शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
3
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
4
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
5
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
6
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
7
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
8
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
9
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
10
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
11
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
12
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
13
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
14
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
15
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
16
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
17
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
18
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
19
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
20
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन

३१ आॅक्टोबरपासून राष्ट्रीय महामार्गांवर ‘ई-टोल’, न थांबता भरा टोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2017 04:06 IST

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या ‘इलेक्ट्रॉनिक टोलवसुली’ (ईटीसी)ला येत्या ३१ आॅक्टोबरचा मुहूर्त मिळाला आहे. त्या दिवसापासून राष्ट्रीय महामार्गांवरील सर्व ३७० टोल नाक्यांवर प्रवाशांना वाहन न थांबविता, ‘रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन’ (आरएफआयडी) टॅगच्या साह्याने टोल भरता येईल.

नवी दिल्ली : केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या ‘इलेक्ट्रॉनिक टोलवसुली’ (ईटीसी)ला येत्या ३१ आॅक्टोबरचा मुहूर्त मिळाला आहे. त्या दिवसापासून राष्ट्रीय महामार्गांवरील सर्व ३७० टोल नाक्यांवर प्रवाशांना वाहन न थांबविता, ‘रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन’ (आरएफआयडी) टॅगच्या साह्याने टोल भरता येईल.ही योजना सक्तीची नसून, इच्छा असलेल्यांनी ती मिळेल. सुरुवातीस टोल प्लाझांवर दोन लेन टॅगसाठी असतील. इतर लेनमध्ये सध्याप्रमाणे टोल भरता येईल. आधी मुंबई-अहमदाबाद व मुंबई-आग्रा महामार्गांवरील काही टोल प्लाझांवर लेनमध्ये अशी व्यवस्था होती. आता सर्व टोल प्लाझांवर दोन लेनमध्ये ‘ई-टोल’ असेल. सर्वच टोल प्लाझांमध्ये ही तांत्रिक यंत्रणा असून, प्रतिसाद पाहून सर्व टोलवसुली अशीच करण्याचा विचार होईल.हे ‘फास्ट टॅग’ म्हणूनही ओळखले जातात. राष्ट्रीय महामार्गांवर ये-जा करणाºया ४० लाख वाहनांपैकी ६.२० लाख वाहनांना असे टॅग आहेत. ही संख्या मार्चपर्यंत १५ लाखांवर नेण्याचे लक्ष्य आहे. या ‘फास्ट टॅग’साठी रक्कम आधीच जमा करावी लागेल. टॅग पुढच्या काचेवर लावला की, वाहन टोल प्लाझावर इलेक्ट्रॉनिक यंत्रणेद्वारे जमा रकमेतून टोलची रक्कम वळती होईल. वाहन थांबवावे लागणार नाही. जमा रक्कम संपल्यावर टॅग रिचार्ज करता येईल. टॅग टोलनाके वा ठरावीक बँकांमध्ये विकत मिळतील.>एकमेव व्यवस्थाटोलनाक्यांचा कंत्राटदार वेगळा असला, तरी देशभर एकच टॅग चालेल. हा टॅग ‘इंटरआॅपरेबल’ असेल व त्यातून जमा होणारा टोल संबंधित कंत्राटदाराच्या खात्यात जमा होईल. अमेरिका व युरोपमध्येही ही व्यवस्था आहे, परंतु तेथे शहर व महामार्ग यांसाठी वेगळे टॅग लागतात. भारतात ही व्यवस्था यशस्वी झाल्यास, ते जगातील एकमेव उदाहरण ठरेल.