शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
4
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
5
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
6
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
7
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
8
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
9
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
10
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
11
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
12
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
13
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
14
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
15
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
16
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
17
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
18
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
19
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
20
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?

UP Election 2017 : आज जाहीर होणारे एक्झिट पोल शास्त्र की जुगार

By admin | Updated: March 9, 2017 11:54 IST

एक्झिट पोलच्या अंदाजाबाबत अनेकजण शंका उपस्थित करतात. एक्झिट पोलचा अंदाज कितपत खरा मानायचा असा अनेकांचा प्रश्न असतो.

 ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. 9 - उत्तरप्रदेशमध्ये काल सातव्या अखेरच्या टप्प्याचे मतदान पार पडल्यानंतर आता सर्वांचे लक्ष आज संध्याकाळी जाहीर होणा-या पाच राज्यांच्या एक्झिट पोलच्या अंदाजाकडे लागले आहे. एक्झिट पोलचा अंदाज शास्त्रोक्त पद्धतीने वर्तवण्यात येत असला तरी, काहीवेळा हे अंदाज चुकतातही. 
 
2004 लोकसभा निवडणुकीचा अपवाद वगळता बहुतांश एक्झिट पोलचा अंदाज चुकीचा ठरलेला नाही. कुठल्या पक्षाला किती जागा मिळतील याचा अचूक अंदाज एक्झिट पोलमधून वर्तवता येत नसला तरी, बहुमताच्या जवळपास कुठला पक्ष राहिल यांचा अंदाज मात्र बरोबर ठरतो. 
 
एक्झिट पोलच्या अंदाजाबाबत अनेकजण शंका उपस्थित करतात. एक्झिट पोलचा अंदाज कितपत खरा मानायचा असा अनेकांचा प्रश्न असतो. एक्झिट पोलमध्ये जे राजकीय पक्ष बहुमतापासून दूर असतात त्यांचे नेते कधीही एक्झिट पोल मान्य करत नाही. मागच्यावर्षीच्या एप्रिल-मे 2016 दरम्यान पाच राज्यात झालेल्या एक्झिट पोलच्या अंदाजावर नजर टाकली तर, तामिळनाडूचा अपवाद वगळता अन्य राज्यातील एक्झिट पोल बरोबर ठरले होते. 
 
आसाममध्ये भाजपा, केरळमध्ये डावे, पुडुच्चेरी आणि पश्चिम बंगालमध्ये तृणमुल काँग्रेस सत्ता येईल हा बहुतांश एक्झिट पोलचा अंदाज बरोबर ठरला होता. तामिळनाडूच्या बाबतीत मात्र सर्वच एक्झिट पोलचा अंदाज चुकला. प्रस्थापित सरकार विरोधात लाटेमध्ये जयललिता यांच्या अण्णाद्रमुकची सत्ता जाईल आणि करुणानिधी यांच्या द्रमुकची सत्ता येईल असा अंदाज होता. पण प्रत्यक्षात मतमोजणीच्या दिवशी अण्णाद्रमुक 136 आमदारांसह बहुमताने सत्तेत आला. 
 
2015 मध्ये बिहारचा अंदाचही चुकला होता. त्यावेळी बहुतांश एक्झिट पोल्सचा लालू-नितीश आघाडीला सर्वाधिक जागा मिळतील असा अंदाज होता. भाजपाला 100 पेक्षा जास्त जागा मिळतील असा अंदाज वर्तवला होता. पण प्रत्यक्षात भाजपाला 100 पेक्षा कमी जागा मिळाल्या आणि लालू-नितीश आघाडीने 178 जागा मिळवून सत्ता मिळवली.