शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

सरकारला देशात समान नागरी कायदा आणण्याची इच्छा आहे का? - सर्वोच्च न्यायालय

By admin | Updated: October 14, 2015 14:36 IST

सरकारला देशात समान नागरी कायदा आणण्याची इच्छा आहे का असा सवाल सर्वोच्च न्यायालयाने विचारला आहे

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १४ - सरकारला देशात समान नागरी कायदा आणण्याची इच्छा आहे का असा सवाल सर्वोच्च न्यायालयाने विचारला आहे. धार्मिक परंपरांचे नियमन करणाऱ्या वैयक्तिक कायद्यांमुळे गोंधळ निर्माण होत असल्याकडे लक्ष वेधून घेत न्यायालयाने ही विचारणा केली. याप्रकरणी सरकारचे मत जाणून घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने सॉलिसिटर जनरलना दिले असून तीन आठवड्यानंतर याप्रकरणाची सुनावणी घेण्यात येणार आहे. 
कायद्यापुढे सर्व नागरिक समान असावेत आणि सर्व धर्माचे नियमन एकाच मापदंडानुसार व्हावे, असे असताना समान नागरी कायदा लागू करण्याबाबत सरकारचे काय मत आहे, तुम्ही तसा कायदा करून तो अमलात का आणत नाही असा सवाल न्या. विक्रमजित सिंग व न्या. शिवा कीर्ती सिंग यांच्या खंडपीठाने सरकारला विचारला. 
घटस्फोट मिळण्यासाठी इतर धर्मातील नागरिकांना एक वर्ष वेगळ रहावं लागत असताना ख्रिश्चन धर्मीयांना घटस्फोटापूर्वी किमान दोन वर्षे वेगळे रहावे लागते. या कायद्याच्या तरतुदीसंदर्भात दाखल करण्यात आलेल्या याचिकेच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायलयाने सरकारकडे ही विचारणा केली. 
आम्ही घटस्फोट कायद्याच्या कलम १०अ(१) मध्ये दुरुस्ती करण्याचे ठरवले असून विधी मंत्रालयाने तसा प्रस्तावही तयार केल्याची माहिती यापूर्वीच्या सुनावणीत न्यायालयाला देण्यात आली होती. ख्रिस्ती धर्मीय नागरिक ज्या कलमान्वये १०अ(१) घटस्फोटासाठी अर्ज करतात, त्यानुसार घटस्फोट घेण्यापूर्वी त्या जोडप्याला दोन वर्ष वेगळे राहिल्यानंतरच परस्परसंमतीने घटस्फोटासाठी अर्ज करता येतो.  पण विशेष विवाह कायदा, हिंदू विवाह कायदा व पारसी विवाह व घटस्फोट कायदा यांमध्ये हा कालावधी फक्त एक वर्षाचा आहे.
शेवटच्या सुनावणीला तीन महिने उलटून गेल्यानंतरही यासदंर्भात कोणताही निर्णय घेण्यात न आल्याने सर्वोच्च न्यायालयाने नाराजी नोंदवत हे का होऊ शकत नाही, असा सवाल सरकारला विचारला. यासाठी थोडा कालावधी देण्यात यावा अशी मागणी सरकारी वकिलांतर्फे करण्यात आली. मात्र सरकारी वकिलांच्या उत्तरावर असामाधानी असलेल्या सर्वोच्च न्यायालयाने सॉलिसिटर जनरलाना सरकारचे मत जाणून घेण्याचे निर्देश दिले.