शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
2
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
3
इशान किशनला टीम इंडियापाठोपाठ आणखी एका संघातूनही डच्चू मिळण्याची शक्यता
4
बाजार गडगडला! एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे २.५७ लाख कोटी बुडाले, फक्त 'हे' ५ शेअर्स वाढले
5
चीनकडून कोण चोरतंय रेअर अर्थ मेटल? का उडालीये ड्रॅगनची झोप, काय आहे प्रकरण?
6
"आमदार माजलेत असं बाहेर म्हटलं जातंय, राजकारणाच्या पलीकडे जाणार की नाही?"; CM फडणवीसांनी विरोधकांना सुनावलं
7
"पटोलेंनी उल्लेख केलेली व्यक्ती काँग्रेसचीच"; हनी ट्रॅपची कुठलीही तक्रार नसल्याचे CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
8
"ये लातों के भूत हैं, बातों से मानेंगे नहीं...!"; मोहरम आणि श्रावणाचा उल्लेख करत मुख्यमंत्री योगींचं मोठं विधान
9
"विधानसभेतील राडा हा जाणीवपूर्वक दहशत निर्माण करण्याचा प्रकार’’, बाळासाहेब थोरात यांची टीका 
10
"जितेंद्र आव्हाड राजकारणातून बाहेर पडले तर मला आवडेल, कारण...", पत्नी ऋता नेमकं काय म्हणाल्या?
11
सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, १० ग्रॅमसाठी किती खर्च करावा लागणार; चांदीत ₹१३०० ची तेजी
12
Sara Ali Khan : फॅट टू फिट! ९६ किलो वजनाच्या साराने कसं कमी केलं तब्बल ४५ किलो वजन? 'हे' आहे टॉप सीक्रेट
13
'करेंगे दंगे चारों ओर', महाराष्ट्र विधानसभेतील हाणामारीवर कुणाल कामराने टीका केली; व्हिडीओ व्हायरल
14
Lunchbox Recipe: झटपट तयार होणारी 'पडवळ करी' एकदा ट्राय करा, दोन घास जास्तच जातील!
15
पाकव्याप्त काश्मीरमध्ये दिसला मसूद अजहर; आता बिलावल भुट्टो आपला शब्द खरा करणार का?
16
विदेशी सट्टेबाजांचा वायदे बाजारावर डाव, छोट्या गुंतवणूकदारांनो सजगतेनं करा बचाव!
17
विधिमंडळ परिसरात धक्काबुक्की प्रकरणी विधानसभा अध्यक्षांनी निर्णय दिला, दोषींवर होणार अशी कारवाई 
18
सोन्याची झळाळी कमी होणार, चांदीची चमक मात्र वाढणार; १३ टक्क्यांच्या तेजीचा अंदाज, किती जाऊ शकतो भाव?
19
शाहरुख खानच्या मेकअप रुमबाहेर काढला फोटो, मराठी अभिनेत्रीने व्यक्त केला आनंद
20
"मोदींच्या नेतृत्वाखाली २०२९ निवडणूक लढवावी लागणे ही भाजपची मजबुरी"; भाजप खासदाराचे विधान

पिण्याचं सोडा, आंघोळीच्या योग्यही नाही गंगेचं पाणी

By admin | Updated: May 18, 2017 12:28 IST

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्डाने एका आरटीआयला उत्तर देताना सांगितलं आहे की, हरिद्वारमध्ये गंगेचं पाणी आंघोळीसाठीही योग्य नाही

ऑनलाइन लोकमत
देहरादून, दि. 18 - गंगेत आंघोळ केल्याने तुमचं पाप धुतलं जातं की नाही हे सांगणं कठीण आहे, पण या पाण्यामुळे तुम्ही आजारी पडाल एवढं मात्र नक्की. हरिद्वारला गेल्यानंतर गंगेत डुबकी मारल्यानंतर कदातिच तुम्हाला चांगलं वाटेल, मात्र हे पानी इतकं प्रदूषित आहे की प्यायचं सोडा, साधं आंघोळीच्या योग्यही नाही आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्डाने एका आरटीआयला उत्तर देताना सांगितलं आहे की, हरिद्वारमध्ये गंगेचं पाणी आंघोळीसाठीही योग्य नाही. 
 
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार गंगेचं पाणी सर्व दृष्टीने असुरक्षित आहे. अधिकृत आकडेवारीनुार हरिद्वार किनारी असलेल्या 20 घाटांवर रोज तब्बल 50 हजार ते एक लाख भक्त गंगेत डुबकी घेत स्नान करत असतात. 
 
उत्तराखंडमधील गंगोत्रीपासून ते हरिद्वारपर्यंत 11 ठिकाणी पाण्याची गुणवत्ता तपासण्यासाठी नमुने घेण्यात आले होते. 294 किमी परिसरातील 11 ठिकाणांची यासाठी निवड करण्यात आली. इतक्या मोठ्या प्रमाणात पाण्याची गुणवत्ता तपासण्यासाठी चार प्रमुख गोष्टींकडे लक्ष देण्यात आलं, ज्यामध्ये तापमान, पाण्यात मिसळलेला ऑक्सिजन, बायलॉजिकल ऑक्सिजन डिमांड (BOD) आणि कॉलिफॉर्म (बॅक्टेरिया) यांचा समावेश होता. हरिद्वारजवळील गंगेच्या पाण्यात BOD, कॉलिफॉर्म आणि काही विषारी घटक आढळले आहेत. 
 
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्डाच्या नियमांनुसार आंघोळीच्या एक लिटर पाण्यात BOD ची क्षमात किमान 3 मिलीग्रामपेक्षा कमी असली पाहिजे. मात्र इथे हा स्तर 6.4 मिलीग्राम आहे. अनेक ठिकाणी कॉलिफॉर्मचं प्रमाणदेखील जास्त आढळलं आहे. जिथे पाण्यात कॉलिफॉर्मचं प्रमाण 90 एमपीएन (मोस्ट प्रॉबेबल नंबर) असणं अपेक्षित आहे, तिथे हे प्रमाण 1,600 एमपीएन आढळलं आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्डानुसार आंघोळीच्या  100 मिमी पाण्यात कॉलिफॉर्मचं प्रमाण 500 एमपीएनपेक्षा कमी असलं पाहिजे.