शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
3
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
4
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
5
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
6
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
7
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
8
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
9
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
10
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
11
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
12
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
13
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
14
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
15
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
16
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
17
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
18
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
19
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
20
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अशोक चव्हाणांमुळे मुंबईतील आघाडी संपुष्टात

By admin | Updated: January 21, 2017 02:10 IST

सुनील तटकरे :

सुनील तटकरे :
- जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये आघाडीबाबत चर्चा सुरू
रत्नागिरी : कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यामुळेच मुंबई महानगरपालिका निवडणुकीतील कॉँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची शक्यता संपुष्टात आली आहे, असा आरोप राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांनी शुक्रवारी येथे पत्रकार परिषदेत केला. मुंबईसाठीच्या आघाडीचा विषय आता आमच्यासाठी संपला आहे, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.
राज्यातील महापालिका, जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका दोन टप्प्यांत होणार आहेत. त्याबाबतचा कार्यक्रमही जाहीर झाला आहे. याबाबत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी तसेच कोकण शिक्षक मतदार संघात निवडणूक लढविणारे पुरोगामी आघाडीचे बाळाराम पाटील यांच्या निवडणुकीच्या तयारीसाठी ते रत्नागिरीत आले होते.
या पत्रकार परिषदेला शेकापचे आमदार जयंत पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष शेखर निकम, उपाध्यक्ष बाबाजी जाधव, आमदार संजय कदम, रत्नागिरीचे माजी नगराध्यक्ष उमेश शेट्ये, पक्षाच्या अल्पसंख्याक सेलचे नेते बशीर मुर्तुझा उपस्थित होते.
तटकरे म्हणाले की, मुंबई महानगरपालिकेत काँग्रेसशी आघाडी करण्याची राष्ट्रवादीची इच्छा होती. पण अशोक चव्हाण यांच्यामुळे ती तुटली आहे. राज्यातील जिल्हा परिषदा व पंचायत समिती निवडणुकीसाठी मात्र राष्ट्रवादी, कॉँग्रेस व शेकापची आघाडी होणार आहे. काही जिल्‘ात स्थानिक पातळीवर कॉँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी झाली आहे. काही ठिकाणी चर्चा सुरू आहे. राज्यभरात या निवडणुकीसाठी आघाडी व्हावी यासाठी कॉँग्रेसबरोबर एक बैठक झाली आहे. दुसर्‍या टप्प्यातील संसदीय बोर्डाची बैठक येत्या २५ जानेवारीला होणार आहे. येत्या चार दिवसांत आघाडीबाबतचा निर्णय अपेक्षित असल्याचे तटकरे म्हणाले. या आघाडीत शेतकरी कामगार पक्षही सहभागी होत असल्याचे तटकरे म्हणाले. यावेळी उपस्थित शेकापचे आमदार जयंत पाटील यांनी त्याला दुजोरा दिला.

चौकट
टिष्ट्वटरवर केवळ टिव टिव...
गेली दोन वर्ष ३ महिन्याच्या काळात केंद्रात व राज्यातही सत्ताधार्‍यांनी टिष्ट्वटरवरून विकासकामांबाबत अनेकवेळा टिष्ट्वट केले. हे आश्वासनांचे बुडबुडे केव्हाच फुटले आहेत. सत्ताधार्‍यांचे हे टिष्ट्वट म्हणजे केवळ टिव टिव ठरल्याची टीका सुनील तटकरे यांनी केली.

चौकट
नोटाबंदीने शेतकरी उद्ध्वस्त...
नोटाबंदीच्या निर्णयाची अंमलबजावणी योग्यरित्या न झाल्याने हा निर्णय फसला आहे. त्यामुळे अर्थव्यवस्था कोलमडली असून, विकासदर २ टक्क्यांनी घटला आहे. शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. कामगारांवर बेकारीचे संकट आले आहे. चुकीचे निर्णय ह˜ाने राबविल्याचे हे फलित आहे, असा आरोप तटकरे यांनी केला.