शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

प्यू रीसर्चचा अहवाल बघा नी एका मुलावर थांबू नका - VHP चं साकडं

By admin | Updated: April 4, 2015 08:51 IST

भारत 2050 मध्ये सर्वाधिक मुस्लीम लोकसंख्येचा देश होईल या प्यू रिसर्चच्या अंदाजाचा दाखला देत विश्व हिंदू परिषदेने पुन्हा एकदा हे टाळण्यासाठी

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 4 - भारत 2050 मध्ये सर्वाधिक मुस्लीम लोकसंख्येचा देश होईल या प्यू रिसर्चच्या अंदाजाचा दाखला देत विश्व हिंदू परिषदेने पुन्हा एकदा हे टाळण्यासाठी हिंदूंनी जास्तीत जास्त मुलांना जन्म द्यायला हव्या या आपल्या भूमिकेचा पुनरुच्चार केला आहे. जर, हिंदूंनी एका मुलावर समाधान मानलं तर कालौघात मुस्लीम या देशाचा ताबा घेतील अशी भीतीही विहिंपने घातली आहे.
याखेरीज घर वापसी हा अत्यंत वादग्रस्त असलेला या हिंदुत्ववादी संघटनेचा कार्यक्रमही सुरूच राहणार असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट करण्यात आले आहे. माझ्या रक्ताचा डीएनए तपासला तर तो इथल्या हिंदूशी समानधर्म दाखवेल या ज्युलियो रिबेरो यांच्या वक्तव्याचा दाखला देत आम्हीपण हेच सांगतोय असं परिषदेनं म्हटलं आहे.
प्यू रीसर्चच्या अहवालाचा दाखला देताना विहिंपचे आंतरराष्ट्रीय सचिव चंपत राय म्हणाले की किती मुलं जन्माला घालायची हा वैयक्तिक प्रश्न नाही, तसे असते तर या देशाची फाळणी झाली नसती असंही त्यांनी सांगितले.
घरवापसीबाबत बोलताना चंपत राय म्हणाले की नरेंद्र मोदी सरकारला आवडो वा ना आवडो हा कार्यक्रम सुरूच राहणार कारण यासाठीच विहिंपची स्थापना झालेली आहे. भारतातल्या प्रत्येकाचे पूर्वज कोण होते हे सांगणं आमचं काम आहे आणि ते आम्ही करणार अशी पुस्तीही राय यांनी जोडली.
प्रवीण तोगडियांना पश्चिम बंगालमध्ये भाषण करण्यास मज्जाव घातल्याबद्दल त्यांनी ममता बॅनर्जी यांच्या सरकारवर टीका केली आहे. अर्थात बंगालमधला हिंदू समाज जागा होत असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.