शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
2
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
3
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
4
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
5
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
6
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
7
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
8
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
9
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
10
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
11
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
12
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
13
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
14
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
15
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
16
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
17
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
18
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
19
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
20
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळामुळे अर्थव्यवस्थेवर 6 लाख 50 हजार कोटींचा बोजा

By admin | Updated: May 11, 2016 18:07 IST

देशातली जवळपास 10 राज्यं ही दुष्काळात होरपळत असून, त्याचा प्रभाव देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडतो आहे.

 ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 11- गेल्या दोन वर्षांपासून देशातली अनेक राज्यं दुष्काळात भरडून निघाली आहेत. पावसाचं अत्यल्प प्रमाण, पाणीटंचाई  आणि धरणांनी गाठलेला तळ या परिस्थितीमुळे 10 राज्यांवर दुष्काळाचं सावट येऊन ठेपलं आहे.  महाराष्ट्र आणि कर्नाटकसारखी राज्यंही या दुष्काळापासून वाचू शकली नाहीत. 
टाइम्स ऑफ इंडियानं केलेल्या सर्व्हेनुसार, देशातली जवळपास 10 राज्यं ही दुष्काळात होरपळत असून, त्याचा प्रभाव देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडतो आहे. दुष्काळामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर 6 लाख 50 हजार कोटींचा बोजा पडला आहे. 256 जिल्ह्यांतले 33 कोटी लोक या दुष्काळामुळे मरणपंथाला लागले आहेत. दुष्काळामुळे राष्ट्रीय अर्थव्यवस्थेवर 6 लाख 50 हजार कोटी ते 1 लाख कोटींचा बोजा पडल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दुष्काळाचा गेल्या 6 महिन्यांपासून अर्थव्यवस्थेवर प्रभाव पडतो आहे, अशी माहिती मिळाली आहे. या वर्षी पाऊस वेळेनुरुप पडण्याचा अंदाजही हवामान खात्यानं वर्तवला असल्यानं शेतक-यांना काहीचा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. 
सरकार दुष्काळग्रस्तांना पाणी, अन्न आणि आरोग्याच्या सुविधेसाठी प्रतिमाणसी 3 हजारांची मदत करते. जवळपास 33 कोटी दुष्काळग्रस्त हे जोखीम पत्करून जगत आहेत. प्रत्येक महिन्याला दुष्काळग्रस्तांसाठी अर्थव्यवस्थेवर 1 लाख कोटींचा बोजा पडतो, अशी माहिती टाइम्स ऑफ इंडियाच्या सर्व्हेतून समोर आली आहे. दुस-या बाजूनं विजेवर दिलेलं अनुदान, स्वस्त दरात उपलब्ध करून दिलेली खतं यामुळे अर्थव्यवस्थेला भुर्दंड पडतो आहे. तसेच दुष्काळग्रस्तांचा शहराकडे वाढलेल्या लोढ्यांमुळेही सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अर्थव्यवस्थेवर दबाव पडतो आहे. दुष्काळाचा शेतक-यांच्या मुलं आणि पत्नींच्या आरोग्यावर दुष्परिणाम होतो असल्याची माहिती सर्व्हेतून समोर आली आहे. दुष्काळामुळे अर्थव्यवस्थेवरचा फुगवटा दिवसेंदिवस वाढत चालला आहे.