शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
3
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
4
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
5
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
6
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
7
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
8
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
9
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
10
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
11
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
12
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
13
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
14
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
15
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
16
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
17
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
18
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
19
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
20
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर

कर्तृत्वास संकटांमुळे झळाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2017 07:21 IST

काँग्रेसमधील फूट परिस्थितीने इंदिराजींवर लादली. व्ही. व्ही. गिरी यांना डावलून सिंडिकेटने नीलम संजीव रेड्डी यांची उमेदवारी एकतर्फी ठरविली नसती, तर काँग्रेस फुटली नसती.

-प्रेम शंकर झा(ज्येष्ठ पत्रकार)काँग्रेसमधील फूट परिस्थितीने इंदिराजींवर लादली. व्ही. व्ही. गिरी यांना डावलून सिंडिकेटने नीलम संजीव रेड्डी यांची उमेदवारी एकतर्फी ठरविली नसती, तर काँग्रेस फुटली नसती. काँग्रेस अध्यक्ष एस. निजिलिंगप्पा यांनी पदावरील पंतप्रधानांना पक्षातून काढण्याचा निर्णय घेतला तेव्हा इंदिराजींना ताकद दाखवावी लागली. यात स्वार्थ होता, असे टीकाकार म्हणतात. पण पक्षाहून पंतप्रधानपदाचे व पक्ष संघटनेहून संसदीय पक्षाचे श्रेष्ठत्व प्रस्थापित करण्यासाठी त्यांना बंड पुकारणे भग पडले.इंदिरा गांधी या भारताच्या सर्वाधिक करिष्माई पंतप्रधान होत्या, तशाच वादग्रस्तही. काँग्रेसमध्ये दोन वेळा पाडलेली फूट, सत्ता स्वत:च्या हातात केंद्रित करण्यासाठी स्वपक्षीय मुख्यमंत्र्यांना वारंवार बदलणे आणि आणीबाणी लादणे यावरून त्यांच्यावर लोकशाही खिळखिळी केल्याची टीका होते. देशाची आर्थिक धोरणे पार डाव्या टोकाला नेल्याबद्दल अर्थतज्ज्ञ त्यांना दोष देतात. पण माझ्या मते यापैकी कोणत्याही कारणावरून इंदिराजींना व्यक्तिश: दोष देणे अन्यायाचे होईल. उलट मी म्हणेन की हे सर्व टीकेचे मुद्दे त्या वेळी देशापुढे वा काँग्रेसपुढे उभी ठाकलेली गंभीर संकटे होती. यांवर इंदिराजींनी मात केल्यानेच त्यांच्या कर्तृत्वास झळाली आली.इंदिराजींच्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वामुळे, आता मागे वळून पाहताना, त्यांनी सत्ता स्वीकारली तेव्हाची परिस्थिती किती कठीण होती, याची आपल्याला कल्पनाही येत नाही. अन्नधान्याची टंचाई, १९६२ व १९६५ मधील लागोपाठची दोन युद्धे, १९६५ चा भीषण दुष्काळ आणि आकाशाला भिडलेली महागाई व चलनवाढ यामुळे भारताची भुकेकंगाल अवस्था झाली होती. अशा वेळी इंदिराजींनी सत्तासूत्रे स्वीकारली तेव्हा त्यांच्यापुढील काँग्रेसमधील आव्हानेही कमी नव्हती. नेहरूंचा करिष्मा आणि मोराराजी देसार्इंपेक्षा जरा मवाळ म्हणून पक्षातील सिंडिकेटने त्यांची निवड केली, असे बहुतेकांना वाटते. पण नेहरूंच्या समाजवादी कारभाराने पक्षनेत्यांचा भ्रमनिरास झाला होता, हेही त्यामागचे एक कारण होते. इंदिराजींनी लगेचच रुपयाचे ५७ टक्के अवमूल्यन करून आपले धाडसी रूप दाखवून दिले. त्यानंतर हरित क्रांतीने भारताची स्थिती स्थिरस्थावर झाली.सन १९७१ च्या निवडणुकीनंतर काही दिवसांतच बांगलादेशचे संकट उभे ठाकले आणि इंदिराजींनी पंतप्रधान कसा कणखर हवा, हे दाखवून दिले. प्रचंड देशाभिमान व सुस्पष्ट दृष्टिकोन याचे ते उदाहरण होते. पूर्व पाकिस्तानातून आलेले एक कोटी निर्वासित निमूटपणे सामावून घ्यावे, यासाठी पाश्चात्त्य नेते भारतावर दबाव आणत होते. पाकिस्तानचे तुकडे करण्याचे इंदिराजींनी आधीपासूनच पक्के ठरविले होते, असा सर्वमान्य समज आहे. पण तो बरोबर नाही.निर्वासितांचे लोंढे असह्य झाले तेव्हा त्यांनी निवडणुकीचा निकाल मान्य करून अवामी लीगला पाकिस्तानमध्ये सरकार स्थापन करू द्यावे, यासाठी जनरल याह्या खान यांचे मन वळविण्याचा आपल्या परीने खूप प्रयत्न केला. त्यात अपयश आले तेव्हा शेख मुजिबुर रेहमान यांच्या सुटकेसाठी पाकिस्तानवर दबाव आणण्याकरता त्यांनी अनेक प्रमुख देशांमध्ये दूत पाठविले व स्वत:ही अनेक युरोपीय देश व अमेरिकेत जाऊन प्रयत्न केले. पण हे प्रयत्न फसलेच तर नाइलाजाने पूर्व पाकिस्तानवर चाल करण्याची दुसरी पर्यायी योजना त्यांनी तयार करून ठेवली. त्याचाच भाग म्हणून त्यांनी मुक्ती वाहिनीला प्रशिक्षण देण्याचे निर्देश भारतीय लष्करास दिले.अशा प्रकारे प्रसंगी गाजर दाखवून किंवा दंडुका उगारून आपला हेतू जिद्दीने साध्य करून घेण्याची इंदिराजींची ही दुसरी वेळ होती. दोन्ही वेळा त्यांना यश आले. आधी व्ही. व्ही. गिरी यांची राष्ट्रपतीपदी निवड व नंतर बांगलादेशची निर्मिती हे त्याचे फलित होते. दोन्ही वेळेला त्यांनी नाइलाजाने शेवटचा उपाय म्हणून बळाचा वापर केला, असे दिसते.

टॅग्स :Indira Gandhi Birth Centenary Yearइंदिरा गांधी जन्मशताब्दी वर्ष