शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
2
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
3
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
4
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
5
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
6
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
7
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
8
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
9
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
10
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
11
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
12
निमिषा प्रियासाठी सरकार जनतेकडून ८ कोटी मागत आहे? परराष्ट्र मंत्रालयाने सत्य सांगितले
13
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
14
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार
15
काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
16
ऑनलाइन बेटिंग आता दंडनीय गुन्हा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा गेमिंग विधेयकाला हिरवा कंदील
17
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
18
Viral Video : तरुणीने ट्रक चालकाशी बांधली लग्नगाठ; स्वतः सांगितलं भन्नाट कारण! व्हिडीओ होतोय व्हायरल
19
KBC च्या हॉट सीटवर अमिताभ बच्चन यांच्यासोबत खेळण्याची सुवर्णसंधी! BHIM App वर अशी करा नोंदणी
20
पत्नीचा संशयास्पद मृत्यू, अनेक महिलांशी संबंध...निळ्या ड्रम प्रकरणातील आरोपी प्रियकराचा 'कारनामा'

अशोक चव्हाणांमुळे मुंबईतील आघाडी संपुष्टात

By admin | Updated: January 21, 2017 02:10 IST

सुनील तटकरे :

सुनील तटकरे :
- जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये आघाडीबाबत चर्चा सुरू
रत्नागिरी : कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यामुळेच मुंबई महानगरपालिका निवडणुकीतील कॉँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची शक्यता संपुष्टात आली आहे, असा आरोप राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांनी शुक्रवारी येथे पत्रकार परिषदेत केला. मुंबईसाठीच्या आघाडीचा विषय आता आमच्यासाठी संपला आहे, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.
राज्यातील महापालिका, जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका दोन टप्प्यांत होणार आहेत. त्याबाबतचा कार्यक्रमही जाहीर झाला आहे. याबाबत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी तसेच कोकण शिक्षक मतदार संघात निवडणूक लढविणारे पुरोगामी आघाडीचे बाळाराम पाटील यांच्या निवडणुकीच्या तयारीसाठी ते रत्नागिरीत आले होते.
या पत्रकार परिषदेला शेकापचे आमदार जयंत पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष शेखर निकम, उपाध्यक्ष बाबाजी जाधव, आमदार संजय कदम, रत्नागिरीचे माजी नगराध्यक्ष उमेश शेट्ये, पक्षाच्या अल्पसंख्याक सेलचे नेते बशीर मुर्तुझा उपस्थित होते.
तटकरे म्हणाले की, मुंबई महानगरपालिकेत काँग्रेसशी आघाडी करण्याची राष्ट्रवादीची इच्छा होती. पण अशोक चव्हाण यांच्यामुळे ती तुटली आहे. राज्यातील जिल्हा परिषदा व पंचायत समिती निवडणुकीसाठी मात्र राष्ट्रवादी, कॉँग्रेस व शेकापची आघाडी होणार आहे. काही जिल्‘ात स्थानिक पातळीवर कॉँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी झाली आहे. काही ठिकाणी चर्चा सुरू आहे. राज्यभरात या निवडणुकीसाठी आघाडी व्हावी यासाठी कॉँग्रेसबरोबर एक बैठक झाली आहे. दुसर्‍या टप्प्यातील संसदीय बोर्डाची बैठक येत्या २५ जानेवारीला होणार आहे. येत्या चार दिवसांत आघाडीबाबतचा निर्णय अपेक्षित असल्याचे तटकरे म्हणाले. या आघाडीत शेतकरी कामगार पक्षही सहभागी होत असल्याचे तटकरे म्हणाले. यावेळी उपस्थित शेकापचे आमदार जयंत पाटील यांनी त्याला दुजोरा दिला.

चौकट
टिष्ट्वटरवर केवळ टिव टिव...
गेली दोन वर्ष ३ महिन्याच्या काळात केंद्रात व राज्यातही सत्ताधार्‍यांनी टिष्ट्वटरवरून विकासकामांबाबत अनेकवेळा टिष्ट्वट केले. हे आश्वासनांचे बुडबुडे केव्हाच फुटले आहेत. सत्ताधार्‍यांचे हे टिष्ट्वट म्हणजे केवळ टिव टिव ठरल्याची टीका सुनील तटकरे यांनी केली.

चौकट
नोटाबंदीने शेतकरी उद्ध्वस्त...
नोटाबंदीच्या निर्णयाची अंमलबजावणी योग्यरित्या न झाल्याने हा निर्णय फसला आहे. त्यामुळे अर्थव्यवस्था कोलमडली असून, विकासदर २ टक्क्यांनी घटला आहे. शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. कामगारांवर बेकारीचे संकट आले आहे. चुकीचे निर्णय ह˜ाने राबविल्याचे हे फलित आहे, असा आरोप तटकरे यांनी केला.