शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण-नगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
2
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
3
Latest Marathi News LIVE: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
4
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
5
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
6
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
7
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
8
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
9
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
10
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
11
Swapna Shastra: सावधान! स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे म्हणजे संकटाची चाहूल? वाईट प्रभाव रोखण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय!
12
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
13
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
14
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
15
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
16
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
17
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
18
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
19
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
20
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
Daily Top 2Weekly Top 5

डोन्ट रन अवे, डोन्ट एस्केप; नेटिझन्सची आमिरवर टीका

By admin | Updated: November 25, 2015 00:20 IST

राजधानी दिल्लीमध्ये सोमवारी झालेल्या रामनाथ गोएंका पत्रकारिता पुरस्कार समारंभात बोलताना ‘माझ्या पत्नीला मुलांची काळजी वाटते, तिला देश सोडावासा वाटतो

मुंबई : राजधानी दिल्लीमध्ये सोमवारी झालेल्या रामनाथ गोएंका पत्रकारिता पुरस्कार समारंभात बोलताना ‘माझ्या पत्नीला मुलांची काळजी वाटते, तिला देश सोडावासा वाटतो,’ असे विधान करणाऱ्या अभिनेता आमिर खानवर टिष्ट्वटर आणि फेसबुकवर नेटिझन्सनी मंगळवारी प्रश्नांची चांगलीच सरबत्ती केली. दिवसभरात एक लाखाहून अधिक टिष्ट्वटस् आणि रिटिष्ट्वटस्मधून आमिरवर टीका करण्यात आली. भारतात जर असहिष्णू वातावरण वाटत असेल तर पळून जाऊ नको. लोकांना जगण्यास आशा वाटेल असे काहीतरी कर, अशा शब्दांत लोकांनी आमिर खानला सल्लेही दिले.आमिर खानच्या वक्तव्याविरोधात अभिनेते अनुपम खेर यांनी पहिली आघाडी उघडून ‘इन्क्रेडिबल इंडिया’साठी काम करणाऱ्या तुला गेल्या सात ते आठ महिन्यांमध्ये अचानक ‘इंटॉलरंट इंडिया’ कसा काय वाटू लागला असे विचारले. आजवर याहून कठीण काळाचा सामना तू केलास आणि तेव्हा कधीही हा देश सोडावासा वाटला नाही, हे तू तुझी पत्नी किरणला सांगितलेस का? किरणचा कोणत्या देशात निघून जाण्याचा विचार आहे आणि याच देशाने आमिर खानला घडविले आहे हे तू तिला सांगितलेस का, असा प्रश्नही खेर यांनी त्याला टिष्ट्वटरवरून विचारला.खेर यांच्यापाठोपाठ अभिनेते आणि भाजप खासदार परेश रावल यांनीही खरा देशभक्त संकटकाळातही मातृभूमीला सोडून जात नाही, ‘डोंट एस्केप, बिल्ड इट’ अशा शब्दांमध्ये आमिरला सल्ला दिला.‘ज्या वेळेस व्यवस्था योग्यरीत्या काम करत नाही तेव्हा त्यामध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न करा. त्यापासून पळून जाऊ नका आणि असे करणाराच नायक असतो’, अशा शब्दांमध्ये अभिनेते ऋषी कपूर यांनी आमिरच्या वक्तव्याचा समाचार घेतला.फेसबुक आणि टिष्ट्वटरवरही आमिरच्या या वक्तव्यावर विविध मते दिवसभर उमटत राहिली. आमिरचा नवा सिनेमा लवकरच येत असल्यामुळे त्याने हा वाद ओढवून घेतला असाही सूर काही ठिकाणी लावण्यात आला, तर ‘आमिर आॅन इनटॉलरन्स’ या हॅशटॅगवर सतत टिष्ट्वटस् होत राहिले.(प्रतिनिधी)- सातारा जिल्ह्यातील कर्नल संतोष महाडिक यांचे नुकतेच दहशतवाद्यांशी लढताना निधन झाले. त्यांना अखेरचा निरोप देताना त्यांच्या पत्नीने मी माझी दोन्ही मुले देशासाठी लष्करातच पाठवेन, असे जाहीर केले. एक वीरपत्नी सौभाग्य गेले तरी आपल्या मुलांना देशसेवेसाठी देईन म्हणते आणि आमिरची पत्नी मात्र मुलांसाठी देश सोडण्याचा विचार करते, अशी तुलना करणारे संदेश दिवसभर टिष्ट्वटर, फेसबुक आणि व्हॉटस् अ‍ॅपवर फिरत राहिले.