शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

सरकारला देशात समान नागरी कायदा आणण्याची इच्छा आहे का? - सर्वोच्च न्यायालय

By admin | Updated: October 14, 2015 14:36 IST

सरकारला देशात समान नागरी कायदा आणण्याची इच्छा आहे का असा सवाल सर्वोच्च न्यायालयाने विचारला आहे

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १४ - सरकारला देशात समान नागरी कायदा आणण्याची इच्छा आहे का असा सवाल सर्वोच्च न्यायालयाने विचारला आहे. धार्मिक परंपरांचे नियमन करणाऱ्या वैयक्तिक कायद्यांमुळे गोंधळ निर्माण होत असल्याकडे लक्ष वेधून घेत न्यायालयाने ही विचारणा केली. याप्रकरणी सरकारचे मत जाणून घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने सॉलिसिटर जनरलना दिले असून तीन आठवड्यानंतर याप्रकरणाची सुनावणी घेण्यात येणार आहे. 
कायद्यापुढे सर्व नागरिक समान असावेत आणि सर्व धर्माचे नियमन एकाच मापदंडानुसार व्हावे, असे असताना समान नागरी कायदा लागू करण्याबाबत सरकारचे काय मत आहे, तुम्ही तसा कायदा करून तो अमलात का आणत नाही असा सवाल न्या. विक्रमजित सिंग व न्या. शिवा कीर्ती सिंग यांच्या खंडपीठाने सरकारला विचारला. 
घटस्फोट मिळण्यासाठी इतर धर्मातील नागरिकांना एक वर्ष वेगळ रहावं लागत असताना ख्रिश्चन धर्मीयांना घटस्फोटापूर्वी किमान दोन वर्षे वेगळे रहावे लागते. या कायद्याच्या तरतुदीसंदर्भात दाखल करण्यात आलेल्या याचिकेच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायलयाने सरकारकडे ही विचारणा केली. 
आम्ही घटस्फोट कायद्याच्या कलम १०अ(१) मध्ये दुरुस्ती करण्याचे ठरवले असून विधी मंत्रालयाने तसा प्रस्तावही तयार केल्याची माहिती यापूर्वीच्या सुनावणीत न्यायालयाला देण्यात आली होती. ख्रिस्ती धर्मीय नागरिक ज्या कलमान्वये १०अ(१) घटस्फोटासाठी अर्ज करतात, त्यानुसार घटस्फोट घेण्यापूर्वी त्या जोडप्याला दोन वर्ष वेगळे राहिल्यानंतरच परस्परसंमतीने घटस्फोटासाठी अर्ज करता येतो.  पण विशेष विवाह कायदा, हिंदू विवाह कायदा व पारसी विवाह व घटस्फोट कायदा यांमध्ये हा कालावधी फक्त एक वर्षाचा आहे.
शेवटच्या सुनावणीला तीन महिने उलटून गेल्यानंतरही यासदंर्भात कोणताही निर्णय घेण्यात न आल्याने सर्वोच्च न्यायालयाने नाराजी नोंदवत हे का होऊ शकत नाही, असा सवाल सरकारला विचारला. यासाठी थोडा कालावधी देण्यात यावा अशी मागणी सरकारी वकिलांतर्फे करण्यात आली. मात्र सरकारी वकिलांच्या उत्तरावर असामाधानी असलेल्या सर्वोच्च न्यायालयाने सॉलिसिटर जनरलाना सरकारचे मत जाणून घेण्याचे निर्देश दिले.