शहरं
Join us  
Trending Stories
1
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी
2
आपली मुलगी राजकारणात येणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले, म्हणाले...
3
लडाखमधील आंदोलनाला हिंसक वळण, जाळपोळ, लेहमध्ये ४ जणांचा मृत्यू, ७० जण जखमी 
4
हलगर्जीपणाचा कळस! सरकारी रुग्णालयात दुसऱ्याच पायाची सर्जरी, ऑक्सिजन मास्क काढला अन्...
5
"फायनलमध्ये बघून घेऊ’’, दोन वेळा मार खाल्यानंतर शाहीन शाह आफ्रिदीचं भारताला आव्हान    
6
जीएसटीमुळे वाहनांच्या किंमतीच नाही, RTO Tax देखील कमी झाला; तिहेरी फायदा कोणालाच कळला नाही...
7
समृद्धी महामार्गावर दुहेरी उत्पन्नाचा स्रोत; सौरऊर्जा निर्मिती करणारा देशातील पहिला 'एक्सप्रेसवे' !
8
Swami Chaitanya Saraswati: 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय?
9
आयटी-मेटलसह 'या' क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी पडझड; गुंतवणूकदारांचे ३ लाख कोटी रुपये बुडाले
10
समस्या संपतील, स्वामी कायम सोबत असतील; ९ गुरुवार व्रताने बदल नक्की दिसतील, अशक्य शक्य होईल!
11
Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशी U19 तील नवा सिक्सर किंग! सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड
12
VIDEO: भारतीय संघाची जर्सी घालून पाकिस्तानच्या गल्लीबोळात फिरला तरूण, पुढे काय घडलं?
13
लडाखच्या पूर्ण राज्याच्या दर्जासाठी लेह पेटले; सोनम वांगचूक म्हणाले, हा तरुणांचा राग होता, GenZ क्रांती...
14
नोकरी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! नवीन वर्षाच्या 'या' महिन्यापासून ATM मधून काढता येणार PF चे पैसे
15
Smartphones: १०,००० रुपयांपेक्षा कमी किमतीत ५० मेगापिक्सेलचा कॅमेरा; जाणून घ्या 'या' ७ स्मार्टफोनबद्दल!
16
अतिवृष्टी, पुराचा रेल्वे गाड्यांनाही फटका; पावसामुळे रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल
17
नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी 'गरबा'त विघ्न; नियमाचे पालन की 'मॉरल पोलिसिंग'? नागपूरमध्ये वाद का उफाळला?
18
उद्धव ठाकरेंचा दौरा ठरला; पुराचा फटका बसलेल्या 'या' पाच जिल्ह्यांत करणार पाहणी
19
डिलिव्हरी बॉय जेवण देण्यासाठी आला अन् समोर भिकारी; पेमेंटसाठी फोन काढताच बसला धक्का
20
17 मुलींची छेडछाड केल्याचा आरोप, स्वामी चैतन्यानंद सरस्वती फरार; खोट्या नंबर प्लेटसह व्हॉल्वो जप्त; कुणी केली तक्रार?

देशांतर्गत जलवाहतूक होणार सुरक्षित; पहिल्या रिव्हर इन्फर्मेशन सिस्टीमचे उद्घाटन

By admin | Updated: January 6, 2016 23:53 IST

भारतात स्वस्त दरात आधुनिक पद्धतीची देशांतर्गत जलवाहतूक हे केंद्र सरकारचे स्वप्न असून नौकानयन मंत्रालयाने त्यासाठी वेगाने काम सुरू केले आहे.

सुरेश भटेवरा,  नवी दिल्लीभारतात स्वस्त दरात आधुनिक पद्धतीची देशांतर्गत जलवाहतूक हे केंद्र सरकारचे स्वप्न असून नौकानयन मंत्रालयाने त्यासाठी वेगाने काम सुरू केले आहे. देशांतर्गत जलवाहतुकीत दोन जहाजांची टक्कर अथवा पुलांच्या अर्धवट बांधकामांवर जहाजांचे आदळणे, अपघात व नैसर्गिक संकटांपासून सुरक्षित देशांतर्गत जलवाहतुकीसाठी, एअर ट्राफिक कंट्रोलच्या धर्तीवर आधुनिक रिव्हर इन्फर्मेशन सिस्टीम कार्यरत करण्यात आली आहे. भारतातील पहिली जलमार्ग नियंत्रण व्यवस्था गंगा नदीवरील हल्दिया ते फराक्का या ५४५ कि.मी अंतराच्या जलमार्गावर कार्यरत झाली असून त्याचे औपचारिक उद्घाटन बुधवारी केंद्रीय जहाजबांधणीमंत्री नितीन गडकरींच्या हस्ते दिल्लीच्या परिवहन मंत्रालयात पत्रकारांच्या उपस्थितीत झाले. देशांतर्गत जलवाहतूक नगण्यउद्घाटनप्रसंगी पत्रकारांशी बोलताना गडकरी म्हणाले, जगातल्या प्रमुख देशांच्या तुलनेत भारतात देशांतर्गत जल वाहतुकीचे प्रमाण अतिशय नगण्य आहे. रस्ता वाहतुकीचा खर्च सरासरी १.५० रुपया प्रति कि.मी. तर रेल्वे वाहतुकीचा १ रुपया प्रति कि.मी. येतो. त्या तुलनेत जलवाहतुकीचा खर्च अवघा २५ ते ३० पैसे प्रति कि.मी. आहे. देशातील बरीचशी प्रवासी व मालवाहतूक जलमार्गाने केल्यास मोठ्या नद्यांलगत नव्या औद्योगिक वसाहती, शीतगृहे व प्री-कुलिंग केंद्रे उभी राहतील. कृषी उत्पादनांच्या स्वस्त वाहतुकीबरोबरच नवे रोजगारही त्यातून निर्माण होऊ शकतील. भारतात आंतरराष्ट्रीय दर्जाची अशी जलवाहतूक लवकरात लवकर सुरू व्हावी यासाठी केंद्रीय जहाजबांधणी मंत्रालयाने वेगाने प्रयत्न सुरू केले असून त्यात अग्रक्रमाने गंगा, ब्रह्मपुत्रा, महानदी, आंध्रप्रदेश व तामिळनाडू दरम्यानचा बकिंगहॅम कॅनॉल व केरळचे बॅकवॉटर अशा पाच देशांतर्गत जलमार्ग वाहतुकीचे काम सुरू झाले आहे.