर्यंत विदेशी संपत्ती घोषित न करणाऱ्यांवर सरकार कारवाई सुरू करणार असल्याचे संकेतही सरकारने दिले आहेत. सरकारने आकडेवारी जाहीर करताच राजकीय पक्षांनी तीव्र प्रतिक्रिया देत हल्ला सुरू केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळा पैसा परत आणण्याचे दिलेले आश्वासन कसे पोकळ ठरले ते संपूर्ण देशासमोर उघड झाले आहे, असे काँग्रेसने म्हटले. जेटलींचा खुलासा काँग्रेसच्या आरोपांवर पाटण्यात प्रतिक्रिया देताना अर्थमंत्री अरुण जेटली यांनी ‘कम्प्लायन्स विंडो’ योजनेंतर्गत ३,७७० कोटी रुपयांची विदेशी मालमत्ता घोषित झाल्याचे सांगत मोदींनी उल्लेखिलेला ६,५०० कोटींचा आकडा वेगळा असल्याचे स्पष्ट केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वातंत्र्यदिनी खोटे बोलले असे काँग्रेसने म्हटले आहे. आधी या पक्षाने आकडेवारी समजून घ्यावी. या पक्षाला ते समजून घेता आलेले नाही. लाल किल्ल्यावरून बोलताना मोदींनी वेगळ्या संदर्भात आकडेवारी दिली होती, असे ते म्हणाले. (लोकमत न्यूज नेटवर्क)-----------काळ्या पैशासंबंधी नव्या कायद्यानुसार ६,५०० कोटींची विदेशी मालमत्ता उघड झाल्याचा दावा मोदींनी स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून भाषण देताना केला होता. विदेशात ८० लाख कोटी रुपये एवढा काळा पैसा असून, आम्ही सत्तेवर येताच शंभर दिवसांत तो परत आणू. देशातील प्रत्येकाच्या खात्यात त्यातील १५ लाख रुपये जमा केले जातील, अशी घोषणा मोदींनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळी केली होती, याकडे काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सूर्जेवाला यांनी लक्ष वेधले. काळ्या पैशासंबंधी विधेयक पारित होऊन येऊन १६ महिने उलटले असताना सरकारने केवळ ३,७७० कोटी रुपयांचा आकडा दिला आहे. भाजपचे अध्यक्ष राजनाथसिंह यांनीही असाच दावा केला होता, असे ते म्हणाले.