शहरं
Join us  
Trending Stories
1
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
4
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
5
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
6
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
7
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
8
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
9
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
10
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
11
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
12
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
13
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
14
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
15
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
16
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
17
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
18
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
19
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
20
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!

अमळनेर व धरणगावच्या जलपातळीत तीन मीटरने घट टंचाईची स्थिती बिकट : भूजल सर्वेक्षण विभागाने केले १७८ विहिरींचे निरीक्षण

By admin | Updated: February 7, 2016 22:45 IST

जळगाव : अत्यल्प पाऊस, शेती, व्यवसाय व पिण्याच्या पाण्यासाठी होणारा रोजचा उपसा आणि मोठ्या प्रमाणातील वृक्षतोड यासार्‍याचा परिणाम म्हणून अमळनेर, धरणगाव व चाळीसगाव या तीन तालुक्यातील भूगर्भातील जलपातळी तब्बल तीन मिटरने खालावली आहे. सहा तालुक्यांमध्ये सातत्याने भूजलपातळीत घट होत असल्याने आगामी काळात भीषण स्थिती ओढवणार आहे.

जळगाव : अत्यल्प पाऊस, शेती, व्यवसाय व पिण्याच्या पाण्यासाठी होणारा रोजचा उपसा आणि मोठ्या प्रमाणातील वृक्षतोड यासार्‍याचा परिणाम म्हणून अमळनेर, धरणगाव व चाळीसगाव या तीन तालुक्यातील भूगर्भातील जलपातळी तब्बल तीन मिटरने खालावली आहे. सहा तालुक्यांमध्ये सातत्याने भूजलपातळीत घट होत असल्याने आगामी काळात भीषण स्थिती ओढवणार आहे.
आगामी काळातील टंचाईची स्थिती लक्षात घेता जिल्हा प्रशासनातर्फे आराखडा तयार करण्यात आला आहे. या वर्षी जिल्ह्यातील ५२६ गावांना पाणी टंचाईची झळ बसणार आहे. त्यानुसार तालुकानिहाय विहिरींचे निरीक्षण भूजल सर्व्हेक्षण विभाग कार्यालयामार्फत करण्यात येत असते. सप्टेबर महिन्यातील अहवालानंतर या कार्यालयाने जानेवारी महिन्याच्या अखेर प्रत्येक तालुक्यातील विहिरीचे निरीक्षण करून भूगर्भातील जलपातळीची मोजणी केली आहे.

अमळनेर, चाळीसगाव व धरणगावात धोक्याची घंटा
भूजल सर्वेक्षण विभागातर्फे अमळनेर तालुक्यातील १४, , चाळीसगाव तालुक्यातील २१ व धरणगाव तालुक्यातील सात तर पारोळा तालुक्यातील १६ विहिरींचे निरीक्षण करण्यात आले. या चारही तालुक्यांमध्ये अडीच ते तीन मीटरपर्यंत जलपातळीतील घट नोंदविण्यात आली आहे. ऑक्टोबर महिन्यात झालेल्या मोजणीत बोदवड तालुक्यात सर्वाधिक अडीच मिटरने जलपातळीत घट झाल्याची नोंद होती. त्यापाठोपाठ अमळनेर व चाळीसगाव तालुक्यात दीड मीटरने जलपातळीत घट झाली होती.
मुक्ताईनगर व भुसावळात अत्यल्प घट
जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये भूजलपातळीत मोठ्या प्रमाणात घट होत असताना मुक्ताईनगर, भुसावळ व एरंडोल तालुक्यात काहीशी स्थिती चांगली आहे. भुसावळ तालुक्यात ०.८८, मुक्ताईनगर तालुक्यात ०.९६ तर एरंडोल तालुक्यात १.०७ मीटरने भूजलपातळीतील घट नोंदविण्यात आली आहे.

इन्फो...
चोपडा, यावल व रावेरला मोठा फटका
सप्टेंबर महिन्यात झालेल्या पावसामुळे यावल, रावेर, चोपडा व भुसावळ तालुक्यांना दिलासा मिळाल्याने या तालुक्यातील जलपातळीत काही प्रमाणात वाढ झाली होती. पावणे तीन मिटरने यावल तालुक्यातील वाढ नोंदविण्यात होती. मात्र प्रचंड उपसा केल्यामुळे यावल तालुक्यात २.७७ मीटरने जलपातळीत घट झाली आहे. त्या पाठोपाठ चोपडा तालुक्यात २.५१ मीटरने तर रावेर तालुक्यात १.१६ मीटरने भूगर्भातील जलपातळीत घट झाली आहे. केळी आणि बागायती क्षेत्र असल्याने या तालुक्यांमध्ये पाण्याचा प्रचंड उपसा होत असल्याने जलपातळीत घट होत आहे.