शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

कर्नाटकातील अपघातात महाराष्ट्रातील आठ भाविक ठार

By admin | Updated: July 19, 2016 18:27 IST

गुरुपोर्णिमेच्या निमित्ताने गाणगापूरला दर्शनासाठी निघालेल्या महाराष्ट्रातील भाविकांवर मंगळवारी काळाने घाला घातला.

ऑनलाइन लोकमत 

उस्मानाबाद, दि. १९- कर्नाटक राज्यातील गाणगापूर येथे गुरुपौर्णिमेनिमीत्त दत्त दर्शनासाठी निघालेल्या उस्मानाबाद तालुक्यातील कनगरा येथील नऊ जणांवर काळाने झडप घातली आहे. आळंद तालुक्यातील लाडचिंचोली येथे भाविकांची क्रूजर आणि ट्रकची समोरासमोर धडक होवून नऊजण जागीच ठार झाले आहेत. तर आठ जण गंभीर जखमी असून त्यातील चौघांची प्रकृती अत्यावस्त आहे. मयतांमध्ये दोन लहान मुले, चार महिला आणि तीन पुरूषांचा समावेश आहे. 
 
उस्मानाबाद तालुक्यातील कनगरा येथील इंगळे कुटूंबातील सदस्य गुरुपौर्णिमेनिमित्त मंगळवारी सकाळी गाणगापूरला रवाना झाले होते. दुपारी एक वाजण्याच्या सुमारास कर्नाटक राज्यातील आळंद तालुक्यातील लाडचिंचोली या गावानजीक भाविकांची गाडी (एमएच २५, आर ४५८३) आणि ट्रक यांच्यात समोरासमोर जोराची धडक बसली. यात नऊ जणांचा जीव गेला आहे. हा अपघात एवढा भीषण होता की भाविकांच्या गाडीचा चक्काचूर झाला आहे. मयतांना गाडीचा पत्रा कापून बाहेर काढावे लागले. मयतांमध्ये पाच वर्षीय चिमुकल्यांसह चार महिला आणि पाच पुरूषांचा समावेश आहे. या अपघातात संजय शिवाजी इंगळे (वय ३३), वर्षा प्रभाकर ढोबळे (वय ३०), सगजाबाई पंढरी आळंदे (वय ६२), कांताबाई शिवाजी इंगळे (वय ६३), कृष्णा संजय इंगळे (वय ५), गजाबाई श्रीमंत इंगळे (वय ६०), स्वप्नील प्रभाकर ढोबळे (वय ४, सर्व रा. कनगरा), फुलचंद शिवाजी धरणे (रा. शिवाजीनगर) व अन्य एक जणाचा समावेश आहे. 
 
कनगरा गावावर शोककळा...
गुरुपौर्णिमेनिमित्त दत्तदर्शनासाठी निघालेल्या एकाच कुटूंबातील नऊ जणांवर काळाने घाला घातल्याने कनगरा गावावर शोककळा पसरली आहे. देवदर्शनासाठी निघालेल्या एकाच घरातील भाविकांचा अपघातात एवढ्या मोठ्या संख्येने जीव जाण्याची ही पहिलीच वेळ असल्याने ग्रामस्थांमधून हळहळ व्यक्त केली जात आहे. अपघाताची वार्ता कळाल्यापासून ग्रामस्थ एकत्रित जमा होवून मयतांच्या पार्थिवांची वाट पाहत होते. अनेकांना या घटनेची माहिती कळताच मोठा धक्का बसला आहे. दरम्यान गावचे पोलीस पाटील घटनास्थळी दाखल झाले असून मयतांना गावाकडे आणण्याची तयारी सुरु आहे. जखमींवर गुलबर्गा येथील कलबुर्गी रूग्णालयात उपचार सुरु आहेत.