शहरं
Join us  
Trending Stories
1
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
2
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
3
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा वापर ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
4
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
5
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
6
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
7
समसप्तक नीचभंग राजयोग: ९ राशींना सुवर्ण काळ, अडकलेले पैसे मिळतील; शेअर बाजारात नफा, शुभ-लाभ!
8
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
9
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
10
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
11
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
12
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी
13
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
14
भारताने केलेला ड्रोन हल्ला का रोखला नाही? पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचं संसदेत अजब उत्तर, म्हणाले...  
15
Jalgaon Accident: भरधाव टिप्परची दुचाकीला धडक; आजी- आजोबांच्या डोळ्यांदेखत दोन नातवंडांचा मृत्यू
16
अक्षय केळकरनं १० वर्षांच्या रिलेशनशिपनंतर 'रमा'सोबत थाटला संसार, पहिला फोटो आला समोर
17
भारत-पाक संघर्षादरम्यान 'या' ड्रोन उत्पादक कंपनीच्या शेअर्सला अपर सर्कीट; तुमच्याकडे आहे का?
18
“भविष्यात STच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर, डिझेलच्या पर्यायांचा विचार आवश्यक”: सरनाईक
19
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
20
Mumbai: पिझ्झा देण्याच्या बहाण्याने घरी नेले आणि...; आठ वर्षाच्या चिमुकलीसोबत शेजाऱ्याचे संतापजनक कृत्य

आगामी वर्षात २.८० लाख नव्या केंद्रीय नोकऱ्या अपेक्षित

By admin | Updated: March 3, 2017 04:22 IST

आगामी वित्तीय वर्षात केंद्र सरकारच्या विविध खात्यांमध्ये २.८० लाख नव्या नोकऱ्या उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

नवी दिल्ली : वित्तमंत्री अरुण जेटली यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पाच्या सहपत्रांमध्ये दिलेल्या माहितीनुसार, आगामी वित्तीय वर्षात केंद्र सरकारच्या विविध खात्यांमध्ये २.८० लाख नव्या नोकऱ्या उपलब्ध होण्याची शक्यता आहे. प्राप्तिकर, केंद्रीय सीमाशुल्क, पोलीस या खात्यांत अधिक नोकऱ्या निर्माण होणार आहेत.या सहपत्रांपैकी एक सहपत्र केंद्र सरकारच्या विविध खात्यांमधील सध्याची व आगामी वर्षातील अपेक्षित कर्मचारी संख्या दर्शविणारे आहे. यानुसार अपेक्षित असलेली सर्व नव्या कर्मचाऱ्यांची भरती आगामी वर्षात केली जाईलच, याची खात्री नाही. परंतु संबंधित खात्याला तेवढ्या जास्त कर्मचाऱ्यांची गरज आहे व त्यानुसार अर्थसंकल्पात तरतूद केली गेली आहे, असे यावरून सूचित होते. (लोकमत न्यूज नेटवर्क)>प्राप्तिकर विभागात सर्वाधिक भरतीनोटाबंदीनंतर काळ्या पैशाविरुद्ध मोहीम राबविण्याची जबाबदारी असलेल्या प्राप्तिकर विभागात यापैकी सर्वाधिक नवे कर्मचारी घेतले जाणे अपेक्षित आहे. या विभागाची कर्मचारीसंख्या सध्याच्या ४६ हजारांवरून वाढून मार्च २०१८पर्यंत ८० हजारांवर पोहोचेल, असे गृहीत धरण्यात आले आहे.केंद्रीय उत्पादन शुल्क आणि सीमाशुल्क विभागात नव्या कर्मचाऱ्यांची भरती होणे अपेक्षित आहे. या विभागात सध्या ५०,६०० कर्मचारी काम करतात. त्यात आगामी वर्षात ४१ हजारांनी वाढ होऊन कर्मचारीसंख्या ९१,७००वर पोहोचेल, असे गृहीत धरण्यात आले आहे.२००६ मध्येही सरकारने १.८८ लाख नव्या कर्मचाऱ्यांची भरती करण्याच्या अपेक्षेने अर्थसंकल्पात तरतूद केली होती. परंतु प्राप्तिकर, केंद्रीय उत्पादन शुल्क आणि पोलीस या तीन विभागांमध्ये त्याप्रमाणात नवी भरती झाली नाही. परिणामी, निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या नव्या येणाऱ्या कर्मचाऱ्यांहून जास्त झाल्याने या विभागांची एकूण कर्मचारी संख्या सन २०१५च्या तुलनेने २१ हजाराने रोडावली होती.1.88 लाख नव्या कर्मचाऱ्यांची भरती करण्याच्या अपेक्षेने अर्थसंकल्पात तरतूद केली होती.>इतर काही अपेक्षित नोकऱ्यापरराष्ट्र मंत्रालय 2000(सध्या 9,294)माहिती व प्रसारण 2,246(सध्या 4,012)कॅबिनेट सचिवालय287(सध्या 1,218)