शहरं
Join us  
Trending Stories
1
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
2
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
3
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
4
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
5
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
6
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
7
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
8
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
9
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
10
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
11
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
12
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
13
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
14
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
15
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
16
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
17
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
18
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
19
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
20
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप

बाहेर काहीच बोलू नका.!

By admin | Updated: August 6, 2014 02:52 IST

पक्षातील एकही गोष्ट बाहेर कळता कामा नये, आज मी जे काय सांगतो आहे, तेही कोणीच बाहेर बोलू नये, असा सज्जड दम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र व गोव्यातील खासदारांना दिला.

रघुनाथ पांडे  - नवी दिल्ली
पक्षातील एकही गोष्ट बाहेर कळता कामा नये, आज मी जे काय सांगतो आहे, तेही कोणीच बाहेर बोलू नये, असा सज्जड दम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र व गोव्यातील खासदारांना दिल्याने तासाभराच्या मोदीभेटीनंतर, ‘ते आले, त्यांनी हस्तांदोलन केले, कसे आहात विचारले आणि मग आम्ही चहापान घेतले.’ या कथेव्यतिरिक्त एकही वाक्य खासदार काढायला तयार नाहीत.
विशेष म्हणजे, खासदार आनंद झाला का, की गुरुमंत्र दिले तेसुद्धा सांगायला राजी नव्हते. तासाभराच्या भेटीत 2क् मिनिटे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मार्गदर्शन केले; तर 4क् मिनिटे चहापान व परिचय झाला. 
सत्ता येण्याआधी आपण काय करतो आहोत, केले आहे. करणार आहोत असे गळ्यात जोर आणून सांगणारे भाजपाचे खासदार सत्तेत येताच चिडीचूप झाल्याचे धक्कादायक चित्र राजधानीत बघायला मिळत आहे. आधीच भाषिक मर्यादा व उत्तरेतील प्रभावामुळे मराठी खासदारांची दिल्लीत मुस्कटदाबी होते, पण प्रथमच पंतप्रधानांनी आमंत्रित केल्यावर त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली, तो अनुभवही सांगण्यास एकही खासदार आजतरी राजी नाही.
महाराष्ट्रातील निवडणुकीच्या पुढय़ात मंगळवारी सायंकाळी साडेसहा वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील भाजपाच्या लोकसभा व राज्यसभेतील खासदारांनी भेटीसाठी आमंत्रित केले. तीन दिवसांपूर्वी निमंत्रणो देण्यात आली होती. संसदेत दिवसभर थांबलेल्या नव्या खासदारांना आपण पंतप्रधानांना भेटणार याचे कमालीचे अप्रूप होते. 
सायंकाळ झाली, सा:यांची पावले पंतप्रधानांच्या 7, रेसकोर्स या निवासस्थाने वळली. सायंकाळी साडेसहानंतर तासभर हे सारे खासदार तिथे होते. राज्याशी संबंधित केंद्रातील मंत्री, लोकसभा व राज्यसभेतील खासदारांची संख्या पूर्ण होती, असे सांगितले गेले.. पण जेव्हा तेथून परतले तेव्हा काही ज्येष्ठ खासदारांनी एकेका खासदारांना जवळ बोलावून माध्यमांना काहीच सांगू का, कुणी खोदून विचारलेच  किंवा परिचयातीलच पत्रकार असेल तर सांगा मोदी साहेबांचे चहापान होते, दुसरे काहीच नाही. झालेही तसेच, बहुतेक खासदारांनी मोबाइल स्वीच ऑफ ठेवले, काही जण तर बाथरूममध्ये होते. काही जण भोजनात व्यस्त होते. काहींशी संपर्क झाला तेव्हा ते म्हणाले, ‘छान झाली भेट, मोदीसाहेब हसतमुख होते.’ 
सूत्रंनी सांगितले की, पंतप्रधान आक्रमक होते. पण हसतहसत ते प्रत्येक खासदाराचा परिचय करून घेत होते. त्यांनी खासदारांच्या 
कामाबद्दल माहिती घेतली, कसे काम केले पाहिजे ते सांगून, कोणत्या मंत्र्यांबाबत काही तक्रार आहे का, असे विचारले, महाराष्ट्रातील निवडणूक जिंकलीच पाहिजे, त्यासाठी 
रूपरेषा निश्चित करा, असे सांगून खासदारांकडे निवडणुकीत असलेली जबाबदारी त्यांनी सांगितली. ती 
त्यांनी कशी पार पाडायची, त्याचे अहवाल दैनंदिन स्वरूपात कोणाला द्यायचे ते ठरविले जाईल, असे सांगितले. राज्यातील 
राजकीय परिस्थिती आपल्याला कशी अनुकूल करून घेता येईल यावर बोलले. काही बदल झालेच तर ते पक्ष हितासाठीच असतील, असे सांगण्यासही त्यांनी मागेपुढे पाहिले नाही. मात्र ते कोणते बदल असतील ते रहस्य कायम ठेवले.
 
मोदी उवाच़़़्
विधानसभा निवडणूक उमेदवारीसाठी शिफारस करू नका़ नातेवाइकांना तिकीट दिले जाणार नाही़ लोकांमध्ये जाऊन काम करा़ निवडणुकीचा सव्र्हे पूर्ण झाला असून, महाराष्ट्रात सरकार आपलं येणार आह़े पुन्हा निवडणूक लढवायची असेल तर प्रसार माध्यमांसमोर जाऊ नका़ एका खासदाराच्या पत्नीनं टोमॅटो महाग झाल्याचं सगळ्यांसमोर वक्तव्य केलं होतं, हे कितपत योग्य आहे, याचा विचार करा़