शहरं
Join us  
Trending Stories
1
अचानक राजीनामा दिल्यानंतर, काय करतायत जगदीप धनखड? पत्नी वारंवार का जात आहे राजस्थानला?
2
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
3
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
4
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
5
R Ashwin: आर. अश्विन आयपीएलमधून निवृत्त, फक्त विदेशी क्रिकेट लीगमध्ये खेळणार!
6
ऑनलाईन App वरुन ऑर्डर केलं जेवण अन् डिलिव्हरी बॉयच्याच पडली प्रेमात, आता केलं लग्न
7
अष्टविनायक चित्रपटातील साधीभोळी गणेशभक्त वीणा आता दिसते अशी, अनेक वर्षे होती चित्रपटांपासून दूर
8
"सूनेने गोळी मारून हत्या केली, माझा मुलगा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता"; तीन महिन्यातच पतीची हत्या
9
अर्चनानंतर आता श्रद्धा तिवारी गायब...; कुटुंबानं मुलीचा उलटा फोटो दरवाजाच्या चौकटीला लावला
10
खळबळजनक! कॉन्स्टेबलने कुटुंबीयांच्या मदतीने पत्नीला जिवंत जाळलं, प्रकृती गंभीर
11
ChatGPT ने मुलाला आयुष्य संपवण्याचे ट्यूशन दिले, पालकांनी न्यायालयात सगळीच माहिती सांगितली
12
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
13
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
14
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
15
बाप्पाला आणताना, नेताना, पूजा करताना मूर्तीचा भाग 'दुभंगला' तर अशुभ? धर्मशास्त्र सांगते... 
16
गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रील स्पर्धेचे आयोजन, प्रथम क्रमांकाला एक लाखांचे बक्षीस
17
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
18
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
19
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
20
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या

पगारेच्या हत्त्येमुळे शहर वेठीस

By admin | Updated: May 10, 2014 20:15 IST

नाशिक : एका सराईत गुन्हेगाराची टोळक्याकडून हत्त्या होते काय आणि त्यामुळे पोलीस यंत्रणेबरोबरच सर्वसामान्य नागरिक वेठीस धरले जातात काय़ भीम पगारेच्या हत्त्येनंतर जिल्हा शासकीय रुग्णालय तसेच शहरातील मुख्य बाजारपेठेतील दुकानदार तसेच नागरिकांचा या प्रकरणाशी कोणताही संबंध नसताना वेठीस धरले गेले़ याबाबत नागरिकांनी शहरातील वाढलेल्या टोळीयुद्धाबद्दल नाराजीही व्यक्तकेली आहे़

नाशिक : एका सराईत गुन्हेगाराची टोळक्याकडून हत्त्या होते काय आणि त्यामुळे पोलीस यंत्रणेबरोबरच सर्वसामान्य नागरिक वेठीस धरले जातात काय़ भीम पगारेच्या हत्त्येनंतर जिल्हा शासकीय रुग्णालय तसेच शहरातील मुख्य बाजारपेठेतील दुकानदार तसेच नागरिकांचा या प्रकरणाशी कोणताही संबंध नसताना वेठीस धरले गेले़ याबाबत नागरिकांनी शहरातील वाढलेल्या टोळीयुद्धाबद्दल नाराजीही व्यक्तकेली आहे़शुक्रवारी रात्री मल्हारखाण येथील सराईत गुन्हेगार भीम पगारेची टोळक्याने निर्घृणपणे हत्त्या केली़ या हत्त्येनंतर त्यास जिल्हा रुग्णालयात आणले असता सुमारे पाचशे ते सहाशे नागरिकांचा जमाव जिल्हा रुग्णालयात ठाण मांडून होता़ या जमावाला किमान दर अर्धा तासाच्या अंतराने पोलिसांना बाहेर हुसकावेे लागत होते़ पोलीस आणि जमाव यांचा रात्रभर हा पाठशिवणीचा खेळ सुरू होता़जिल्हा रुग्णालयाबाहेरच्या गर्दीत शनिवारी सकाळी अजूनच भर पडली़ या ठिकाणी जमलेल्या जमावाने मयत भीम पगारेच्या समर्थनार्थ आणि पोलिसांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली़ एका पोलीस अधिकार्‍याने परिस्थिती हाताबाहेर जात असल्याने कंट्रोलला फ ोन करून पोलिसांची जादा कुमक मागवून घेतली़ पोलिसांची जादा कुमक आल्यानंतर या जमावाला पिटाळणे पोलिसांना शक्य झाले़ दरम्यान, यावेळी जिल्हा रुग्णालयात येणारे रुग्ण, रुग्णांचे नातेवाईक यांचेही हाल झाले़ तसेच जिल्हा रुग्णालयाच्या बाहेरील गर्दीतून वाट काढणेही काही वेळ जिकिरीचे झाले होते़भीम पगारेच्या काही समर्थकांनी मल्हारखाण परिसरातील दुकाने बंद केली होती, तर गोळे कॉलनी, अशोकस्तंभ, सीबीएस, एम़ जी़ रोड या ठिकाणी टोळक्यांनी बळजबरीने दुकानदारांना दुकाने बंद पाडण्यास भाग पाडले़ यामुळे या ठिकाणी येणार्‍या नागरिकांनी घडलेल्या घटनेच्या परिणामाबाबत नाराजी व्यक्त केली़ तसेच नाशकात सुरू झालेली टोळीयुद्धे व सामान्य नागरिकांना वेठीस धरले जात असल्याच्या प्रकाराबाबत पोलिसांनी विशेष काळजी घेण्याची आवश्यकता असल्याचे काही नागरिकांनी सांगितले़फ ोटो:- १० पीएचएमए ८३ व ८४कायदा व सुव्यवस्थेसाठी मल्हारखाण परिसरात तैनात करण्यात आलेला प्रचंड पोलीस बंदोबस्त़फ ोटो:- १० पीएचएमए ६५ व ६६भीम पगारेच्या हत्त्येनंतर काही गुंडांनी दिलेल्या धमकीनंतर बंद करण्यात आलेली अशोकस्तंभावरील दुकाने़