शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्य अकादमी स्थापन करा अस्मितादर्श साहित्य संमेलनात ठराव

By admin | Updated: January 16, 2017 00:55 IST

लातूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीची स्मृति म्हणून महाराष्ट्र शासनाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्य अकादमी सुरू करण्याचा संकल्प बाळगला आहे. हा स्तुत्य उपक्रम असून, ही साहित्य अकादमी तात्काळ सुरू करण्याची सूचना अस्मितादर्श साहित्य संमेलनात ठराव घेऊन करण्यात आली.

लातूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीची स्मृति म्हणून महाराष्ट्र शासनाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्य अकादमी सुरू करण्याचा संकल्प बाळगला आहे. हा स्तुत्य उपक्रम असून, ही साहित्य अकादमी तात्काळ सुरू करण्याची सूचना अस्मितादर्श साहित्य संमेलनात ठराव घेऊन करण्यात आली. दयानंद महाविद्यालयाच्या सभागृहात ३४ व्या अस्मितादर्श साहित्य संमेलनाचा समारोप रविवारी संमेलनाध्यक्षा डॉ. प्रज्ञा दया पवार, ताराचंद्र खांडेकर, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. गंगाधर पानतावणे यांच्या उपस्थितीत झाला. या संमेलनात एकूण १० ठराव घेण्यात आले. प्रा.एस.एन. शिंदे यांनी ठरावाचे वाचन केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या लेखनाचे जे खंड महाराष्ट्र शासनाने इंग्रजी भाषेत प्रकाशित केले आहे, त्या समग्र खंडांचा अनुवाद मराठी, हिंदी आणि भारतातील प्रादेशिक भाषेत करावा, असा ठरावही यावेळी पारित करण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या लेखनाचे खंडात्मक पुनर्मुद्रण करून ते वाचकांना उपलब्ध करून द्यावे, डॉ. बाबासाहेबांच्या चळवळीत ज्या कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला, अशा कार्यकर्त्यांना सामाजिक स्वातंत्र्यसैनिक समजून त्यांना स्वातंत्र्यसैनिकांच्या सवलती द्याव्यात, विपुल प्रमाणात पाली वाङ्मय उपलब्ध आहे. मात्र या वाङ्मयाचा स्वतंत्र संशोधनात्मक शोध घेण्यासाठी स्वतंत्र विद्यापीठाची आवश्यकता आहे. जगभरातील अभ्यासक आणि संशोधकांच्या सोयीसाठी पाली भाषा व वाङ्मय विद्यापीठाची स्थापना करावी, असाही ठराव घेण्यात आला. मराठी भाषेचा जन्म मराठवाडा प्रदेशात झाल्याचे ऐतिहासिक पुरावे उपलब्ध झाले आहेत. म्हणून महाराष्ट्र शासनाने मराठी भाषा व वाङ्मय विद्यापीठ अंबाजोगाई येथे स्थापन करावे, अनुसूचित जाती व जमातीच्या विद्यार्थ्यांना परदेशात पाठविण्याची योजना राज्य शासनाने बंद केली आहे. ही बाब अन्यायकारक असून, ही योजना पूर्ववत सुरू करण्यात यावी, लातूर येथे सांस्कृतिक सभागृह सुरू करावे, अनुसूचित जाती-जमाती संरक्षण कायदा (ॲट्रॉसिटी) संबंधाने समाजात संभ्रमाचे वातावरण निर्माण केले जात आहे. त्यामुळे या कायद्याची कडक अंमलबजावणी करावी, अशीही मागणी संमेलनाच्या समारोपात करण्यात आली.डॉ. गंगाधर पानतावणे, डॉ. भगवान वाघमारे, डी.एस. नरसिंगे, जयप्रकाश दगडे, शंकर भारती, राजेंद्र लातूरकर, डॉ. विजय अजनीकर, डॉ. ऋषिकेश कांबळे यांनी हे ठराव मांडले.