शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस चकमकीतील प्रत्येक मृत्यूची चौकशी

By admin | Updated: September 24, 2014 03:44 IST

यापुढे देशात पोलीस चकमकीत होणाऱ्या प्रत्येक मृत्यूचा तात्काळ गुन्हा नोंदवून दंडाधिकाऱ्यांमार्फत चौकशी करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी दिले

नवी दिल्ली : यापुढे देशात पोलीस चकमकीत होणाऱ्या प्रत्येक मृत्यूचा तात्काळ गुन्हा नोंदवून दंडाधिकाऱ्यांमार्फत चौकशी करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी दिले. तसेच झालेली चकमक बनावट नव्हे तर खरी होती असा अंतिम निष्कर्ष निघेपर्यंत त्यात भाग घेतलेल्या कोणाही पोलीस अधिकाऱ्यास वेळेआधी बढती किंवा शौर्यपदक दिले जाऊ नये, असा दंडकही न्यायालयाने घालून दिला आहे.चकमक बनावट होती असे सिद्ध झाल्यास त्यात मृृत्यू पावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबास भरपाई देणे सरकारवर बंधनकारक असेल आणि या भरपाईसाठी गुन्हेबाधितांना (व्हिक्टिम्स आॅफ क्राईम) भरपाई देण्यासाठी दंड प्रक्रिया संहितेच्या कलम ३५७-ए अन्वये ठरलेले निकष लागू होतील, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.‘पिपल्स युनियन फॉर सिव्हिल लिबर्टिज’ (पीयूसीएल)ने १९९९ मध्ये केलेली तीन अपिले व त्यानंतर याच विषयावर दाखल केल्या गेलेल्या अन्य याचिकांवर सरन्यायाधीश न्या. राजेंद्रमल लोढा व न्या. रोहिंग्टन फली नरिमन यांच्या खंडपीठाने मृत्यू होणाऱ्या प्रत्येक पोलीस चकमकीसाठी १६ कलमी कठोर मार्गदर्शिका जारी केली. न्यायालयाने हे आदेश राज्यघटनेच्या अनुच्छेद १४२ अन्वये दिले असल्याने त्या संसदेने केलेल्या कोणत्याही कायद्याएवढ्याच बंधनकारक असतील.गुन्हेगारीत अटक केलेल्या अनेक आरोपींना न्यायालयांकडून रीतसर शिक्षा होण्याआधीच पोलीस बनावट चकमकींत ठार मारत असल्याच्या तक्रारी वारंवार होत असतात. मात्र अशा चकमकींची चौकशी व तपास करण्यासाठी कायद्याच्या स्वरूपात कोणतीही मार्गदर्शिका अस्तित्वात नाही, हे लक्षात घेऊन न्यायालयाने हे आदेश दिले. बनावट पोलीस चकमकींबाबत आपले धोरण ‘झिरो टॉलरन्स’चे असेल, अशी ग्वाही मोदी सरकारने गेल्याच महिन्यात न्यायालयास दिली होती.महाराष्ट्रात १९९५ ते १९९७ या काळात ९९ पोलीस चकमकींमध्ये तब्बल १३५ व्यक्तींचा मृत्यू झाला होता व यापैकी बहुतांश चकमकी बनावट असल्याचा आरोप केला गेला होता. त्यासंदर्भात ‘पीयूसीएल’ने मुंबई उच्च न्यायालयात तीन रिट याचिका दाखल केल्या होत्या. त्यावर उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाने समाधान न झाल्याने या स्वयंसेवी संस्थेने केलेली अपिले गेली १५ वर्षे सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित होती. कालांतराने देशाच्या इतर भागांतून याच विषयावर केल्या गेलेल्या याचिका व अपिलेही त्यासोबत सुनावणीसाठी घेतली गेली. (लोकमत न्यूज नेटवर्क)