शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
4
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
5
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
6
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
7
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
8
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
9
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
10
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
11
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
12
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
13
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
14
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
15
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
16
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
17
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
18
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
19
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

एएमयू, जेएमआयचा अल्पसंख्याक दर्जा काढू नका

By admin | Updated: January 23, 2016 03:26 IST

अलिगड मुस्लिम विद्यापीठ(एएमयू) आणि जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाचा (जेएमआय) अल्पसंख्याक दर्जा काढून घेण्याचे केंद्र सरकारने

नवी दिल्ली : अलिगड मुस्लिम विद्यापीठ(एएमयू) आणि जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाचा (जेएमआय) अल्पसंख्याक दर्जा काढून घेण्याचे केंद्र सरकारने चालविलेले प्रयत्न हाणून पाडण्यासाठी काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि डाव्यांसह आठ पक्षांनी शुक्रवारी एकजुटीचे दर्शन घडविले. या मुद्यावर अटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांची खरडपट्टी काढत या पक्षांनी सरकारलाही धारेवर धरले आहे.सरकारच्या प्रस्तावाला विरोध करण्यासाठी स्वाक्षरी मोहीम सुरू करतानाच राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना निवेदन देऊन लक्ष वेधणार असल्याचे या आठ पक्षांच्या खासदारांनी स्पष्ट केले आहे. संसदेच्या येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात हा मुद्दा गाजणार असल्याचे संकेतही त्यांनी दिले. केंद्र सरकारने एएमयू आणि जेएमआय या विद्यापीठांचा अल्पसंख्याक दर्जा काढून घेण्याची घिसाडघाई चालविणे चिंतेची बाब असून आम्ही या प्रयत्नांचा तीव्र निषेध करीत असल्याचे काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, जेडीयू, राजद, राकाँ, भाकप, माकप आणि ‘आप’च्या खासदारांनी संयुक्त निवेदनात म्हटले. या दोन्ही संस्था अल्पसंख्याक नसल्याचा दावा रोहतगी यांनी केल्याबद्दल या खासदारांनी तीव्र निंदा केली. रोहतगी यांनी सर्वोच्च न्यायालयात मुद्दा मांडताना ‘गंगा जमुनी तेहजीब’ या समृद्ध परंपरेकडे हेतुपुरस्सर डोळेझाक केलेली आहे, असेही त्यांनी म्हटले. काय म्हणाले, अ‍ॅटर्नी जनरल...दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया ही अल्पसंख्याक संस्था नाही, कारण तिची निर्मिती संसदेच्या कायद्यानुसार झाली आहे. अलिगड मुस्लिम विद्यापीठाला विधेयकात कधीही अल्पसंख्याक संस्था संबोधले नाही, असे अ‍ॅटर्नी जनरल रोहतगी यांनी सर्वोच्च न्यायालयाला सांगितले होते. त्यांनी मानव संसाधन विकास मंत्रालयाकडे अभिप्राय पाठविताना १९६७ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा दाखलाही दिला होता. एएमयू ही तांत्रिकदृष्ट्या अल्पसंख्याक संस्था ठरत नाही, असे या न्यायालयाने त्यावेळी स्पष्ट केले होते, तेच सूत्र जेएमआयला लागू होते, असे रोहतगी यांनी म्हटले. सरकारने मांडलेली बाजू!रोहतगी यांनी साधारणपणे आठवड्यापूर्वी सर्वोच्च न्यायालयात सरकारची बाजू मांडली. भारत धर्मनिरपेक्ष देश असल्याने एएमयूला अल्पसंख्याक संस्था मानले जाऊ शकत नाही. ही संस्था अल्पसंख्याक नाहीच, असे सरकारला वाटत असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. मानव संसाधन मंत्रालयाने या दोन विद्यापीठांच्या अल्पसंख्याक दर्जाबाबत कायदा मंत्रालयाला मत मागितल्यानंतर कायदा मंत्रालयाने रोहतगी यांचा सल्ला घेतला होता. (लोकमत न्यूज नेटवर्क)