शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

संसदेच्या उपाहारगृहात अखेर दुप्पट दरवाढ

By admin | Updated: January 2, 2016 08:36 IST

खाद्यपदार्थांवरील फार मोठ्या सबसिडीमुळे वादात अडकलेल्या संसदेच्या उपाहारगृहात नववर्षाच्या पहिल्या दिवसापासून दुप्पट दरवाढ करण्यात आली आहे.

नवी दिल्ली : खाद्यपदार्थांवरील फार मोठ्या सबसिडीमुळे वादात अडकलेल्या संसदेच्या उपाहारगृहात नववर्षाच्या पहिल्या दिवसापासून दुप्पट दरवाढ करण्यात आली आहे. यापुढे ‘ना नफा ना तोटा’ या तत्त्वावर हे उपाहारगृह चालविण्यात येणार असल्याचे लोकसभा सचिवालयाने स्पष्ट केले आहे.नव्या निर्णयानुसार आतापर्यत केवळ १८ रुपयात मिळणाऱ्या शाकाहारी थाळीची किंमत वाढवून ३० रुपये करण्यात आली आहे तर ३३ रुपयांची मांसाहारी थाळी आता ६० रुपयांना मिळेल. ‘थ्री कोर्स मिल’ चे दर ६१ रुपयांवरून ९० रुपये एवढे वाढविण्यात आले आहेत. (वृत्तसंस्था)यापूर्वी २९ रुपयांना मिळणाऱ्या चिकन करीसाठी ४० रुपये मोजावे लागतील आणि १० रुपयांना मिळणारा डाळभातही २५ रुपयांवर पोहोचला आहे.पोळी आणि चहासारख्या काही पदार्थांच्या किमतीत मात्र बदल झालेला नाही. उपाहारगृहात दरवाढीसोबतच खाद्यपदार्थांची संख्याही कमी करण्यात आली आहे. यापूर्वी येथे दररोज १२५ ते १३० खाद्यपदार्थ तयार होत असत. परंतु यापुढे फक्त २५ पदार्थ मिळतील. तूर्तास येथे पोळ्यांचे अनेक प्रकार, पुलाव, साधा भात, खिचडी, दहीभात आणि बिर्याणी वाढली जाते. दुसरे म्हणजे उपाहारगृहातील कर्मचाऱ्यांचे कामाचे ओझे कमी करण्याच्या दृष्टीने चहा आणि कॉफीच्या मशीन्सही लावल्या जातील.लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी खाद्यपदार्थांवरील सबसिडी कमी करण्याचे आदेश दिले होते. (वृत्तसंस्था)सहा वर्षांनी दरवाढलोकसभा सचिवालयाने यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, सहा वर्षांनंतर ही दरवाढ झाली आहे. यापूर्वी २०१० साली उपाहारगृहातील पदार्थांच्या किमती वाढविण्यात आल्या होत्या आणि पुढेही वेळोवेळी याबाबत आढावा घेतला जाईल.आकाशाला भिडणाऱ्या महागाईनंतरही संसदेच्या उपाहारगृहात नाममात्र दरात खाद्यपदार्थ दिले जात असल्याने वाद निर्माण झाला होता. विशेषत: प्रसिद्धी माध्यमांनी वेळोवेळी याकडे लक्ष वेधले होते. सचिवालयाच्या सांगण्यानुसार सुमित्रा महाजन यांनी संसदेच्या दोन्ही सभागृहातील सदस्यांचा समावेश असलेल्या आहार व्यवस्थापन समितीला या दरांचा आढावा घेण्यास सांगितले होते. या समितीचा अहवाल प्राप्त झाल्यावर उपरोक्त निर्णय घेण्यात आले. ही नवी दरवाढ खासदार, लोकसभा व राज्यसभेचे अधिकारी, माध्यमांचे प्रतिनिधी आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांसोबत कामकाज बघण्यासाठी येणाऱ्या लोकांनाही लागू असेल.- केंद्रात भाजपाप्रणीत रालोआ सरकार सत्तारूढ झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या उपाहारगृहात अवघ्या २९ रुपयात भोजन केले होते.असे असतील नवे दर शाकाहारी थाळी- ३० रुपयेमांसाहारी थाळी- ६० रुपयेथ्री कोर्स मिल- ९० रुपयेचिकन कटलेट -३५ रु पये उपमा,पोहे, इडली,डोसा- १५ रु पये