शहरं
Join us  
Trending Stories
1
AirStrike on Pakistan: मोठी बातमी! ऑपरेशन सिंदूरला सुरुवात; भारताचा पाकिस्तान, पीओकेवर हवाई हल्ला 
2
भारताच्या पाकिस्तानवरील एअर स्ट्राईकवर डोनाल्ड ट्रम्प यांची पहिली प्रतिक्रिया...; 'ते खूप काळापासून लढतायत'
3
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
4
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
5
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
6
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
7
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
8
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
9
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
10
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
11
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
12
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
13
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
14
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
15
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
16
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
17
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
18
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
19
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
20
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  

दुष्काळामुळे ग्रामीण भागात वस्तूंचा खप घटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2016 02:25 IST

गेल्या काही वर्षांपासून कमी होत असलेला पाऊस, त्यातही दोन वर्षांपासून पडत असलेला दुष्काळ याचा विपरीत परिणाम ग्रामीण भागावर झाला असून वस्तूंचा खप कमालीचा घटला आहे.

नवी दिल्ली : गेल्या काही वर्षांपासून कमी होत असलेला पाऊस, त्यातही दोन वर्षांपासून पडत असलेला दुष्काळ याचा विपरीत परिणाम ग्रामीण भागावर झाला असून वस्तूंचा खप कमालीचा घटला आहे. शेतकऱ्यांसोबतच एफएमसीजी आणि फूड सेक्टरवर त्याचा थेट परिणाम झाला आहे.१२ व्या पंचवार्षिक योजनेच्या सुरुवातीच्या चार वर्षांत देशाच्या कृषी विभागाचा विकासाचा दर अवघा १.६ टक्के राहिला. खरे तर हे लक्ष्य ४ टक्के होते. पाऊस कमी पडत असल्याने कृषी क्षेत्रात ही घसरण झाल्याचे केंद्र सरकारचे म्हणणे आहे.कमी पावसामुळे कपाशी, सोयाबीन, ऊस आणि आंबा यांचे उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर प्रतिकूल परिणाम झाला आहे. आंध्र प्रदेश आणि तेलंगणात आंबा हे महत्त्वाचे पीक आहे. दुष्काळामुळे दोन्ही राज्यांत यंदा आंब्याचे उत्पादन घटण्याची शक्यता आहे. कृष्णा जिल्ह्यात यंदा आंब्याचे उत्पादन केवळ ५० टक्के होण्याची शक्यता असल्याचे कृष्णा जिल्ह्याच्या कृषी विभागाच्या सहायक संचालक एन. सुजाता यांनी सांगितले.पाऊस कमी झाल्याने उसाची लागवड कमी होऊन उत्पादनही घटले. त्याचा परिणाम साखर कारखान्यांवर झाला. परिणामत: ऊसतोड कामगार लवकर घरी परतले आणि कारखान्यांचे गाळपही लवकर बंद झाले. दुष्काळग्रस्त भागात आम्हाला आर्थिक वृद्धी दिसत नाही. ग्राहक स्वस्त तेलाकडे वळले आहेत. त्यामुळे चांगल्या तेलाची विक्री घटली आहे.गारपीट, अवकाळीने १.३ कोटी टन गव्हाचे नुकसानअवकाळी पावसासोबत गारपिटीने १.३ कोटी टन गव्हाचे नुकसान होण्याचा अंदाज एका अभ्यासात वर्तविण्यात आला आहे. कदाचित गव्हाची आयात करावी लागेल.असोचेमने याबाबतचा अहवाल जारी केला आहे. त्यात म्हटले आहे की, उत्पादनात घट झाल्याने चलनवाढ होऊ शकते. असोचेमचे महासचिव डी.एस. रावत यांनी सांगितले की, गव्हावरील आयात शुल्क घटवून १० टक्क्यांवरून पाच टक्के करण्याची गरज आहे. तसे झाल्यास खासगी व्यापारी गव्हाची समांतर आयात करतील आणि गहू सहज उपलब्ध होईल, त्यामुळे स्टॉक आणि किमतीवरील दडपणही कमी होईल.९.३ कोटी टन गव्हाचे उत्पादन होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला होता; पण त्यात आता १.३ कोटी टन घट होण्याची शक्यता आहे. सरकारला गव्हाची आयात करण्याचाही विचार करावा लागेल.