शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

संसदेच्या उपाहारगृहात अखेर दुप्पट दरवाढ

By admin | Updated: January 2, 2016 08:36 IST

खाद्यपदार्थांवरील फार मोठ्या सबसिडीमुळे वादात अडकलेल्या संसदेच्या उपाहारगृहात नववर्षाच्या पहिल्या दिवसापासून दुप्पट दरवाढ करण्यात आली आहे.

नवी दिल्ली : खाद्यपदार्थांवरील फार मोठ्या सबसिडीमुळे वादात अडकलेल्या संसदेच्या उपाहारगृहात नववर्षाच्या पहिल्या दिवसापासून दुप्पट दरवाढ करण्यात आली आहे. यापुढे ‘ना नफा ना तोटा’ या तत्त्वावर हे उपाहारगृह चालविण्यात येणार असल्याचे लोकसभा सचिवालयाने स्पष्ट केले आहे.नव्या निर्णयानुसार आतापर्यत केवळ १८ रुपयात मिळणाऱ्या शाकाहारी थाळीची किंमत वाढवून ३० रुपये करण्यात आली आहे तर ३३ रुपयांची मांसाहारी थाळी आता ६० रुपयांना मिळेल. ‘थ्री कोर्स मिल’ चे दर ६१ रुपयांवरून ९० रुपये एवढे वाढविण्यात आले आहेत. (वृत्तसंस्था)यापूर्वी २९ रुपयांना मिळणाऱ्या चिकन करीसाठी ४० रुपये मोजावे लागतील आणि १० रुपयांना मिळणारा डाळभातही २५ रुपयांवर पोहोचला आहे.पोळी आणि चहासारख्या काही पदार्थांच्या किमतीत मात्र बदल झालेला नाही. उपाहारगृहात दरवाढीसोबतच खाद्यपदार्थांची संख्याही कमी करण्यात आली आहे. यापूर्वी येथे दररोज १२५ ते १३० खाद्यपदार्थ तयार होत असत. परंतु यापुढे फक्त २५ पदार्थ मिळतील. तूर्तास येथे पोळ्यांचे अनेक प्रकार, पुलाव, साधा भात, खिचडी, दहीभात आणि बिर्याणी वाढली जाते. दुसरे म्हणजे उपाहारगृहातील कर्मचाऱ्यांचे कामाचे ओझे कमी करण्याच्या दृष्टीने चहा आणि कॉफीच्या मशीन्सही लावल्या जातील.लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी खाद्यपदार्थांवरील सबसिडी कमी करण्याचे आदेश दिले होते. (वृत्तसंस्था)सहा वर्षांनी दरवाढलोकसभा सचिवालयाने यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, सहा वर्षांनंतर ही दरवाढ झाली आहे. यापूर्वी २०१० साली उपाहारगृहातील पदार्थांच्या किमती वाढविण्यात आल्या होत्या आणि पुढेही वेळोवेळी याबाबत आढावा घेतला जाईल.आकाशाला भिडणाऱ्या महागाईनंतरही संसदेच्या उपाहारगृहात नाममात्र दरात खाद्यपदार्थ दिले जात असल्याने वाद निर्माण झाला होता. विशेषत: प्रसिद्धी माध्यमांनी वेळोवेळी याकडे लक्ष वेधले होते. सचिवालयाच्या सांगण्यानुसार सुमित्रा महाजन यांनी संसदेच्या दोन्ही सभागृहातील सदस्यांचा समावेश असलेल्या आहार व्यवस्थापन समितीला या दरांचा आढावा घेण्यास सांगितले होते. या समितीचा अहवाल प्राप्त झाल्यावर उपरोक्त निर्णय घेण्यात आले. ही नवी दरवाढ खासदार, लोकसभा व राज्यसभेचे अधिकारी, माध्यमांचे प्रतिनिधी आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांसोबत कामकाज बघण्यासाठी येणाऱ्या लोकांनाही लागू असेल.- केंद्रात भाजपाप्रणीत रालोआ सरकार सत्तारूढ झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या उपाहारगृहात अवघ्या २९ रुपयात भोजन केले होते.असे असतील नवे दर शाकाहारी थाळी- ३० रुपयेमांसाहारी थाळी- ६० रुपयेथ्री कोर्स मिल- ९० रुपयेचिकन कटलेट -३५ रु पये उपमा,पोहे, इडली,डोसा- १५ रु पये