शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
4
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
5
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
6
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
7
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
8
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
9
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
10
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
11
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
12
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
13
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
14
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
15
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
16
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
17
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
18
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
19
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
20
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी

दहशतवादी हल्ला करणारे मानवतेचे शत्रू - नरेंद्र मोदी

By admin | Updated: January 2, 2016 21:11 IST

पंजाबमधील हवाई दलाच्या तळावर हल्ला करणारे दहशतवादी हे मानवतेचे शत्रू असून त्यांना भारताची प्रगती झालेली पचत नसल्याचे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

ऑनलाइन लोकमत
म्हैसूर, दि. २ - पंजाबमधील हवाई दलाच्या तळावर हल्ला करणारे दहशतवादी हे मानवतेचे शत्रू असून त्यांना भारताची प्रगती झालेली पचत नसल्याचे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. 
पंजाबमधील हवाई दलाच्या तऴावर  लष्कराच्या वेषात आलेल्या काही दहशतवाद्यांनी मध्यरात्री साडेतीनच्या सुमारास हवाई दलाच्या तळावर अंदाधुंद गोळीबार करत जोरदार हल्ला चढवला. हवाई दलाच्या जवानांनीही त्यांनी चोख प्रत्युत्तर देत पाचही दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. मात्र या हल्ल्यात दोन जवान शहीद झाले तर अन्य एका जवानाचा रुग्णालयात उपचारांदरम्यान मृत्यू झाला. सुमारे १७ तासांच्या चकमकीनंतर ही मोहिम संपुष्टात आली. 
पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या कर्नाटक दौ-यावर असून म्हैसूर येथील सुत्तूर मठामध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमाच्यावेळी त्यांनी दहशतवादी कारवाई करणा-यांवर सडेतोड टिका करत जवानांचे अभिनंदन केले. दहशतवादी हे मानवतेचे शत्रू असून त्यांना भारताची प्रगती झालेली पचत नाही. असा प्रकारच्या कारवाया आमचे जवान कधीही यशस्वी होऊ देणार नाहीत. आपल्या जवानांवर मला गर्व असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.