शहरं
Join us  
Trending Stories
1
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
2
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
3
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
4
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
5
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
6
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
7
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
8
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
9
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण
10
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
11
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
12
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
13
"लग्न टिकलं असतं तर मला आवडलं असतं...", अरबाज खानसोबतच्या घटस्फोटावर इतक्या वर्षांनी मलायकाचं भाष्य
14
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
15
Gopal Kala 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
16
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
17
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
18
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
19
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
20
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल

प्रत्येकवर्षी ३ लाख काद्यांच्या चाळी

By admin | Updated: October 22, 2016 00:49 IST

काही वर्षांपासून कांद्याचा भावामध्ये चढउतार होत आहे. कांदा साठवून ठेवण्यासाठी शासनाकडे असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला. त्यावेळी ती अंत्यत तोकडी असल्याचे जाणविले. त्यासाठी प्रत्येक वर्षी तीन लाख कांद्याच्या चाळी तयार करण्याचे शासनाचे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले.

काही वर्षांपासून कांद्याचा भावामध्ये चढउतार होत आहे. कांदा साठवून ठेवण्यासाठी शासनाकडे असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला. त्यावेळी ती अंत्यत तोकडी असल्याचे जाणविले. त्यासाठी प्रत्येक वर्षी तीन लाख कांद्याच्या चाळी तयार करण्याचे शासनाचे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले.
शेतीसोबत जोडधंदे हवे
शेतकर्‍यांना पिकविता येते मात्र विकता येत नाही. त्यासाठी मार्केटिंग, नवीन तंत्रज्ञानाचा वापर करणे आवश्यक आहे. सर्वांना रोजगार देण्याची क्षमता ही काळ्या आईमध्ये आहे. कृषी खात्याला नवी दिशा देण्यासाठी बांधावर जाण्याचे काम शासन करणार आहे. शेतकरी, सरकार आणि कृषि विभाग यांनी एकत्र येऊन शेतकर्‍यांच्या समस्यांचे निवारण हे गावांतच करण्याचे नियोजन आगामी काळात राहणार आहे.
शेतकरी राजा तू बाप, मी लेकरू
शेतकर्‍यांनी आपल्याला आमदार केलं. तुमच्यामुळे मी मंत्री झालो. तुम्ही माझ्या म्हातारपणाची व्यवस्था केली आहे. शेतकरी राजा माझा बाप आहे. लेकरू म्हणून मी बापाची काळजी घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. नैराश्य येईल तेव्हा फोन करा किंवा एसएमएस करा. मात्र आत्महत्या करू नका असे आवाहन त्यांनी केले. सूत्रसंचालन संजय घुगे यांनी केले. यावेळी पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चौकटी

राज्याचा कृषिमंत्री तुझ्यासोबत आहे
भाजीपाला विनीयमन विधेयक पास झाल्यानंतर राज्यातील कृउबामध्ये आडत्यांनी भाजीपाला विक्रीला प्रतिबंध केला. दादर कृउबामध्ये पहाटे चार वाजता एक शेतकरी कोथिंबीरचे वाहन भरून घेऊन आला. आंदोलकांचा विरोध पाहता तो माल खाली उतरविण्यास घाबरत होता. राज्याचा कृषिमंत्री तुझ्या सोबत आहे. तू फक्त शेतमालाची विक्री कर असे सांगितल्यानंतर त्याला धीर मिळाला. आणि संपूर्ण चारचाकी भरून आणलेला माल पाहतापाहता विकला गेला. या घटनेनंतर आपल्यावर भरपूर टिका झाली. मात्र राज्याचा कृषिमंत्री शेतकर्‍याच्या पाठिशी आहे हा विश्वास मला शेतकर्‍यांमध्ये निर्माण करायचा होता.

शेतमालाचे पाकिट देऊन केले स्वागत
शेतकर्‍यांनी कृषी राज्यमंत्र्याचे हार किंवा पुष्पगुच्छ न देता ज्वारीचे कणीस, कपाशी, मका, मिरचीचे पाकीट देऊन स्वागत केले. शेतकर्‍यांनी ज्या पद्धतीने स्वागत केले त्याचा अर्थ या पिकांना भाव देऊन शेतकर्‍यांना न्याय द्यायचा असल्याचे तुम्ही मला सुचविले असल्याचे कृषि राज्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात सांगितले. मात्र आचारसंहिता असल्यामुळे कोणतीही घोषणा करता येणार नसल्याचे त्यांनी सांगितले.