शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
2
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
3
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
4
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
5
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
6
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
7
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
8
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
9
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
10
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
11
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
12
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
13
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
14
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
15
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
16
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
17
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
18
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
19
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
20
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?

भावना विवेकापेक्षा वरचढ नको

By admin | Updated: November 17, 2015 03:34 IST

सन्मानपूर्वक देण्यात आलेले प्रतिष्ठित पुरस्कार आदराच्या भावनेने जतन केले जावेत. त्यांचे मूल्य राखले जावे, असे ठामपणे सांगत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी भावनेला विवेकापेक्षा

नवी दिल्ली : सन्मानपूर्वक देण्यात आलेले प्रतिष्ठित पुरस्कार आदराच्या भावनेने जतन केले जावेत. त्यांचे मूल्य राखले जावे, असे ठामपणे सांगत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी भावनेला विवेकापेक्षा वरचढ होऊ देऊ नये, असा सल्ला ‘पुरस्कार वापसी’चे पाऊल उचलणाऱ्या लेखक आणि कलावंतांना दिला आहे. पुरस्कार परत केले जात असल्याबद्दल त्यांनी नाराजीही स्पष्ट केली.समाजातील काही घटनांमुळे संवेदनशील मने व्यथित होतात; मात्र अशा घटनांबद्दल चिंता व्यक्त करताना अभिव्यक्तीचे संतुलन राखले जावे. नाराजीची अभिव्यक्तीही चर्चेतून व्हावी. भावनेच्या भरात वाहात जात विवेकशीलता किंवा तार्किकता नष्ट होऊ नये, असे ते राष्ट्रीय पत्रकारिता दिनानिमित्त प्रेस कौन्सिल आॅफ इंडियाच्या वतीने पत्रकार आणि छायाचित्रकारांना राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करताना म्हणाले. ‘व्यंगचित्र आणि रेखाचित्रांचा अभिव्यक्तीचे माध्यम म्हणून पडणारा प्रभाव’ या विषयावर त्यांनी विचार मांडताना वाढत्या असहिष्णुतेच्या घटनांबद्दल नाराजी व्यक्त करण्यासाठी काही लेखक, इतिहासतज्ज्ञ आणि वैज्ञानिकांसह कलावंतांनी पुरस्कार परत केल्याचा अप्रत्यक्ष संदर्भ दिला. एक गौरवान्वित भारतीय म्हणून आपला घटनादत्त विचार, मूल्य आणि तत्त्वांवर विश्वास असायला हवा. आवश्यकता भासली तेव्हा भारत स्वत:हून चूक दुरुस्त करण्यात सक्षम राहिला आहे, असेही ते ठामपणे म्हणाले. (लोकमत न्यूज नेटवर्क)अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा मूलभूत अधिकारचअभिव्यक्ती स्वातंत्र्य हा देशाच्या राज्य घटनेने बहाल केलेला मूलभूत अधिकार आहे. देशात वृत्तपत्रांचे स्वातंत्र्य हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग बनले आहे, असे सांगत त्यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांचा उल्लेख केला. खुला विचार आणि खऱ्याखुऱ्या टीकेची प्रशंसा ही आपल्या महान राष्ट्राच्या प्रिय परंपरेपैकी एक आहे. राष्ट्रपतींनी दिवंगत व्यंगचित्रकार आर.के. लक्ष्मण आणि राजेंद्र पुरी यांना आदरांजली अर्पण केली.