शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

डोन्ट रन अवे, डोन्ट एस्केप; नेटिझन्सची आमिरवर टीका

By admin | Updated: November 25, 2015 00:20 IST

राजधानी दिल्लीमध्ये सोमवारी झालेल्या रामनाथ गोएंका पत्रकारिता पुरस्कार समारंभात बोलताना ‘माझ्या पत्नीला मुलांची काळजी वाटते, तिला देश सोडावासा वाटतो

मुंबई : राजधानी दिल्लीमध्ये सोमवारी झालेल्या रामनाथ गोएंका पत्रकारिता पुरस्कार समारंभात बोलताना ‘माझ्या पत्नीला मुलांची काळजी वाटते, तिला देश सोडावासा वाटतो,’ असे विधान करणाऱ्या अभिनेता आमिर खानवर टिष्ट्वटर आणि फेसबुकवर नेटिझन्सनी मंगळवारी प्रश्नांची चांगलीच सरबत्ती केली. दिवसभरात एक लाखाहून अधिक टिष्ट्वटस् आणि रिटिष्ट्वटस्मधून आमिरवर टीका करण्यात आली. भारतात जर असहिष्णू वातावरण वाटत असेल तर पळून जाऊ नको. लोकांना जगण्यास आशा वाटेल असे काहीतरी कर, अशा शब्दांत लोकांनी आमिर खानला सल्लेही दिले.आमिर खानच्या वक्तव्याविरोधात अभिनेते अनुपम खेर यांनी पहिली आघाडी उघडून ‘इन्क्रेडिबल इंडिया’साठी काम करणाऱ्या तुला गेल्या सात ते आठ महिन्यांमध्ये अचानक ‘इंटॉलरंट इंडिया’ कसा काय वाटू लागला असे विचारले. आजवर याहून कठीण काळाचा सामना तू केलास आणि तेव्हा कधीही हा देश सोडावासा वाटला नाही, हे तू तुझी पत्नी किरणला सांगितलेस का? किरणचा कोणत्या देशात निघून जाण्याचा विचार आहे आणि याच देशाने आमिर खानला घडविले आहे हे तू तिला सांगितलेस का, असा प्रश्नही खेर यांनी त्याला टिष्ट्वटरवरून विचारला.खेर यांच्यापाठोपाठ अभिनेते आणि भाजप खासदार परेश रावल यांनीही खरा देशभक्त संकटकाळातही मातृभूमीला सोडून जात नाही, ‘डोंट एस्केप, बिल्ड इट’ अशा शब्दांमध्ये आमिरला सल्ला दिला.‘ज्या वेळेस व्यवस्था योग्यरीत्या काम करत नाही तेव्हा त्यामध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न करा. त्यापासून पळून जाऊ नका आणि असे करणाराच नायक असतो’, अशा शब्दांमध्ये अभिनेते ऋषी कपूर यांनी आमिरच्या वक्तव्याचा समाचार घेतला.फेसबुक आणि टिष्ट्वटरवरही आमिरच्या या वक्तव्यावर विविध मते दिवसभर उमटत राहिली. आमिरचा नवा सिनेमा लवकरच येत असल्यामुळे त्याने हा वाद ओढवून घेतला असाही सूर काही ठिकाणी लावण्यात आला, तर ‘आमिर आॅन इनटॉलरन्स’ या हॅशटॅगवर सतत टिष्ट्वटस् होत राहिले.(प्रतिनिधी)- सातारा जिल्ह्यातील कर्नल संतोष महाडिक यांचे नुकतेच दहशतवाद्यांशी लढताना निधन झाले. त्यांना अखेरचा निरोप देताना त्यांच्या पत्नीने मी माझी दोन्ही मुले देशासाठी लष्करातच पाठवेन, असे जाहीर केले. एक वीरपत्नी सौभाग्य गेले तरी आपल्या मुलांना देशसेवेसाठी देईन म्हणते आणि आमिरची पत्नी मात्र मुलांसाठी देश सोडण्याचा विचार करते, अशी तुलना करणारे संदेश दिवसभर टिष्ट्वटर, फेसबुक आणि व्हॉटस् अ‍ॅपवर फिरत राहिले.