शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
3
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
4
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
5
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
6
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
7
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
8
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
9
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
10
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
11
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
12
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
13
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
14
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
15
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
16
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
17
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
18
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान
19
मान्सून निकोबार बेटांवर दाखल; आपल्याकडे केव्हापर्यंत पोहोचेल? गेल्या १७ वर्षांत...
20
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या

यंदाही दुष्काळाचेच ढग, अपुऱ्या मान्सूनची शक्यता

By admin | Updated: June 2, 2015 23:37 IST

तीव्र उन्हाच्या झळांनी काहिली वाढली असताना लवकर पाऊस पडण्याची आस लावून बसलेल्यांना लवकर बरसणारा मान्सून दिलासा देऊ शकतो

नवी दिल्ली : तीव्र उन्हाच्या झळांनी काहिली वाढली असताना लवकर पाऊस पडण्याची आस लावून बसलेल्यांना लवकर बरसणारा मान्सून दिलासा देऊ शकतो, मात्र पाऊस सामान्यापेक्षा कमी राहणार असल्याचा हवामान खात्याने वर्तवलेला सुधारित अंदाज आधीच पिचलेल्या शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळवू शकतो. यावर्षी ‘अपुऱ्या’ (डिफिशियन्ट) पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला असल्याचे केंद्रीय पृथ्वी विज्ञान मंत्री हर्षवर्धन यांनी मंगळवारी येथे पत्रकारांना सांगितले. हवामान खात्याने यापूर्वी दीर्घकालीन सरासरीच्या आधारे (एलपीए) ९३ टक्के पावसाचा अंदाज व्यक्त केला होता. सुधारित अंदाजानुसार ही आकडेवारी ८८ टक्क्यांपर्यंत राहणार असल्यामुळे दुष्काळाचे सावट घोंगावू लागले आहे. वायव्य भारताला दुष्काळाचा सर्वाधिक फटका बसू शकतो. एप्रिलमध्ये हवामान खात्याने (आयएमडी) सामान्यापेक्षा कमी म्हणजे ९३ टक्के पावसाचा अंदाज वर्तवला होता. आता ही सरासरी ८८ टक्क्यांवर आल्यामुळे अपुऱ्या मान्सूनच्या श्रेणीत मोडली गेली आहे. दरम्यान, सुधारीत हवामान अंदाजाच्या पार्श्वभूमीवर केंद्राने ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी राज्यांना तयारीला लागण्याचे निर्देश दिले आहे.मान्सूनला आधीच विलंब झाला असून ही बाब शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी आहे. खरीप पिके नैऋत्य मान्सूनवर अवलंबून असतात. अपुऱ्या पावसाचा परिणाम भातरोवणीवर व तांदळाच्या उत्पादनावर होतो. देशाची ६० टक्के लोकसंख्या शेतीसंबंधी रोजगारावर निर्भर असून देशातील केवळ ४० टक्के शेती सिंचनाखाली आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)