शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
6
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
7
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
8
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
9
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
10
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
11
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
14
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
15
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
16
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
17
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
18
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
19
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
20
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला

अखेर साहित्य अकादमीने मौन सोडले, कलबुर्गींच्या हत्येचा केला निषेध

By admin | Updated: October 23, 2015 14:36 IST

साहित्यिकांच्या दबावापुढे झुकत साहित्य अकादमीने कलबुर्गी हत्या व वाढत्या असहिष्णूतेचा निषेध एका विशेष सभेत ठराव संमत करून केला आहे.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २३ - अखेर, साहित्यिकांच्या दबावापुढे झुकत साहित्य अकादमीने कलबुर्गी हत्या व वाढत्या असहिष्णूतेचा निषेध एका विशेष सभेत ठराव संमत करून केला आहे. कर्नाटकातील विचारवंत साहित्यिक कलबुर्गींची हत्या आणि  दादरी हत्याकांड या घटनांचा निषेध करत अनेक साहित्यिकांनी साहित्य अकादमीचे पुरस्कार परत केले होते. तसेच, साहित्य अकादमी मौन बाळगून का आहे असा सवाल साधा निषेधही अकादमीने का केला नाही असा सवाल आंदोलक साहित्यिकांनी विचारला होता. आज, शुक्रवारी तर साहित्यिकांनी नवी दिल्लीमध्ये मौन मोर्चा काढून वाढत्या असहिष्ण वातावरणाचा निषेध केला तसेच साहित्य अकादमीच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उभे केले.
अखेर, साहित्य अकादमीने आज कार्यकारिणीची विशेष सभा बोलावली. कलबुर्गींच्या हत्येचा निषेध केला तसेच मारेक-याला लवकरात लवकर पकडण्यात यावे अशी मागणी केली. याबरोबरच ज्या साहित्यिकांनी पुरस्कार परत केले आहेत, त्यांनी ते पुन्हा स्वीकारावेत असे आवाहनही  केल्याचे अकादमीच्या के नचिमुथू यांनी सांगितले. ज्या अधिका-यांनी निषेध म्हणून अकादमी सोडली आहे, त्यांनीही पुन्हा कामावर रुजू व्हावे असे आवाहनही नचिमुथूंनी केले आहे. सभा संपल्यावर पत्रकारांशी बोलताना नचिमुथूंनी ही माहिती दिली.