शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
2
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
3
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
4
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
5
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
6
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
7
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
8
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
9
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
10
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
11
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
12
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
13
"डोळे आणि मन आज तृप्त झालं...", ठाकरे बंधू एकत्र, मराठी अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
14
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप
15
Navi Mumbai: पत्नीसह सासूलाही कपडे काढायला लावले अन्...; काळ्या जादूच्या नावाखाली जावयाने सर्व मर्यादा ओलांडल्या!
16
ही तरुणी बनणार मंगळावर पाय ठेवणारी पहिली व्यक्ती, कोण आहे एलिसा कार्सन, म्हणते सुखरूप परतले तर...
17
'डियर क्रिकेट... डोन्ट गिव्ह वन मोअर चान्स' असं म्हणायची वेळ! करुण नायर चौथ्या प्रयत्नातही 'नापास'
18
Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस
19
Sushil Kedia Office Vandalise: सुशील केडिया यांच्या मुंबईतील कार्यालयाची तोडफोड, मनसेच्या ५ कार्यकर्त्यांना अटक
20
Himachal Flood : पावसाचे थैमान! ७२ जणांचा मृत्यू, ३७ बेपत्ता; हिमाचलमध्ये ढगफुटीमुळे नुकसान, रेड अलर्ट जारी

दुष्काळामुळे ग्रामीण भागात वस्तूंचा खप घटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2016 02:25 IST

गेल्या काही वर्षांपासून कमी होत असलेला पाऊस, त्यातही दोन वर्षांपासून पडत असलेला दुष्काळ याचा विपरीत परिणाम ग्रामीण भागावर झाला असून वस्तूंचा खप कमालीचा घटला आहे.

नवी दिल्ली : गेल्या काही वर्षांपासून कमी होत असलेला पाऊस, त्यातही दोन वर्षांपासून पडत असलेला दुष्काळ याचा विपरीत परिणाम ग्रामीण भागावर झाला असून वस्तूंचा खप कमालीचा घटला आहे. शेतकऱ्यांसोबतच एफएमसीजी आणि फूड सेक्टरवर त्याचा थेट परिणाम झाला आहे.१२ व्या पंचवार्षिक योजनेच्या सुरुवातीच्या चार वर्षांत देशाच्या कृषी विभागाचा विकासाचा दर अवघा १.६ टक्के राहिला. खरे तर हे लक्ष्य ४ टक्के होते. पाऊस कमी पडत असल्याने कृषी क्षेत्रात ही घसरण झाल्याचे केंद्र सरकारचे म्हणणे आहे.कमी पावसामुळे कपाशी, सोयाबीन, ऊस आणि आंबा यांचे उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर प्रतिकूल परिणाम झाला आहे. आंध्र प्रदेश आणि तेलंगणात आंबा हे महत्त्वाचे पीक आहे. दुष्काळामुळे दोन्ही राज्यांत यंदा आंब्याचे उत्पादन घटण्याची शक्यता आहे. कृष्णा जिल्ह्यात यंदा आंब्याचे उत्पादन केवळ ५० टक्के होण्याची शक्यता असल्याचे कृष्णा जिल्ह्याच्या कृषी विभागाच्या सहायक संचालक एन. सुजाता यांनी सांगितले.पाऊस कमी झाल्याने उसाची लागवड कमी होऊन उत्पादनही घटले. त्याचा परिणाम साखर कारखान्यांवर झाला. परिणामत: ऊसतोड कामगार लवकर घरी परतले आणि कारखान्यांचे गाळपही लवकर बंद झाले. दुष्काळग्रस्त भागात आम्हाला आर्थिक वृद्धी दिसत नाही. ग्राहक स्वस्त तेलाकडे वळले आहेत. त्यामुळे चांगल्या तेलाची विक्री घटली आहे.गारपीट, अवकाळीने १.३ कोटी टन गव्हाचे नुकसानअवकाळी पावसासोबत गारपिटीने १.३ कोटी टन गव्हाचे नुकसान होण्याचा अंदाज एका अभ्यासात वर्तविण्यात आला आहे. कदाचित गव्हाची आयात करावी लागेल.असोचेमने याबाबतचा अहवाल जारी केला आहे. त्यात म्हटले आहे की, उत्पादनात घट झाल्याने चलनवाढ होऊ शकते. असोचेमचे महासचिव डी.एस. रावत यांनी सांगितले की, गव्हावरील आयात शुल्क घटवून १० टक्क्यांवरून पाच टक्के करण्याची गरज आहे. तसे झाल्यास खासगी व्यापारी गव्हाची समांतर आयात करतील आणि गहू सहज उपलब्ध होईल, त्यामुळे स्टॉक आणि किमतीवरील दडपणही कमी होईल.९.३ कोटी टन गव्हाचे उत्पादन होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला होता; पण त्यात आता १.३ कोटी टन घट होण्याची शक्यता आहे. सरकारला गव्हाची आयात करण्याचाही विचार करावा लागेल.