शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
2
Navi Mumbai Traffic: मराठा मोर्चा नवी मुंबईच्या वेशीवर, वाहतुकीत मोठे बदल; कोणते रस्ते बंद, कोणते खुले?
3
संजय गायकवाडांच्या आमदारकीचं काय होणार? ठाकरेंच्या नेत्याने ठोठावले उच्च न्यायालयाचे दार
4
संभल समितीनं CM योगींना सादर केला अहवाल, करण्यात आले खळबळजनक खुलासे; जिल्ह्यात फक्त १५% हिंदू उरले!
5
निक्की भाटी प्रकरणात वृद्ध शेजाऱ्याने केला धक्कादायक खुलासा; म्हणाला, 'निक्की जळत होती तेव्हा विपिन...'
6
भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
7
१ वर्षात केली स्पर्धा परीक्षेची तयारी, पहिल्याच प्रयत्नात यश; MBBS डॉक्टर बनली IAS अधिकारी
8
केस कलर करण्याची हौस बेतली जीवावर; तरुणीसोबत घडलं भयंकर, अवस्था पाहून बसेल धक्का
9
TCS-एचसीएलसह आयटी क्षेत्रात 'भूकंप'! बाजार ७०६ अंकांनी घसरला; या कारणामुळे मोठी घसरण
10
४ महिन्यांपूर्वी झाले होते लग्न, क्षणार्धात मोडले सुखी संसाराचे स्वप्न; वैष्णो देवी दुर्घटनेत चांदनीने गमावला जीव
11
"माझी एवढीच अपेक्षा आहे की कुठलेही..."; मनोज जरांगेंच्या आंदोलनावर CM फडणवीसांनी मांडली स्पष्ट भूमिका
12
'चिता' झेपावला, जवान बनले 'देवदूत'; मृत्यूच्या दाढेतून २७ जणांना बाहेर काढले, पूरग्रस्त भागात लष्कराची सेवा
13
अमेरिकन लढाऊ विमानाला हवेतच आग लागली, अलास्कामध्ये F-35 विमान कोसळले
14
प्रेमासाठी काय पण...! क्वांटम डेटिंग म्हणजे काय, नव्या पिढीमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
15
शी जिनपिंग यांचं सीक्रेट लेटर, मैत्रीसाठी पुढाकार; भारत-चीन संंबंध सुधारण्यामागची Inside Story
16
रोज फोनवर बोलता बोलता मित्राच्या पत्नीवर जीव जडला, अडथळा ठरलेल्या नवऱ्याचा प्रियकरानेच खेळ खल्लास केला! 
17
भयंकर! तांत्रिकाच्या सांगण्यावरून ११ वीतील युवकाचा दिला नरबळी; शीर धडापासून वेगळे केले, अन्...
18
बॉयफ्रेंडने लाथा-बुक्क्यांनी मारलं, सर्व पैसे चोरले, माझं घर घेतलं; प्रसिद्ध गायिकेचा गंभीर आरोप
19
ना चित्रपट ना जाहिरात, तरीही सोनू सूदने कमावले ३.१० कोटी रुपये; काय आहे उत्पन्नाचा स्त्रोत?
20
पहिलाच टी-२० सामना ठरला शेवटचा; जाणून घ्या 'त्या' ५ भारतीय खेळाडूंबद्दल!

मणिपूरमध्ये बंद व नाकेबंदी नको, हवीय रोजगार संधी

By admin | Updated: February 24, 2017 01:40 IST

मणिपूरमध्ये पहिल्यांदाच मताचा हक्क बजावणाऱ्यांना राज्यातील नाकेबंदी आणि बंदचे राजकारण संपावे, असे वाटते

इम्फाळ : मणिपूरमध्ये पहिल्यांदाच मताचा हक्क बजावणाऱ्यांना राज्यातील नाकेबंदी आणि बंदचे राजकारण संपावे, असे वाटते. त्यांनी आम्हाला चांगले शिक्षण आणि रोजगाराची संधी मिळावी अशी मागणी केली आहे. येथील ज्या ज्या युवकांशी संवाद साधला त्यांनी त्यांना आर्थिक नाकेबंदी बंद होऊन हिंसाचारग्रस्त मणिपूरमध्ये शांतता स्थापन व्हावी, असे सांगितले. मी माझ्या लहानपणापासून राजकीय असंतोष, नाकेबंदी आणि व्यवहार बंद याबद्दलच ऐकत आलो आहे. जास्तीत जास्त रोजगार संधी निर्माण होतील व शैक्षणिक संधी उपलब्ध होतील या दृष्टीने आम्ही हे रक्तपाताचे दिवस मागे टाकून पाऊल पुढे टाकण्याची वेळ आली आहे, असे नाव न छापण्याच्या अटीवर एका विद्यार्थ्याने सांगितले.एकदा नाकेबंदी केली तर जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढतात, स्कूटर चालवायलाही आम्हाला इंधन मिळत नाही. पर्यायाने आमचे दैनंदिन जीवन कोलमडून पडते. आम्हा सर्र्वाना आमच्या राज्यात शांतता आणि समृद्धी हवी आहे. आम्हाला रोजरोजची नाकेबंदी आणि अस्वस्थता नको आहे, असे एका विद्यार्थ्याने सांगितले. ईशान्येकडील या राज्यामध्ये बेरोजगारी हा फार मोठा प्रश्न आहे. बहुतेक युवकांना मणिपूरचा विकास माहिती व तंत्रज्ञान व शिक्षणाचे महत्त्वाचे केंद्र बनावे, असे वाटते. (वृत्तसंस्था)तरुण अन्य राज्यांत जात आहेतमणिपूरमध्ये एक नोव्हेंबर २०१६ पासून युनायटेड नागा कौन्सिलने (यूएनसी) आर्थिक नाकेबंदी व बंद आंदोलन सुरू केले आहे. राज्य सरकारने सात नवे जिल्हे तयार करण्याच्या घेतलेल्या निर्णयाला या आंदोलनाद्वारे विरोध केला जात आहे. या आंदोलनामुळे इंधनासह जीवनावश्यक वस्तूंच्या राज्यातील पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. तरुण मतदारांची मागणी रोजगारांची संधी आणि चांगले शिक्षण मिळण्याची आहे. त्यापैकी अनेक जण मुंबई, दिल्ली, कोलकाता किंवा बंगळुरूला जातात.बहुतेक युवक त्यांचे उच्च माध्यमिक किंवा पदवी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मणिपूर सोडतात कारण मणिपूरमध्ये चांगल्या म्हणता येतील अशा शिक्षणाच्या सोयी किंवा रोजगारही नाही, असे बी. शरद या पहिल्यांदाच मतदान करणाऱ्याने सांगितले.