शहरं
Join us  
Trending Stories
1
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
2
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
3
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
4
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
5
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
6
सीपी राधाकृष्णन बनले देशाचे १५ वे उपराष्ट्रपती! राष्ट्रपती भवनात घेतली शपथ, जगदीप धनखड पहिल्यांदाच समोर
7
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
8
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
9
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन
10
बंगला नाही, गाडी नाही, सर्व सुविधा काढून घेतल्या; ८० वर्षीय माजी राष्ट्रपतींना राजवाडा रिकामा करावा लागला; जाणून घ्या नवीन कायदा
11
"तू आयुष्यभर तेच केलंस, विवाहित पुरुषांसोबत...", कुनिकावर संतापला कुमार सानूचा मुलगा, म्हणाला...
12
Astrology: लक्ष्मीकृपने आज 'या' ५ राशींचा दिवस उत्तम जाणार; गोड बातमीही मिळणार!
13
गोळी मारली, १५ फुटांवरुन रायफलसह उडी मारली अन्... चार्ली कर्कची हत्या करणाऱ्याचा VIDEO समोर
14
पैसे तयार ठेवा! ऑक्टोबरमध्ये येणार 'टाटा'चा बहुप्रतिक्षित आयपीओ; अधिक माहिती काय?
15
तुम्ही 'जाड' झालात का? धोका ओळखा! युनिसेफने दिला तरुणांना सर्तकतेचा इशारा, भारतातही चिंता वाढली
16
६५० कोटी रुपयांच्या जीएसटी घोटाळ्यात सीमा हैदर आणि सचिन यांची नावे समोर? काय आहे प्रकरण?
17
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
18
धक्कादायक! पती नपुंसक, सासऱ्याने नातवासाठी सेक्सची मागणी केली; माजी एसीपीच्या सुनेचा गंभीर आरोप
19
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
20
हेमा मालिनीशी लग्न केल्यानंतरही २७ वर्षांनी लहान अभिनेत्रीच्या प्रेमात पडले होते धर्मेंद्र, कोण होती ती?

आणीबाणीने दिला नव्या राजकारणाला जन्म -मोदी

By admin | Updated: October 11, 2015 23:42 IST

आणीबाणी हा लोकशाहीला सर्वात मोठा हादरा होता. लोकशाहीची चौकट आणि मूल्ये आणखी मजबूत करण्यासाठी एक धडा म्हणून आणीबाणीच्या स्मृती जिवंत ठेवल्या जाव्यात.

नवी दिल्ली : आणीबाणी हा लोकशाहीला सर्वात मोठा हादरा होता. लोकशाहीची चौकट आणि मूल्ये आणखी मजबूत करण्यासाठी एक धडा म्हणून आणीबाणीच्या स्मृती जिवंत ठेवल्या जाव्यात. त्या काळातील संघर्षाने नव्या पिढीच्या नेत्यांना नव्या राजकारणाला जन्म दिला, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी स्पष्ट केले. आणीबाणीच्या रूपात देशासमोर उभ्या ठाकलेल्या संकटाने देशाच्या लोकशाहीला हादरा दिला. मात्र, त्याचवेळी ती अधिक सशक्त बनून समोर आली. आणीबाणीच्या विरोधात ज्यांनी संघर्ष केला, जे लढले त्यांच्याप्रती मी कृतज्ञता व्यक्त करतो. आणीबाणीच्या काळात जी ओरड झाली त्याबद्दल नव्हे, तर लोकशाहीची मूल्ये आणि चौकट अधिक बळकट झाल्याबद्दल तिचे स्मरण करायला हवे, असे ते लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या ११३ व्या जयंतीनिमित्त आयोजित ‘लोकतंत्र प्रहरी अभिनंदन’ या कार्यक्रमात म्हणाले. लोकनायक जयप्रकाश यांना आदरांजली अर्पण करतानाच त्यांनी १९७५-७६ मध्ये आणीबाणीच्या काळात कारावास भोगणाऱ्या ज्येष्ठ नेत्यांचा सत्कारही केला. भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, अकाली दलाचे अध्यक्ष प्रकाशसिंग बादल यांचा त्यात समावेश होता. तत्पूर्वी मोदींनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी व रालोआचे माजी समन्वयक जॉर्ज फर्नांडिस यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. जेपींच्या चळवळीने देशात नवनिर्माणाचे वारे वाहू लागले. दडपशाही झुगारण्याचा सर्वात मोठा संदेश आणीबाणीच्या संघर्षाने दिला. अनेकांनी राजकारणातील प्रारंभीचे दिवस आणीबाणीविरुद्ध लढण्यात घालवले. नव्या राजकारणाचा जन्म झाला, असेही मोदी म्हणाले. ---------------1 मोदींनी ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या सोबत आणीबाणीच्या काळात अनेकांनी खांद्याला खांदा भिडवून काम केल्याचे स्मरण करवून दिले. 2 पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांना भारताचे नेल्सन मंडेला संबोधताना त्यांच्या आणीबाणीतील कार्याचा गौरव केला. बादल यांनी अनेक वर्षे कारागृहात आणि राजकारणात घालविली आहेत, असे ते म्हणाले. 3 मोदींनी आणीबाणीत मुख्य भूमिका बजाविणारे कल्याणसिंग, ओ.पी. कोहली, बलरामदास टंडन, वालूभाई वाला या चार राज्यपालांचाही सत्कार केला. 4 माजी उपसभापती कारिया मुंडा, भाजपचे नेते व्ही.के. मल्होत्रा, जयवंतीबेन मेहता, सुब्रमण्यम स्वामी, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डी.पी. त्रिपाठी, कामेश्वर पासवान, आरीफ बेग यांचाही सत्कारमूर्र्तींमध्ये समावेश होता.