शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
4
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
5
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
6
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
7
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
8
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
9
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
10
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
11
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
12
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
13
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
14
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
15
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
16
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
17
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
18
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
19
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
20
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
Daily Top 2Weekly Top 5

प्रत्येकवर्षी ३ लाख काद्यांच्या चाळी

By admin | Updated: October 22, 2016 00:49 IST

काही वर्षांपासून कांद्याचा भावामध्ये चढउतार होत आहे. कांदा साठवून ठेवण्यासाठी शासनाकडे असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला. त्यावेळी ती अंत्यत तोकडी असल्याचे जाणविले. त्यासाठी प्रत्येक वर्षी तीन लाख कांद्याच्या चाळी तयार करण्याचे शासनाचे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले.

काही वर्षांपासून कांद्याचा भावामध्ये चढउतार होत आहे. कांदा साठवून ठेवण्यासाठी शासनाकडे असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला. त्यावेळी ती अंत्यत तोकडी असल्याचे जाणविले. त्यासाठी प्रत्येक वर्षी तीन लाख कांद्याच्या चाळी तयार करण्याचे शासनाचे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले.
शेतीसोबत जोडधंदे हवे
शेतकर्‍यांना पिकविता येते मात्र विकता येत नाही. त्यासाठी मार्केटिंग, नवीन तंत्रज्ञानाचा वापर करणे आवश्यक आहे. सर्वांना रोजगार देण्याची क्षमता ही काळ्या आईमध्ये आहे. कृषी खात्याला नवी दिशा देण्यासाठी बांधावर जाण्याचे काम शासन करणार आहे. शेतकरी, सरकार आणि कृषि विभाग यांनी एकत्र येऊन शेतकर्‍यांच्या समस्यांचे निवारण हे गावांतच करण्याचे नियोजन आगामी काळात राहणार आहे.
शेतकरी राजा तू बाप, मी लेकरू
शेतकर्‍यांनी आपल्याला आमदार केलं. तुमच्यामुळे मी मंत्री झालो. तुम्ही माझ्या म्हातारपणाची व्यवस्था केली आहे. शेतकरी राजा माझा बाप आहे. लेकरू म्हणून मी बापाची काळजी घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. नैराश्य येईल तेव्हा फोन करा किंवा एसएमएस करा. मात्र आत्महत्या करू नका असे आवाहन त्यांनी केले. सूत्रसंचालन संजय घुगे यांनी केले. यावेळी पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चौकटी

राज्याचा कृषिमंत्री तुझ्यासोबत आहे
भाजीपाला विनीयमन विधेयक पास झाल्यानंतर राज्यातील कृउबामध्ये आडत्यांनी भाजीपाला विक्रीला प्रतिबंध केला. दादर कृउबामध्ये पहाटे चार वाजता एक शेतकरी कोथिंबीरचे वाहन भरून घेऊन आला. आंदोलकांचा विरोध पाहता तो माल खाली उतरविण्यास घाबरत होता. राज्याचा कृषिमंत्री तुझ्या सोबत आहे. तू फक्त शेतमालाची विक्री कर असे सांगितल्यानंतर त्याला धीर मिळाला. आणि संपूर्ण चारचाकी भरून आणलेला माल पाहतापाहता विकला गेला. या घटनेनंतर आपल्यावर भरपूर टिका झाली. मात्र राज्याचा कृषिमंत्री शेतकर्‍याच्या पाठिशी आहे हा विश्वास मला शेतकर्‍यांमध्ये निर्माण करायचा होता.

शेतमालाचे पाकिट देऊन केले स्वागत
शेतकर्‍यांनी कृषी राज्यमंत्र्याचे हार किंवा पुष्पगुच्छ न देता ज्वारीचे कणीस, कपाशी, मका, मिरचीचे पाकीट देऊन स्वागत केले. शेतकर्‍यांनी ज्या पद्धतीने स्वागत केले त्याचा अर्थ या पिकांना भाव देऊन शेतकर्‍यांना न्याय द्यायचा असल्याचे तुम्ही मला सुचविले असल्याचे कृषि राज्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात सांगितले. मात्र आचारसंहिता असल्यामुळे कोणतीही घोषणा करता येणार नसल्याचे त्यांनी सांगितले.