शहरं
Join us  
Trending Stories
1
ISRO आणखी एक विक्रम रचणार! २०३५ पर्यंत भारतीय अंतराळ स्टेशन बनवणार, पाहा कसं दिसतं मॉडेल?
2
भाजपाला कधी मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष?; अचानक घडलेल्या घडामोडींमुळे झाला विलंब, काय आहे कारण?
3
भारतावरील 'टॅरिफ'वरून' ट्रम्प यांच्यावर टीका केली, माजी अमेरिकन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराच्या घरावर एफबीआयचा छापा
4
टिकटॉक भारतात परत सुरू होणार? नवीन अपडेट आली, सोशल मीडियावर जोरदार चर्चा
5
Video: इलेक्टिक कारच्या ऑटोमेटिक फिचरनं घेतला मालकाचा जीव?; अंगावर काटा आणणारा व्हिडिओ व्हायरल
6
ऑनलाइन फॅन्टसी गेमिंगवर अखेर बंदी; नवीन विधेयकावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची मोहोर
7
अबब! ३५ लाख जप्त, २० लाखांची रोकड जाळली; सरकारी इंजिनिअरचा 'काळा' प्रताप उघड, नेमकं काय घडलं?
8
सोलापूर: माहेराहून पैसे आण, चाबकाने मारले फटके; काजलने आयुष्य संपवले, वैष्णवी हगवणे घटनेची पुनरावृत्ती?
9
'ऑपरेशन सिंदूर'मधील शहीद जवान रामच्या घरी जन्मली 'लक्ष्मी'; ३ महिन्यांनी कुटुंबात पसरला आनंद
10
'पाकिस्तान अजूनही डंपर, असीम मुनीरनेही कबूल केले', राजनाथ सिंह यांनी मर्सिडीजच्या विधानाची खिल्ली उडवली
11
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?
12
Video: सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला अन् नाशिकमधला राडा समोर आला; कुत्र्याने बिबट्यावरच केला हल्ला
13
लवकरच ममता बॅनर्जींचे सरकार जाणार अन्..; कोलकात्यातून PM मोदींचा हल्लाबोल
14
पुणे हादरले! 'तुला किंमत चुकवावी लागेल', मानलेल्या बहिणीच्या प्रियकरानेच केली इंजिनिअर सौरभची हत्या
15
बीडमध्ये खळबळ! सरकारी वकिलाने कोर्टातच संपवले आयुष्य, न्यायाधीशासह दोघांवर गुन्हा; प्रकरण काय?
16
चीनची मोठी तयारी! या देशाविरोधात लढणार,समुद्रात १४ लढाऊ जहाजे उतरवले; लष्कर हाय अलर्टवर
17
६० कोटींचा सायबर फ्रॉड, ९४३ बँक खात्यांचा वापर; मुंबई पोलिसांनी १२ आरोपींना घेतले ताब्यात
18
संपूर्ण देशाची फेव्हरिट बनली ही ₹9 लाखाहून कमी किंमतीची SUV; नेक्सन, पंच, फ्रोंक्सला टाकलं मागे; विक्री घटूनही ठरली नं. 1
19
विवाह नोंदणी कार्यालयात हायव्होल्टेज ड्रामा; मेहुणीसोबत दाजी करणार होता लग्न, तितक्यात...
20
या मल्टीबॅगर स्टॉकला मिळालं 499.95 कोटींचं काम, रेल्वे सेक्टरशी संबंधित आहे नवी वर्क ऑर्डर; जाणून घ्या सविस्तर

सुदृढ लोकशाहीचे गमक राज्यघटनेत एकनाथराव खडसे : सामाजिक न्याय विभागातर्फे पत्रकारांसाठी कार्यशाळा

By admin | Updated: March 5, 2016 23:49 IST

जळगाव : सर्व नागरिकांना समान मताधिकार आणि त्याद्वारे प्रस्थापित होणारे लोकशाहीचे राज्य हे भारताचे वैशिष्ट्य आहे. गेल्या ६५ वर्षात आपल्या देशात लोकशाही केवळ टिकली नाही तर ती सुदृढ झाली. याचे गमक हे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहीलेल्या भारतीय राज्य घटनेत आहे, असे प्रतिपादन महसूल तथा पालकमंत्री एकनाथराव खडसे यांनी केले.

जळगाव : सर्व नागरिकांना समान मताधिकार आणि त्याद्वारे प्रस्थापित होणारे लोकशाहीचे राज्य हे भारताचे वैशिष्ट्य आहे. गेल्या ६५ वर्षात आपल्या देशात लोकशाही केवळ टिकली नाही तर ती सुदृढ झाली. याचे गमक हे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहीलेल्या भारतीय राज्य घटनेत आहे, असे प्रतिपादन महसूल तथा पालकमंत्री एकनाथराव खडसे यांनी केले.
सामाजिक न्याय विभागातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५व्या जयंती वर्षानिमित्त शनिवारी पत्रकारांसाठी एक दिवसाची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेचे उद्घाटन खडसे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील नियोजन भवनात आयोजित या कार्यशाळेसाठी एकनाथराव खडसे यांच्यासमवेत जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल, जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, अपर जिल्हाधिकारी गुलाबराव खरात, जिल्हा नियोजन अधिकारी दिनेश वाघ, उपजिल्हाधिकारी साजिदखान पठाण, जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल पवार, सामाजिक न्याय विभागाचे साहाय्यक आयुक्त राकेश पाटील,जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण अधिकारी प्राची वाजे आदी मान्यवर उपस्थित होते. सुरुवातीला महात्मा ज्योतीबा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करून दीपप्रज्ज्वालन करण्यात आले.

बुद्धिमत्ता, परिश्रम, कतृर्त्वाच्या जोरावर क्रांती...
उपस्थित पत्रकारांना आणि पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांना संबोधित करतांना खडसे म्हणाले की, आपली बुद्धिमत्ता, कठोर परिश्रम आणि कतृर्त्वाच्या जोरावर डॉ. आंबेडकर यांनी या देशात सामाजिक क्रांती घडवली. समाजातील दलित, मागासलेल्यांना सामाजिक न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी तत्कालिन व्यवस्थेविरुद्ध बंड पुकारले आणि न्याय मिळवून दिला. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर या देशाला एका सूत्रात बांधणारी राज्यघटना दिली.

जगभरातील सर्वोत्कृष्ट राज्यघटना...
आजही भारताची राज्यघटना जगभरातील सर्वोत्कृष्ट घटना मानली जाते. प्रत्येक नागरिकाच्या मताला समान अधिकार या घटनेने दिला आहे. या अधिकाराद्वारे लोक येथे आपले राज्यकर्ते कोण, हे ठरवू शकतात. राज्याच्या प्रत्येक निर्णयात जनतेचा सहभाग असतो, ही सगळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या घटनेची किमया आहे, असे खडसे म्हणाले.

शासनाचे अनेक उपक्रम...
देशाला अहिंसा आणि शांतीचा विचार देण्यासाठी त्यांनी बुद्ध धर्माचा अंगीकार केला. विघटनवादी शक्तींना दूर ठेवण्यासाठी बाबासाहेबांनी मोठे योगदान दिले आहे. त्यांच्या १२५व्या जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याचे हे वैश्विक स्वरुप लोकांपुढे आणण्यासाठी शासनाने अनेक उपक्रम हाती घेतले आहेत, असेही खडसे यांनी सांगितले.