शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

निवडणूक आयोगाची शशिकलांना टोपी, तर पनीरसेल्वमना मिळाला विजेचा खांब

By admin | Updated: March 23, 2017 14:50 IST

गेल्या काही दिवसांपूर्वी जयललिता यांच्या निधनानंतर तामिळनाडूमधील सत्ता संघर्ष उफाळून आला

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 23 - गेल्या काही दिवसांपूर्वी जयललिता यांच्या निधनानंतर तामिळनाडूमधील सत्ता संघर्ष उफाळून आला होता. मात्र त्यावेळी पनीरसेल्वम यांच्यावर शशिकलांनी मात केल्याचं चित्र पाहायला मिळालं होतं. जयललितांच्या निधनामुळे तामिळनाडूमधील आर. के. नगरमधल्या जागेवर 12 एप्रिलला पोटनिवडणूक घेण्यात येणार आहे. त्या निमित्तानं पुन्हा एकदा अण्णाद्रमुकमधले शशिकला आणि पनीरसेल्वम गट आमने-सामने आले होते. दोन्ही गटांनी अण्णाद्रमुकच्या चिन्हावर दावा केला होता. त्यावेळी निवडणूक आयोगानं ते चिन्हच गोठवलं होतं. आता निवडणूक आयोगानं शशिकलांच्या गटाला टोपी(hat), तर पनीरसेल्वम यांच्या गटाला विजेचा खांब (electricity pole) ही चिन्हांचं वाटप केलं आहे. तसेच निवडणूक आयोगानं दोन्ही गटांना वेगवेगळे नाव देण्यास मंजुरी दिली आहे. शशिकलांच्या गटाला ऑल इंडिया अण्णा द्रविड मुनेत्र अम्मा(एआईएडीएमके अम्मा) तर पनीरसेल्वम यांच्या गटाला एआईएडीएमके पुराट्ची थलैवी अम्मा हे नाव बहाल करण्यात आलं आहे. दोन्ही गटांनी अण्णाद्रमुकच्या निवडणूक चिन्हावर दावा केला होता. त्यानंतर निवडणूक आयोगानं ते चिन्हच गोठवलं होतं. शशिकलांच्या गटानं निवडणूक आयोगाकडे स्वतःच्या पक्षाचं एआईएडीएमके अम्मा या नावासाठी आग्रह धरला होता. शशिकलांच्या गटानं निवडणूक आयोगाकडे निवडणूक चिन्हासाठी तीन पर्यायही ठेवले होते. त्यात ऑटो रिक्षा, बॅट आणि हॅट यांचा समावेश होता. शशिकला गटाला निवडणूक आयागोनं रिक्षा हे चिन्ह देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र नंतर त्यांच्या आग्रहाखातर त्यांना टोपी(hat) हे चिन्ह देण्यात आलं आहे.