शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
2
पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर अन् युद्धविराम...राहुल गांधींची PM मोदींना पत्राद्वारे मोठी मागणी
3
Operation Sindoor Live Updates: 'पाकिस्तानला मेसेज मिळालाय, आता थेट तुमच्या मुख्यालयावरच हल्ला करू'
4
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
5
Chandrapur Tiger Attack: चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात ३ महिलांचा मृत्यू, गावकऱ्यांमध्ये घबराट
6
पर्सनल लोन फेडलं नाही तर बँक काय कारवाई करते? कर्ज घेताना काय काळजी घ्यावी?
7
हृदयद्रावक! पत्नी आणि २ महिन्यांच्या मुलाला मारुन पतीने संपवलं जीवन; मेसेजमध्ये मांडली व्यथा
8
Murali Naik : "शहीद झालो तर पार्थिव तिरंग्यात..."; मुरली नाईक यांच्या वडिलांनी सांगितली लेकाची शेवटची इच्छा
9
भारतानं पाकिस्तानात घुसून मारलं, लष्कराचा दरारा रावळपिंडीपर्यंत पोहोचला; ऑपरेशन सिंदूरवर राजनाथ सिंह स्पष्टच बोलले 
10
SIP मध्ये गुंतवणूक करताना बहुतेक गुंतवणूकदार 'या' चुका करतात; थेट परताव्यावर होतो परिणाम
11
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
12
नाशिकला अवकाळी पावसाने झोडपले; शहरात तासभर गडगडाट अन् कडकडाट
13
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
14
भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?
15
Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
16
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
17
युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
18
'मदर्स डे'निमित्त मराठी कलाकारांनी व्यक्त केलं आईवरचं प्रेम, शेअर केले खास फोटो
19
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
20
मेळघाटातील ‘त्या’ आरएफओंची राज्य महिला आयोगाकडे धाव, ‘त्या’ अधिकाऱ्याला अभय

संसदेच्या उपाहारगृहात अखेर दुप्पट दरवाढ

By admin | Updated: January 2, 2016 08:36 IST

खाद्यपदार्थांवरील फार मोठ्या सबसिडीमुळे वादात अडकलेल्या संसदेच्या उपाहारगृहात नववर्षाच्या पहिल्या दिवसापासून दुप्पट दरवाढ करण्यात आली आहे.

नवी दिल्ली : खाद्यपदार्थांवरील फार मोठ्या सबसिडीमुळे वादात अडकलेल्या संसदेच्या उपाहारगृहात नववर्षाच्या पहिल्या दिवसापासून दुप्पट दरवाढ करण्यात आली आहे. यापुढे ‘ना नफा ना तोटा’ या तत्त्वावर हे उपाहारगृह चालविण्यात येणार असल्याचे लोकसभा सचिवालयाने स्पष्ट केले आहे.नव्या निर्णयानुसार आतापर्यत केवळ १८ रुपयात मिळणाऱ्या शाकाहारी थाळीची किंमत वाढवून ३० रुपये करण्यात आली आहे तर ३३ रुपयांची मांसाहारी थाळी आता ६० रुपयांना मिळेल. ‘थ्री कोर्स मिल’ चे दर ६१ रुपयांवरून ९० रुपये एवढे वाढविण्यात आले आहेत. (वृत्तसंस्था)यापूर्वी २९ रुपयांना मिळणाऱ्या चिकन करीसाठी ४० रुपये मोजावे लागतील आणि १० रुपयांना मिळणारा डाळभातही २५ रुपयांवर पोहोचला आहे.पोळी आणि चहासारख्या काही पदार्थांच्या किमतीत मात्र बदल झालेला नाही. उपाहारगृहात दरवाढीसोबतच खाद्यपदार्थांची संख्याही कमी करण्यात आली आहे. यापूर्वी येथे दररोज १२५ ते १३० खाद्यपदार्थ तयार होत असत. परंतु यापुढे फक्त २५ पदार्थ मिळतील. तूर्तास येथे पोळ्यांचे अनेक प्रकार, पुलाव, साधा भात, खिचडी, दहीभात आणि बिर्याणी वाढली जाते. दुसरे म्हणजे उपाहारगृहातील कर्मचाऱ्यांचे कामाचे ओझे कमी करण्याच्या दृष्टीने चहा आणि कॉफीच्या मशीन्सही लावल्या जातील.लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी खाद्यपदार्थांवरील सबसिडी कमी करण्याचे आदेश दिले होते. (वृत्तसंस्था)सहा वर्षांनी दरवाढलोकसभा सचिवालयाने यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, सहा वर्षांनंतर ही दरवाढ झाली आहे. यापूर्वी २०१० साली उपाहारगृहातील पदार्थांच्या किमती वाढविण्यात आल्या होत्या आणि पुढेही वेळोवेळी याबाबत आढावा घेतला जाईल.आकाशाला भिडणाऱ्या महागाईनंतरही संसदेच्या उपाहारगृहात नाममात्र दरात खाद्यपदार्थ दिले जात असल्याने वाद निर्माण झाला होता. विशेषत: प्रसिद्धी माध्यमांनी वेळोवेळी याकडे लक्ष वेधले होते. सचिवालयाच्या सांगण्यानुसार सुमित्रा महाजन यांनी संसदेच्या दोन्ही सभागृहातील सदस्यांचा समावेश असलेल्या आहार व्यवस्थापन समितीला या दरांचा आढावा घेण्यास सांगितले होते. या समितीचा अहवाल प्राप्त झाल्यावर उपरोक्त निर्णय घेण्यात आले. ही नवी दरवाढ खासदार, लोकसभा व राज्यसभेचे अधिकारी, माध्यमांचे प्रतिनिधी आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांसोबत कामकाज बघण्यासाठी येणाऱ्या लोकांनाही लागू असेल.- केंद्रात भाजपाप्रणीत रालोआ सरकार सत्तारूढ झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या उपाहारगृहात अवघ्या २९ रुपयात भोजन केले होते.असे असतील नवे दर शाकाहारी थाळी- ३० रुपयेमांसाहारी थाळी- ६० रुपयेथ्री कोर्स मिल- ९० रुपयेचिकन कटलेट -३५ रु पये उपमा,पोहे, इडली,डोसा- १५ रु पये