शहरं
Join us  
Trending Stories
1
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
2
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
3
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
4
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
5
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
6
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
7
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
8
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
9
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
10
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान
11
"माझे ९ लाख रुपये निर्मात्यांनी दिलेले नाहीत", 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्याची व्यथा, म्हणाला- "मी इंजिनियर असूनही..."
12
उप कर्णधार रिषभ पंतचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला MS धोनीचा विक्रम! सेलिब्रेशनही एकदम झक्कास
13
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
14
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
15
टीव्ही कपल लता सबरवाल-संजीव सेठ यांचा घटस्फोट, लग्नानंतर १५ वर्षांनी मोडला संसार
16
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
17
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
18
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
19
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
20
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

प्यू रीसर्चचा अहवाल बघा नी एका मुलावर थांबू नका - VHP चं साकडं

By admin | Updated: April 4, 2015 08:51 IST

भारत 2050 मध्ये सर्वाधिक मुस्लीम लोकसंख्येचा देश होईल या प्यू रिसर्चच्या अंदाजाचा दाखला देत विश्व हिंदू परिषदेने पुन्हा एकदा हे टाळण्यासाठी

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 4 - भारत 2050 मध्ये सर्वाधिक मुस्लीम लोकसंख्येचा देश होईल या प्यू रिसर्चच्या अंदाजाचा दाखला देत विश्व हिंदू परिषदेने पुन्हा एकदा हे टाळण्यासाठी हिंदूंनी जास्तीत जास्त मुलांना जन्म द्यायला हव्या या आपल्या भूमिकेचा पुनरुच्चार केला आहे. जर, हिंदूंनी एका मुलावर समाधान मानलं तर कालौघात मुस्लीम या देशाचा ताबा घेतील अशी भीतीही विहिंपने घातली आहे.
याखेरीज घर वापसी हा अत्यंत वादग्रस्त असलेला या हिंदुत्ववादी संघटनेचा कार्यक्रमही सुरूच राहणार असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट करण्यात आले आहे. माझ्या रक्ताचा डीएनए तपासला तर तो इथल्या हिंदूशी समानधर्म दाखवेल या ज्युलियो रिबेरो यांच्या वक्तव्याचा दाखला देत आम्हीपण हेच सांगतोय असं परिषदेनं म्हटलं आहे.
प्यू रीसर्चच्या अहवालाचा दाखला देताना विहिंपचे आंतरराष्ट्रीय सचिव चंपत राय म्हणाले की किती मुलं जन्माला घालायची हा वैयक्तिक प्रश्न नाही, तसे असते तर या देशाची फाळणी झाली नसती असंही त्यांनी सांगितले.
घरवापसीबाबत बोलताना चंपत राय म्हणाले की नरेंद्र मोदी सरकारला आवडो वा ना आवडो हा कार्यक्रम सुरूच राहणार कारण यासाठीच विहिंपची स्थापना झालेली आहे. भारतातल्या प्रत्येकाचे पूर्वज कोण होते हे सांगणं आमचं काम आहे आणि ते आम्ही करणार अशी पुस्तीही राय यांनी जोडली.
प्रवीण तोगडियांना पश्चिम बंगालमध्ये भाषण करण्यास मज्जाव घातल्याबद्दल त्यांनी ममता बॅनर्जी यांच्या सरकारवर टीका केली आहे. अर्थात बंगालमधला हिंदू समाज जागा होत असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.