शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
2
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
3
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
4
Vat Purnima 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!
5
राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला
6
मुंब्रा ट्रेन अपघातावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले- "रोज सकाळी हजारो प्रवासी..."
7
Viral Video : मुलीला इम्प्रेस करायला गेला अन् पचका झाला! तरुणाचा व्हिडीओ बघून तुम्हीही म्हणाल अरेरे..
8
३००० गाड्या वाहून नेणाऱ्या जहाजाला भीषण आग! ७५० इलेक्ट्रिक कार धोक्यात; आगीचं नेमकं कारण काय?
9
Sonam Raghuvanshi : नेपाळला पळून जाण्याचा होता सोनमचा प्लॅन?, कोणीही ओळखू नये म्हणून 'अशी' लढवली शक्कल
10
ज्योतिष्याची 'ती' भविष्यवाणी खरी ठरली; राजा-सोनम लग्नाआधी अन् नंतर काय घडले?
11
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
12
'छावा'नंतर महाराष्ट्रातील 'या' तमाशा कलावंतावर लक्ष्मण उतेकर बनवणार सिनेमा? श्रद्धा कपूर साकारणार भूमिका
13
Vat Purnima 2025 Wishes: वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! जोडीदाराला पाठवा आणि स्टेटसला ठेवा 'हे' प्रेमळ संदेश
14
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
15
'रेल्वे मंत्री आहेत की रील मंत्री?' मुंबई रेल्वे दुर्घटनेवरून आदित्य ठाकरेंची केंद्रावर टीका
16
मुंबईला जाणाऱ्या मालवाहू जहाजात स्फोट, ५० कंटेनर समुद्रात पडले; ४ कर्मचारी बेपत्ता
17
ना युक्रेन, ना ब्रिटन, 'हा' देश रशियाचा शत्रू नंबर वन; हिटलरशी आहे थेट कनेक्शन, कारण...
18
भारताच्या कंपन्यांवर टाळं लावण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानचा मित्र चीन! आपली काय आहे तयारी?
19
परप्रातांमधून मुंबईत आदळणारे लोंढेच जबाबदार; मुंबईत मुंब्रा घटनेवरून राज ठाकरेंचा संताप
20
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशीची हत्या करणारे हेच ते; आरोपींचे फोटो आले समोर, सोनमसोबत रचला भयंकर कट

दुष्काळामुळे अर्थव्यवस्थेवर 6 लाख 50 हजार कोटींचा बोजा

By admin | Updated: May 11, 2016 18:07 IST

देशातली जवळपास 10 राज्यं ही दुष्काळात होरपळत असून, त्याचा प्रभाव देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडतो आहे.

 ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 11- गेल्या दोन वर्षांपासून देशातली अनेक राज्यं दुष्काळात भरडून निघाली आहेत. पावसाचं अत्यल्प प्रमाण, पाणीटंचाई  आणि धरणांनी गाठलेला तळ या परिस्थितीमुळे 10 राज्यांवर दुष्काळाचं सावट येऊन ठेपलं आहे.  महाराष्ट्र आणि कर्नाटकसारखी राज्यंही या दुष्काळापासून वाचू शकली नाहीत. 
टाइम्स ऑफ इंडियानं केलेल्या सर्व्हेनुसार, देशातली जवळपास 10 राज्यं ही दुष्काळात होरपळत असून, त्याचा प्रभाव देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडतो आहे. दुष्काळामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर 6 लाख 50 हजार कोटींचा बोजा पडला आहे. 256 जिल्ह्यांतले 33 कोटी लोक या दुष्काळामुळे मरणपंथाला लागले आहेत. दुष्काळामुळे राष्ट्रीय अर्थव्यवस्थेवर 6 लाख 50 हजार कोटी ते 1 लाख कोटींचा बोजा पडल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दुष्काळाचा गेल्या 6 महिन्यांपासून अर्थव्यवस्थेवर प्रभाव पडतो आहे, अशी माहिती मिळाली आहे. या वर्षी पाऊस वेळेनुरुप पडण्याचा अंदाजही हवामान खात्यानं वर्तवला असल्यानं शेतक-यांना काहीचा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. 
सरकार दुष्काळग्रस्तांना पाणी, अन्न आणि आरोग्याच्या सुविधेसाठी प्रतिमाणसी 3 हजारांची मदत करते. जवळपास 33 कोटी दुष्काळग्रस्त हे जोखीम पत्करून जगत आहेत. प्रत्येक महिन्याला दुष्काळग्रस्तांसाठी अर्थव्यवस्थेवर 1 लाख कोटींचा बोजा पडतो, अशी माहिती टाइम्स ऑफ इंडियाच्या सर्व्हेतून समोर आली आहे. दुस-या बाजूनं विजेवर दिलेलं अनुदान, स्वस्त दरात उपलब्ध करून दिलेली खतं यामुळे अर्थव्यवस्थेला भुर्दंड पडतो आहे. तसेच दुष्काळग्रस्तांचा शहराकडे वाढलेल्या लोढ्यांमुळेही सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अर्थव्यवस्थेवर दबाव पडतो आहे. दुष्काळाचा शेतक-यांच्या मुलं आणि पत्नींच्या आरोग्यावर दुष्परिणाम होतो असल्याची माहिती सर्व्हेतून समोर आली आहे. दुष्काळामुळे अर्थव्यवस्थेवरचा फुगवटा दिवसेंदिवस वाढत चालला आहे.