शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
2
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
3
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
4
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
5
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
6
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
7
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
8
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
9
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
10
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
11
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
12
IPL लिलावात अनसोल्डचा टॅग; त्याच पठ्ठ्यानं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी द्विशतकासह रचला इतिहास
13
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
14
शिंदेसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर; गोविंदासह 'या' ४० नेत्यांकडे प्रचाराची धुरा!
15
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
16
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
17
टीम इंडियाचा ICC क्रमवारीत धुमधडाका! एक-दोन नव्हे, तब्बल ५ स्टार क्रिकेटर रँकिंगमध्ये अव्वल
18
अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
19
"भगवा झेंडा पाहून TMC चा लाठीचार्ज, गुंडांना पोलिसांच्या मागे लपवणं..."; ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
20
Viral Video: भगवान विष्णूची कंबोडियातील मूर्ती लष्कराने पाडली, व्हायरल होत असलेला व्हिडीओचे सत्य काय?
Daily Top 2Weekly Top 5

डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्य अकादमी स्थापन करा अस्मितादर्श साहित्य संमेलनात ठराव

By admin | Updated: January 16, 2017 00:55 IST

लातूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीची स्मृति म्हणून महाराष्ट्र शासनाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्य अकादमी सुरू करण्याचा संकल्प बाळगला आहे. हा स्तुत्य उपक्रम असून, ही साहित्य अकादमी तात्काळ सुरू करण्याची सूचना अस्मितादर्श साहित्य संमेलनात ठराव घेऊन करण्यात आली.

लातूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीची स्मृति म्हणून महाराष्ट्र शासनाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्य अकादमी सुरू करण्याचा संकल्प बाळगला आहे. हा स्तुत्य उपक्रम असून, ही साहित्य अकादमी तात्काळ सुरू करण्याची सूचना अस्मितादर्श साहित्य संमेलनात ठराव घेऊन करण्यात आली. दयानंद महाविद्यालयाच्या सभागृहात ३४ व्या अस्मितादर्श साहित्य संमेलनाचा समारोप रविवारी संमेलनाध्यक्षा डॉ. प्रज्ञा दया पवार, ताराचंद्र खांडेकर, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. गंगाधर पानतावणे यांच्या उपस्थितीत झाला. या संमेलनात एकूण १० ठराव घेण्यात आले. प्रा.एस.एन. शिंदे यांनी ठरावाचे वाचन केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या लेखनाचे जे खंड महाराष्ट्र शासनाने इंग्रजी भाषेत प्रकाशित केले आहे, त्या समग्र खंडांचा अनुवाद मराठी, हिंदी आणि भारतातील प्रादेशिक भाषेत करावा, असा ठरावही यावेळी पारित करण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या लेखनाचे खंडात्मक पुनर्मुद्रण करून ते वाचकांना उपलब्ध करून द्यावे, डॉ. बाबासाहेबांच्या चळवळीत ज्या कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला, अशा कार्यकर्त्यांना सामाजिक स्वातंत्र्यसैनिक समजून त्यांना स्वातंत्र्यसैनिकांच्या सवलती द्याव्यात, विपुल प्रमाणात पाली वाङ्मय उपलब्ध आहे. मात्र या वाङ्मयाचा स्वतंत्र संशोधनात्मक शोध घेण्यासाठी स्वतंत्र विद्यापीठाची आवश्यकता आहे. जगभरातील अभ्यासक आणि संशोधकांच्या सोयीसाठी पाली भाषा व वाङ्मय विद्यापीठाची स्थापना करावी, असाही ठराव घेण्यात आला. मराठी भाषेचा जन्म मराठवाडा प्रदेशात झाल्याचे ऐतिहासिक पुरावे उपलब्ध झाले आहेत. म्हणून महाराष्ट्र शासनाने मराठी भाषा व वाङ्मय विद्यापीठ अंबाजोगाई येथे स्थापन करावे, अनुसूचित जाती व जमातीच्या विद्यार्थ्यांना परदेशात पाठविण्याची योजना राज्य शासनाने बंद केली आहे. ही बाब अन्यायकारक असून, ही योजना पूर्ववत सुरू करण्यात यावी, लातूर येथे सांस्कृतिक सभागृह सुरू करावे, अनुसूचित जाती-जमाती संरक्षण कायदा (ॲट्रॉसिटी) संबंधाने समाजात संभ्रमाचे वातावरण निर्माण केले जात आहे. त्यामुळे या कायद्याची कडक अंमलबजावणी करावी, अशीही मागणी संमेलनाच्या समारोपात करण्यात आली.डॉ. गंगाधर पानतावणे, डॉ. भगवान वाघमारे, डी.एस. नरसिंगे, जयप्रकाश दगडे, शंकर भारती, राजेंद्र लातूरकर, डॉ. विजय अजनीकर, डॉ. ऋषिकेश कांबळे यांनी हे ठराव मांडले.