शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

भावना विवेकापेक्षा वरचढ नको

By admin | Updated: November 17, 2015 03:34 IST

सन्मानपूर्वक देण्यात आलेले प्रतिष्ठित पुरस्कार आदराच्या भावनेने जतन केले जावेत. त्यांचे मूल्य राखले जावे, असे ठामपणे सांगत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी भावनेला विवेकापेक्षा

नवी दिल्ली : सन्मानपूर्वक देण्यात आलेले प्रतिष्ठित पुरस्कार आदराच्या भावनेने जतन केले जावेत. त्यांचे मूल्य राखले जावे, असे ठामपणे सांगत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी भावनेला विवेकापेक्षा वरचढ होऊ देऊ नये, असा सल्ला ‘पुरस्कार वापसी’चे पाऊल उचलणाऱ्या लेखक आणि कलावंतांना दिला आहे. पुरस्कार परत केले जात असल्याबद्दल त्यांनी नाराजीही स्पष्ट केली.समाजातील काही घटनांमुळे संवेदनशील मने व्यथित होतात; मात्र अशा घटनांबद्दल चिंता व्यक्त करताना अभिव्यक्तीचे संतुलन राखले जावे. नाराजीची अभिव्यक्तीही चर्चेतून व्हावी. भावनेच्या भरात वाहात जात विवेकशीलता किंवा तार्किकता नष्ट होऊ नये, असे ते राष्ट्रीय पत्रकारिता दिनानिमित्त प्रेस कौन्सिल आॅफ इंडियाच्या वतीने पत्रकार आणि छायाचित्रकारांना राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करताना म्हणाले. ‘व्यंगचित्र आणि रेखाचित्रांचा अभिव्यक्तीचे माध्यम म्हणून पडणारा प्रभाव’ या विषयावर त्यांनी विचार मांडताना वाढत्या असहिष्णुतेच्या घटनांबद्दल नाराजी व्यक्त करण्यासाठी काही लेखक, इतिहासतज्ज्ञ आणि वैज्ञानिकांसह कलावंतांनी पुरस्कार परत केल्याचा अप्रत्यक्ष संदर्भ दिला. एक गौरवान्वित भारतीय म्हणून आपला घटनादत्त विचार, मूल्य आणि तत्त्वांवर विश्वास असायला हवा. आवश्यकता भासली तेव्हा भारत स्वत:हून चूक दुरुस्त करण्यात सक्षम राहिला आहे, असेही ते ठामपणे म्हणाले. (लोकमत न्यूज नेटवर्क)अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा मूलभूत अधिकारचअभिव्यक्ती स्वातंत्र्य हा देशाच्या राज्य घटनेने बहाल केलेला मूलभूत अधिकार आहे. देशात वृत्तपत्रांचे स्वातंत्र्य हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग बनले आहे, असे सांगत त्यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांचा उल्लेख केला. खुला विचार आणि खऱ्याखुऱ्या टीकेची प्रशंसा ही आपल्या महान राष्ट्राच्या प्रिय परंपरेपैकी एक आहे. राष्ट्रपतींनी दिवंगत व्यंगचित्रकार आर.के. लक्ष्मण आणि राजेंद्र पुरी यांना आदरांजली अर्पण केली.