शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
4
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
5
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
6
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
7
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
8
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
9
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
10
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
11
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
12
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
13
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
14
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
15
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
16
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
17
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
18
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
19
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
20
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळामुळे अर्थव्यवस्थेवर 6 लाख 50 हजार कोटींचा बोजा

By admin | Updated: May 11, 2016 18:07 IST

देशातली जवळपास 10 राज्यं ही दुष्काळात होरपळत असून, त्याचा प्रभाव देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडतो आहे.

 ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 11- गेल्या दोन वर्षांपासून देशातली अनेक राज्यं दुष्काळात भरडून निघाली आहेत. पावसाचं अत्यल्प प्रमाण, पाणीटंचाई  आणि धरणांनी गाठलेला तळ या परिस्थितीमुळे 10 राज्यांवर दुष्काळाचं सावट येऊन ठेपलं आहे.  महाराष्ट्र आणि कर्नाटकसारखी राज्यंही या दुष्काळापासून वाचू शकली नाहीत. 
टाइम्स ऑफ इंडियानं केलेल्या सर्व्हेनुसार, देशातली जवळपास 10 राज्यं ही दुष्काळात होरपळत असून, त्याचा प्रभाव देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडतो आहे. दुष्काळामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर 6 लाख 50 हजार कोटींचा बोजा पडला आहे. 256 जिल्ह्यांतले 33 कोटी लोक या दुष्काळामुळे मरणपंथाला लागले आहेत. दुष्काळामुळे राष्ट्रीय अर्थव्यवस्थेवर 6 लाख 50 हजार कोटी ते 1 लाख कोटींचा बोजा पडल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दुष्काळाचा गेल्या 6 महिन्यांपासून अर्थव्यवस्थेवर प्रभाव पडतो आहे, अशी माहिती मिळाली आहे. या वर्षी पाऊस वेळेनुरुप पडण्याचा अंदाजही हवामान खात्यानं वर्तवला असल्यानं शेतक-यांना काहीचा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. 
सरकार दुष्काळग्रस्तांना पाणी, अन्न आणि आरोग्याच्या सुविधेसाठी प्रतिमाणसी 3 हजारांची मदत करते. जवळपास 33 कोटी दुष्काळग्रस्त हे जोखीम पत्करून जगत आहेत. प्रत्येक महिन्याला दुष्काळग्रस्तांसाठी अर्थव्यवस्थेवर 1 लाख कोटींचा बोजा पडतो, अशी माहिती टाइम्स ऑफ इंडियाच्या सर्व्हेतून समोर आली आहे. दुस-या बाजूनं विजेवर दिलेलं अनुदान, स्वस्त दरात उपलब्ध करून दिलेली खतं यामुळे अर्थव्यवस्थेला भुर्दंड पडतो आहे. तसेच दुष्काळग्रस्तांचा शहराकडे वाढलेल्या लोढ्यांमुळेही सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अर्थव्यवस्थेवर दबाव पडतो आहे. दुष्काळाचा शेतक-यांच्या मुलं आणि पत्नींच्या आरोग्यावर दुष्परिणाम होतो असल्याची माहिती सर्व्हेतून समोर आली आहे. दुष्काळामुळे अर्थव्यवस्थेवरचा फुगवटा दिवसेंदिवस वाढत चालला आहे.