शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
2
"हे मराठीचं प्रेम नाही, तर महापालिका निवडणुका..."; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
3
भांडूपमधील प्रकरण जादूटोणा प्रकरण: अटकेनंतर पोलीस ठाण्यातच दाम्पत्याकडून मंत्रोच्चार, वैभव आणि हर्षदाला पोलिसांनी घडवली अद्दल
4
३० जूनला PPF, SSY सारख्या योजनांचे व्याजदर कमी होणार? सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता, पाहा डिटेल्स
5
Vaijapur Crime: वैजापुरात महिला कीर्तनकाराची आश्रमातच दगडाने ठेचून हत्या, छ. संभाजीनगरात खळबळ!
6
"फडणवीसांना खूपच धूर्त म्हणावं लागेल, प्रत्येक अधिवेशनाआधी ते एक फासा फेकतात आणि...", अंजली दमानियांचं सूचक ट्विट
7
'ही' महारत्न कंपनी देणार ३००% चा डिविडेंड; ५ वर्षांत शेअरमध्ये ११८४ टक्क्यांची तेजी, तुमच्याकडे आहे का?
8
कोण आहे शेफालीचा पती? ५ वर्षांतच मोडलेला पहिला संसार, मग पराग त्यागीच्या प्रेमात पडली अन्...
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
"माझा मुलगा सरन्यायाधीश होईल, पण ते पाहायला मी नसेल"; वडिलांची आठवण येताच भावुक झाले CJI गवई
11
Local Train Mega Block: रविवारी मुंबईत फिरण्याचा प्लॅन; मग मेगाब्लॉक अपडेट जाणून घ्या
12
...तरी विभक्त पत्नीला देखभाल खर्च द्यावाच लागेल; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निकाल
13
Shefali Jariwala Death: शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
14
Bigg Boss मधील आतापर्यंत तिसऱ्या स्पर्धकाचा अचानक मृत्यू; प्रत्येक घटनेमागे कारण एकच...
15
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
16
Panvel Crime News: धक्कादायक! नऊ महिने पोटात वाढवलेल्या बाळाला जन्मताच रस्त्यावर फेकलं, पनवेल येथील घटना
17
मुले पुढे जातात, मुलींना लग्न करणेही होते कठीण; लिव्ह-इन रिलेशनशिपबद्दल न्यायालयाकडून गंभीर चिंता
18
‘तशा’ किती विकासकांना अटक केली? कल्याण-डोंबिवली पालिकेला मुंबई उच्च न्यायालयाचा सवाल
19
"मी हात जोडले, पाय धरले, पण त्या नराधमाने…’’, कोलकाता बलात्कार प्रकरणातील पीडितेचा धक्कादायक जबाब   
20
मुंबई: अस्मी चव्हाणने ३० व्या मजल्यावरून उडी मारून का केली आत्महत्या? पोलिसांच्या तपासातून समोर आली माहिती

हटविलेल्या जागेवर पुन्हा हॉकर्सचे अतिक्रमण अतिक्रमण विभागाचा कानाडोळा : कर्मचारी संख्या वाढवूनही नियोजनाचा अभाव

By admin | Updated: February 22, 2016 19:29 IST

सोबत फोटो

सोबत फोटो

जळगाव : सवार्ेच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शहरातील प्रमुख वर्दळीच्या ११ रस्त्यांवरील हॉकर्सचे स्थलांतर करण्याचा निर्णय प्रशासनाच्याच प्रस्तावानुसार महासभेने घेतल्यानंतरही मोजक्या तीन-चार रस्त्यांवरील हॉकर्सवर कारवाई झाली असून त्याठिकाणीही पुन्हा अतिक्रमण होताना दिसत आहे. अतिक्रमण विभाग मात्र सोयीस्करपणे कानाडोळा करताना दिसत आहे.
मनपाने सवार्ेच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शहरातील ११ रस्त्यांवरील वाहतुकीला अडथळा ठरणार्‍या हॉकर्सचे स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार पर्यायी जागा शहर फेरीवाला समितीच्या बैठकीत निि›त करून महासभेत हा ठराव मंज़ूर करण्यात आला. मात्र मनपा प्रशासनाने पहिल्या टप्प्यात पाच रस्त्यांवरील स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला. त्यातही केवळ तीन ठिकाणच्याच हॉकर्सचे अतिक्रमण हटविण्यात आले. मात्र हॉकर्सनी पर्यायी जागांवर सुविधा नसल्याने जाण्यास नकार दिला. आहे त्या जागी व्यवसाय करू दिला जाणार नाही. पर्यायी जागांवर जावे लागेल, असे मनपा प्रशासनाने बजावले असले तरीही अतिक्रमण विभागाकडून मात्र सोयीस्करपणे कानाडोळा होताना दिसत आहे. त्यामुळे काही ठिकाणी पुन्हा हॉकर्स उभे राहिलेले दिसून येत आहेत.

इन्फो-
उपायुक्तांनी फटकारले
याबाबत मनपा उपायुक्त प्रदीप जगताप यांनी अतिक्रमण अधीक्षक खान यांना फटकारले. अतिक्रमण विभागात ७ जादा कर्मचारी देऊनही दोन पथके करून कारवाई का केली जात नाही? अशी विचारणा केली.
---- इन्फो---
जप्त साहित्याची यादी करण्याचे आदेश
महासभेने अतिक्रमणधारकांकडून जप्त केलेले साहित्य परत न करण्याचा ठराव केला आहे. या जप्त साहित्याचा लिलाव केला जाणार आहे. मात्र अतिक्रमण विभागाकडून त्यानंतर जप्त केलेल्या साहित्याची यादी उपायुक्तांकडे सादरच झालेली नाही. रोजच्या रोज जप्त सामानाची यादी उपायुक्तांकडून स्वाक्षरी घेऊन अंतिम करण्याचे आदेश असतानाही टाळाटाळ केली जात आहे. त्यात कुठेतरी पाणी मुरत असल्याची चर्चा मनपा वर्तुळात सुरू आहे.
---- इन्फो---
आयुक्तांच्या आदेशानंतरही सुविधा नाहीत
आयुक्तांनी हॉकर्सच्या स्थलांतराच्या जागांवर सुविधा देण्यासाठी बांधकाम विभागाला ५० हजार व विद्युत विभागाला ५० हजार रूपये मंजूर केल्याचे सांगितले होते. मात्र त्यानंतर दहा-बारा दिवसांचा कालावधी उलटूनही ना गटारींवर ढापे टाकले गेले ना लाईट लावले गेले. त्यामुळे प्रशासनच अनुत्सुक असल्याचे चित्र आहे.