शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor Live Updates: PM मोदींनी घेतली राष्ट्रपतींची भेट; 'ऑपरेशन सिंदूर'ची दिली माहिती
2
Operation Sindoor : पाकिस्तानमधील स्ट्राइकनंतर पीएम मोदींनी सैन्याचे कौतुक केले; कॅबिनेट बैठकीत काय झाले?
3
ऑपरेशन सिंदूरनंतर अमित शाहांनी बोलावली महत्वाची बैठक; या 9 राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित
4
Operation Sindoor: मोठी बातमी! जम्मू, अमृतसरसह देशातील ९ एअरपोर्ट १० मे पर्यंत बंद; अनेक उड्डाणं रद्द
5
मोहिनी एकादशी: श्रीविष्णू होतील प्रसन्न, ‘असे’ करा व्रत; पाहा, मुहूर्त, महात्म्य अन् मान्यता
6
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये ८ कोटींचे स्कॅल्प, ८४ लाखांचा बॉम्ब... हल्ल्यासाठी किती महागडी अस्त्र वापरली?
7
"दहशतवादाला जगात थारा नाही..."; सचिनपासून सेहवागपर्यंंत ऑपरेशन सिंदूरचं सर्वत्र कौतुक, कोण काय म्हणाले?
8
Astro Tips: बुध हा बुद्धी देणारा ग्रह, मात्र मेष आणि वृश्चिक राशीच्या बाबतीत दाखवतो वेगळेच रंग!
9
Operation Sindoor: 'आता त्यांना कुंकवाचा पराक्रम कळला असेल', अविमुक्तेश्वरानंत सरस्वतींचे विधान
10
चंद्र-केतु ग्रहण योगात मोहिनी एकादशी: ७ राशींवर लक्ष्मी नारायणाची कृपा, शुभ फले; घवघवीत यश!
11
BSNL नं आणली Mother's Day ऑफर, स्वस्त केले आपले ३ रिचार्ज प्लान्स; पाहा डिटेल्स
12
Operation Sindoor : "जे काही घडलं ते बरोबर, पहलगाममध्ये धर्म विचारणाऱ्या ४ दहशतवाद्यांचाही केला पाहिजे खात्मा"
13
विजापूरमध्ये भीषण चकमक; कर्रेगुट्टा टेकड्यांमध्ये लपलेल्या 15+ नक्षलवाद्यांचा खात्मा
14
त्यांनी महिलांना मारलं नाही पण...; पहलगाम हल्ल्याचे प्रत्यक्षदर्शी 'ऑपरेशन सिंदूर'वर काय म्हणाले?
15
Operation Sindoor: कित्येक निष्पापांचा जीव घेतला! आता स्वतःच्या कुटुंबाचा खात्मा झाल्यावर दहशतवादी मसूद अजहर म्हणतो...
16
Operation Sindoor : कठीणातल्या कठीण प्रदेशात हेलिकॉप्टर उडविण्याचा हातखंडा; हवाई दलाच्या व्योमिका सिंग, ज्यांनी ऑपरेशन सिंदूरची दिली माहिती
17
Operation Sindoor नंतर शेअर बाजाराबाबत मोठी अपडेट, BSE-NSE नं घेतला महत्त्वाचा निर्णय
18
“विना अपघात सेवा बजावणाऱ्या ST चालकांचा रोख रक्कम देऊन गौरविण्यात येणार”: प्रताप सरनाईक
19
पाकविरोधात आणखी मोठी कारवाई? गृहमंत्र्यांच्या J&Kच्या मुख्यमंत्री-नायब राज्यपालांना सूचना...
20
Kangana Ranaut : "मोदींनी त्यांना दाखवून दिलं"; 'ऑपरेशन सिंदूर' नंतर कंगना राणौतची सैन्याच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना

हटविलेल्या जागेवर पुन्हा हॉकर्सचे अतिक्रमण अतिक्रमण विभागाचा कानाडोळा : कर्मचारी संख्या वाढवूनही नियोजनाचा अभाव

By admin | Updated: February 22, 2016 19:29 IST

सोबत फोटो

सोबत फोटो

जळगाव : सवार्ेच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शहरातील प्रमुख वर्दळीच्या ११ रस्त्यांवरील हॉकर्सचे स्थलांतर करण्याचा निर्णय प्रशासनाच्याच प्रस्तावानुसार महासभेने घेतल्यानंतरही मोजक्या तीन-चार रस्त्यांवरील हॉकर्सवर कारवाई झाली असून त्याठिकाणीही पुन्हा अतिक्रमण होताना दिसत आहे. अतिक्रमण विभाग मात्र सोयीस्करपणे कानाडोळा करताना दिसत आहे.
मनपाने सवार्ेच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शहरातील ११ रस्त्यांवरील वाहतुकीला अडथळा ठरणार्‍या हॉकर्सचे स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार पर्यायी जागा शहर फेरीवाला समितीच्या बैठकीत निि›त करून महासभेत हा ठराव मंज़ूर करण्यात आला. मात्र मनपा प्रशासनाने पहिल्या टप्प्यात पाच रस्त्यांवरील स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला. त्यातही केवळ तीन ठिकाणच्याच हॉकर्सचे अतिक्रमण हटविण्यात आले. मात्र हॉकर्सनी पर्यायी जागांवर सुविधा नसल्याने जाण्यास नकार दिला. आहे त्या जागी व्यवसाय करू दिला जाणार नाही. पर्यायी जागांवर जावे लागेल, असे मनपा प्रशासनाने बजावले असले तरीही अतिक्रमण विभागाकडून मात्र सोयीस्करपणे कानाडोळा होताना दिसत आहे. त्यामुळे काही ठिकाणी पुन्हा हॉकर्स उभे राहिलेले दिसून येत आहेत.

इन्फो-
उपायुक्तांनी फटकारले
याबाबत मनपा उपायुक्त प्रदीप जगताप यांनी अतिक्रमण अधीक्षक खान यांना फटकारले. अतिक्रमण विभागात ७ जादा कर्मचारी देऊनही दोन पथके करून कारवाई का केली जात नाही? अशी विचारणा केली.
---- इन्फो---
जप्त साहित्याची यादी करण्याचे आदेश
महासभेने अतिक्रमणधारकांकडून जप्त केलेले साहित्य परत न करण्याचा ठराव केला आहे. या जप्त साहित्याचा लिलाव केला जाणार आहे. मात्र अतिक्रमण विभागाकडून त्यानंतर जप्त केलेल्या साहित्याची यादी उपायुक्तांकडे सादरच झालेली नाही. रोजच्या रोज जप्त सामानाची यादी उपायुक्तांकडून स्वाक्षरी घेऊन अंतिम करण्याचे आदेश असतानाही टाळाटाळ केली जात आहे. त्यात कुठेतरी पाणी मुरत असल्याची चर्चा मनपा वर्तुळात सुरू आहे.
---- इन्फो---
आयुक्तांच्या आदेशानंतरही सुविधा नाहीत
आयुक्तांनी हॉकर्सच्या स्थलांतराच्या जागांवर सुविधा देण्यासाठी बांधकाम विभागाला ५० हजार व विद्युत विभागाला ५० हजार रूपये मंजूर केल्याचे सांगितले होते. मात्र त्यानंतर दहा-बारा दिवसांचा कालावधी उलटूनही ना गटारींवर ढापे टाकले गेले ना लाईट लावले गेले. त्यामुळे प्रशासनच अनुत्सुक असल्याचे चित्र आहे.