शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
4
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
5
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
6
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
7
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
8
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
9
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
10
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
11
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
12
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
13
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
14
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
15
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
16
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
17
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
18
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
19
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
20
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य

Coronavirus: “पुढील महिन्यापर्यंत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव; १५ मे नंतर जास्त धोकादायक”

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2021 11:28 IST

सरकारने उद्योग उत्पादन क्षमतेला वाचवण्यासाठी अनेक उपाय केले आहेत. त्यामुळे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा परिणाम अर्थव्यवस्थेवर होणार नाही असं के वी सुब्रमण्यम म्हणाले.

नवी दिल्ली- देशात कोरोनामुळं परिस्थिती बिकट होत चालली आहे. कोरोनाची दुसरी लाट मे महिन्यातही कायम राहू शकते. मेच्या पहिल्या पंधरवड्यात याचा परिणाम खूप जाणवू शकतो असा इशारा मोदी सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार के. वी सुब्रमण्यम यांनी दिला आहे. देशात कोरोना रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. मागील २४ तासांत २ लाख ९५ हजाराहून अधिक रुग्ण समोर आले आहेत. तर २ हजारापेक्षा अधिक मृत्यू झाले आहेत.

के. वी सुब्रमण्यम म्हणाले की, मी महामारीचा अभ्यासक नाही. मी फक्त यावर नजर ठेऊन आहे. मी एपिडेमियोलॉजिस्टचे अनेक पेपर वाचले आहेत. आयआयटी कानपूरने चांगल्या मॅथेमेटिकल मॉडलिंगच्या आधारे आयसीएमआरसारख्या संस्थांच्या रिसर्च आधारे मी सांगू शकतो की, भारतात कोरोनाची दुसरी लाट मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत असेल.

न्यूज एजेन्सी पीटीआयच्या नुसार, ग्रेट लेक्स इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटद्वारा आयोजित एका कार्यक्रमात के. वी सुब्रमण्यम बोलत होते. या संकटाचा परिणाम अर्थव्यवस्थेवर जास्त होणार नाही. कोविड १९ च्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव मे पर्यंत राहील असं इंडियन मेडिकल रिसर्चसारख्या अनेक संस्थांच्या रिपोर्टवर आधारित सांगतो. सरकारने उद्योग उत्पादन क्षमतेला वाचवण्यासाठी अनेक उपाय केले आहेत. त्यामुळे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा परिणाम अर्थव्यवस्थेवर होणार नाही असं के वी सुब्रमण्यम म्हणाले.

भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या १,५६,१६,१३० वर पोहोचली आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. बुधवारी (२१ एप्रिल) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या २४ तासांत२,९५,०४१ नवीन कोरोनाग्रस्त आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दीड कोटीवर पोहोचली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा एक लाख ८२ हजारांवर पोहोचला आहे. याच दरम्यान केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी लसीकरण आणि कोरोना रुग्णांबाबत माहिती दिली आहे. देशात आतापर्यंत १२,७१, ००,०००  हून अधिक जणांना कोरोनावरील लस दिली गेली आहे. मृत्यू दरही १.१८ टक्के इतका कमी झाला आहे.   

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या