शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
3
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
4
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
5
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
6
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
7
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
8
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
9
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
10
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
11
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
12
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
13
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
14
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
15
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
16
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
17
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
18
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
19
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
20
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या

प्रत्येक तीन महिन्याला केंद्र देणार कराचा वाटा, अनेक राज्ये अडचणीत!, पद्धतीत बदल, निधीच्या चणचणीची धास्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2017 01:58 IST

केंद्रीय करांमधील राज्यांचा वाटा त्यांना देण्याच्या पद्धतीत केंद्र सरकारने बदल केला असून आता राज्यांना ही रक्कम दरमहा न देता दर तिमाहीला देण्यात येणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : केंद्रीय करांमधील राज्यांचा वाटा त्यांना देण्याच्या पद्धतीत केंद्र सरकारने बदल केला असून आता राज्यांना ही रक्कम दरमहा न देता दर तिमाहीला देण्यात येणार आहे. आर्थिक स्थिती तोळामासा असलेल्या अनेक राज्यांना यामुळे निधीची चणचण भासण्याची धास्ती निर्माण झाली आहे.दि. १६ आॅगस्ट रोजी केंद्र सरकारने राज्यांना पत्र लिहून असे कळविले की, केंद्रीय करांमधील वाट्याची रक्कम येत्या मार्चअखेरपर्यंत प्रत्येक महिन्याच्या १५ तारखेला दिली जाईल. त्यानंतर ही रक्कम प्रत्येक तिमाहीला दिली जाईल.सध्याच्या व्यवस्थेनुसार केंद्र सरकार केंद्रीय करांच्या वसुलीतून जमा होणाºया रकमेपैकी ४२ टक्के रक्कम प्रत्येक महिन्याच्या एकतारखेला राज्यांना देते. त्यामुळे राज्यांना कर्मचाºयांचे पगार व पेन्शन देणे, प्रशासकीय कर्च करणे व कर्जांवरील व्याज वेळीच चुकती करणे सुलभ होते.या पद्धतीत बदल करण्याचे कारण विषद करताना केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाºयाने सांगितले की, नवे वित्तीय सुरु झाले की, सुरुवातीचे काही महिने करांची वसुली फारशी होत नाही. त्यामुळे राज्यांना द्यायची रक्कम भागविण्यासाठी केंद्र सरकारला अनेक वेळा उधार उसनवारी करावी लागतअसे. त्यामुळे या पद्धतीत थोडा बदल केल्याने केंद्राला थोडा अवधी मिळेल व नव्या ‘जीएसटी’ व्यवस्थेत करवसुली कशी व किती होते याचा नेमका अंदाजही घेता येऊ शकेल.हा अधिकारी म्हणाला की, ‘जीएसटी’ची नवी पद्धत लागू झाल्याने सुरुवातीचे काही महिने अपेक्षेएवढा महसूल मिळेल याविषयी अनिश्चितता आहे. त्यामुळे राज्यांना त्यांच्या वाट्याची रक्कम चुकती करण्याच्या वेळापत्रकात थोडा बदल केला गेला आहे. परंतु या बदलामुळे खास करून गेल्या काही वर्षात आर्थिक शिस्त न पाळल्याने ज्या राज्यांची आर्थिक स्थिती डामाडौल झाली आहे अशा राज्यांमध्ये चिंतेची भावना निर्माण झाली आहे. रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीनुसार सन २०१५ पासून राज्यांच्या सकल वित्तीय तुटीत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे अनेक राज्यांची स्थिती हातावरचे पोट असल्यासारखी आहे.केंद्रीय करांमधील वाट्याची रक्कम अशा प्रकारे विलंबाने देण्याची नवी पद्धत अन्यायकारक असल्याची अनेक राज्यांची भावना आहे व तेलंगण व पश्चिम बंगाल या दोन राज्यांनी तर केंद्र सरकारला पत्र लिहून निषेधही नोंदविला आहे. प. बंगालचे वित्तमंत्री अमित मित्रा यांनी केंद्राला लिहिलेल्या पत्रात म्हटले की, दर महिन्याच्या सुरुवातीला राज्याच्या तिजोरीवर सर्वात मोठा भार असतो. केंद्राकडून मिळणाºया पैशांमुळे तो काही प्रमाणात हलका होतो. आता ज्या महिन्यात केंद्राकडून रक्कम मिळणार नाही त्या महिन्याच्या सुरुवातीचे खर्च भागविण्यासाठ राज्यांना पैसे उसने घ्यावे लागतील किंवा ‘ओव्हरड्राफ्ट’ घ्यावा लाहेल.राज्यांचा वाटा १० टक्के वाढला१४ व्या वित्त आयोगाच्या शिफारशी लागू केल्यानंतर केंद्रीय करांमधील राज्यांचा वाटा १० टक्क्यांनी वाढला आहे. पूर्वी एकूण करवसुलीच्या ३२ टक्के रक्कम केंद्र राज्यांना देत असे. आता ४२ टक्के देते. हे प्रमाण राज्याचा भौगोलिक आकार, लोकसंख्या व स्वत:ची उत्पन्नाची साधने यावर ठरते.

टॅग्स :TaxकरGovernmentसरकार