शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

UP Election 2017 : आज जाहीर होणारे एक्झिट पोल शास्त्र की जुगार

By admin | Updated: March 9, 2017 11:54 IST

एक्झिट पोलच्या अंदाजाबाबत अनेकजण शंका उपस्थित करतात. एक्झिट पोलचा अंदाज कितपत खरा मानायचा असा अनेकांचा प्रश्न असतो.

 ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. 9 - उत्तरप्रदेशमध्ये काल सातव्या अखेरच्या टप्प्याचे मतदान पार पडल्यानंतर आता सर्वांचे लक्ष आज संध्याकाळी जाहीर होणा-या पाच राज्यांच्या एक्झिट पोलच्या अंदाजाकडे लागले आहे. एक्झिट पोलचा अंदाज शास्त्रोक्त पद्धतीने वर्तवण्यात येत असला तरी, काहीवेळा हे अंदाज चुकतातही. 
 
2004 लोकसभा निवडणुकीचा अपवाद वगळता बहुतांश एक्झिट पोलचा अंदाज चुकीचा ठरलेला नाही. कुठल्या पक्षाला किती जागा मिळतील याचा अचूक अंदाज एक्झिट पोलमधून वर्तवता येत नसला तरी, बहुमताच्या जवळपास कुठला पक्ष राहिल यांचा अंदाज मात्र बरोबर ठरतो. 
 
एक्झिट पोलच्या अंदाजाबाबत अनेकजण शंका उपस्थित करतात. एक्झिट पोलचा अंदाज कितपत खरा मानायचा असा अनेकांचा प्रश्न असतो. एक्झिट पोलमध्ये जे राजकीय पक्ष बहुमतापासून दूर असतात त्यांचे नेते कधीही एक्झिट पोल मान्य करत नाही. मागच्यावर्षीच्या एप्रिल-मे 2016 दरम्यान पाच राज्यात झालेल्या एक्झिट पोलच्या अंदाजावर नजर टाकली तर, तामिळनाडूचा अपवाद वगळता अन्य राज्यातील एक्झिट पोल बरोबर ठरले होते. 
 
आसाममध्ये भाजपा, केरळमध्ये डावे, पुडुच्चेरी आणि पश्चिम बंगालमध्ये तृणमुल काँग्रेस सत्ता येईल हा बहुतांश एक्झिट पोलचा अंदाज बरोबर ठरला होता. तामिळनाडूच्या बाबतीत मात्र सर्वच एक्झिट पोलचा अंदाज चुकला. प्रस्थापित सरकार विरोधात लाटेमध्ये जयललिता यांच्या अण्णाद्रमुकची सत्ता जाईल आणि करुणानिधी यांच्या द्रमुकची सत्ता येईल असा अंदाज होता. पण प्रत्यक्षात मतमोजणीच्या दिवशी अण्णाद्रमुक 136 आमदारांसह बहुमताने सत्तेत आला. 
 
2015 मध्ये बिहारचा अंदाचही चुकला होता. त्यावेळी बहुतांश एक्झिट पोल्सचा लालू-नितीश आघाडीला सर्वाधिक जागा मिळतील असा अंदाज होता. भाजपाला 100 पेक्षा जास्त जागा मिळतील असा अंदाज वर्तवला होता. पण प्रत्यक्षात भाजपाला 100 पेक्षा कमी जागा मिळाल्या आणि लालू-नितीश आघाडीने 178 जागा मिळवून सत्ता मिळवली.