शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रा जिथे जिथे जाऊन आली तिथे तिथे पाकिस्तानचे ऑपरेशन सिंदूरवेळी हल्ले? गोल्डन टेंपल, पठाणकोट अन् काश्मीर...
2
कधीकाळी पाकिस्तानात राहत होते ज्योती मल्होत्राचे कुटुंब?; तपासात समोर आली नवी माहिती
3
"बिहार निवडणुकीसाठी भाजपाची खेळी..."; पहलगाम हल्ल्यावर काय म्हणाले यशवंत सिन्हा?
4
“मुंबईकर उद्धव ठाकरेंना त्यांची जागा दाखवतील, मविआच्या ५० जागाही येणार नाही”; भाजपाचा दावा
5
सुरक्षा दलांकडून नक्षलवाद्यांवर आणखी एक मोठा प्रहार, चकमकीत २६ नक्षली ठार
6
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'ची पहिली झलक समोर, 'या' दिवशी प्रदर्शित होणार चित्रपट
7
अबुझमाडमध्ये २७ नक्षल्यांना कंठस्नान; पाेलीस शहीद, १ काेटी बक्षीस असलेल्या बसवा राजूचा खात्मा
8
तुर्की अन् अझरबैजानला धक्का; भारताने आर्मेनियासोबत केला आकाश 1-एस क्षेपणास्त्र करार
9
इंग्रजी फाडफाड येत नाही, प्रश्नच मिटला! तुम्ही बोला, गुगल समोरच्याला त्याच्या भाषेत ऐकवणार...
10
पूजा खेडकर हिला मोठा दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून अटकपूर्व जामीन मंजूर
11
Jyoti Malhotra : "पाकिस्तानात माझं लग्न करुन द्या"; ज्योती मल्होत्राचं अली हसनसोबतच व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल
12
सोनिया आणि राहुल गांधी यांना झाला १४२ कोटींचा फायदा, नॅशनल हेराल्ड प्रकरणी ईडीचा कोर्टात आरोप   
13
मुलांचं लग्न जमवताना एकमेकांच्या प्रेमात पडले व्याही आणि विहीण! लग्नासाठी कोर्टात पोहोचले पण... 
14
डॉक्टर की कसाई...! ५० जणांच्या हत्येनंतरही हात थरथरले नाहीत; अंगावर काटा आणणारी थरारक घटना
15
'एक नंबर तुझी कंबर' व्हायरल गाण्यावर नारकर कपलचा डान्स, व्हिएतनाममधून शेअर केला Video
16
Mumbai Rains: मुंबईत पावसाचा हाहाकार! पवईत झाड कोसळल्याने दोन जण जखमी, एकाची प्रकृती गंंभीर
17
'ऑपरेशन सिंदूर'बाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या प्रा. अली खानला अंतरिम जामीन मंजूर
18
बापरे! गर्लफ्रेंड आहे की डाकू, बॉयफ्रेंडला रस्त्यात अडवला, कपडे फाटेपर्यंत चप्पलने मारले; छातीवर बसून गळा ...
19
“SCचे टॉप ५ जज सुट्ट्यांमध्ये कामावर, तरी प्रलंबित याचिकांचे खापर आमच्यावर”; CJI गवई संतापले
20
Mangal Gochar 2025: जूनमध्ये कुंजकेतू योग संघर्ष वाढवणार, 'या' पाच राशींना अधिक सतर्क राहावे लागणार!

पिण्याचं सोडा, आंघोळीच्या योग्यही नाही गंगेचं पाणी

By admin | Updated: May 18, 2017 12:28 IST

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्डाने एका आरटीआयला उत्तर देताना सांगितलं आहे की, हरिद्वारमध्ये गंगेचं पाणी आंघोळीसाठीही योग्य नाही

ऑनलाइन लोकमत
देहरादून, दि. 18 - गंगेत आंघोळ केल्याने तुमचं पाप धुतलं जातं की नाही हे सांगणं कठीण आहे, पण या पाण्यामुळे तुम्ही आजारी पडाल एवढं मात्र नक्की. हरिद्वारला गेल्यानंतर गंगेत डुबकी मारल्यानंतर कदातिच तुम्हाला चांगलं वाटेल, मात्र हे पानी इतकं प्रदूषित आहे की प्यायचं सोडा, साधं आंघोळीच्या योग्यही नाही आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्डाने एका आरटीआयला उत्तर देताना सांगितलं आहे की, हरिद्वारमध्ये गंगेचं पाणी आंघोळीसाठीही योग्य नाही. 
 
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार गंगेचं पाणी सर्व दृष्टीने असुरक्षित आहे. अधिकृत आकडेवारीनुार हरिद्वार किनारी असलेल्या 20 घाटांवर रोज तब्बल 50 हजार ते एक लाख भक्त गंगेत डुबकी घेत स्नान करत असतात. 
 
उत्तराखंडमधील गंगोत्रीपासून ते हरिद्वारपर्यंत 11 ठिकाणी पाण्याची गुणवत्ता तपासण्यासाठी नमुने घेण्यात आले होते. 294 किमी परिसरातील 11 ठिकाणांची यासाठी निवड करण्यात आली. इतक्या मोठ्या प्रमाणात पाण्याची गुणवत्ता तपासण्यासाठी चार प्रमुख गोष्टींकडे लक्ष देण्यात आलं, ज्यामध्ये तापमान, पाण्यात मिसळलेला ऑक्सिजन, बायलॉजिकल ऑक्सिजन डिमांड (BOD) आणि कॉलिफॉर्म (बॅक्टेरिया) यांचा समावेश होता. हरिद्वारजवळील गंगेच्या पाण्यात BOD, कॉलिफॉर्म आणि काही विषारी घटक आढळले आहेत. 
 
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्डाच्या नियमांनुसार आंघोळीच्या एक लिटर पाण्यात BOD ची क्षमात किमान 3 मिलीग्रामपेक्षा कमी असली पाहिजे. मात्र इथे हा स्तर 6.4 मिलीग्राम आहे. अनेक ठिकाणी कॉलिफॉर्मचं प्रमाणदेखील जास्त आढळलं आहे. जिथे पाण्यात कॉलिफॉर्मचं प्रमाण 90 एमपीएन (मोस्ट प्रॉबेबल नंबर) असणं अपेक्षित आहे, तिथे हे प्रमाण 1,600 एमपीएन आढळलं आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्डानुसार आंघोळीच्या  100 मिमी पाण्यात कॉलिफॉर्मचं प्रमाण 500 एमपीएनपेक्षा कमी असलं पाहिजे.