शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
2
अखेर ठरलं! एल्फिन्स्टन पूल 'या' दिवशी होणार बंद, वाहतूक विभागाने दिली माहिती
3
'एकीला पाठवून आता पश्चात्ताप करतोय, आता दुसरीला त्यांच्याकडे...'; लेकीच्या आठवणीने निक्कीची आईला अश्रू अनावर!
4
तुमच्याकडेही SBI क्रेडिट कार्ड आहे का? आता 'हे' फायदे कायमचे बंद, १ सप्टेंबरपासून नवा नियम लागू
5
तेल व्यवसायाचा King! अमेरिका पाहत राहिला..; भारताने जगाला विकले ५.३५ लाख कोटींचे तेल
6
शाहरुखसोबत अनेक वर्षांनी मिटला वाद, आता सनी देओलने किंग खानच्या लेकाची केली स्तुती
7
'या'वर लागू शकतो मोठा टॅक्स, महाग होऊ शकतात 'या' वस्तू; पुढील आठवड्यात घोषणा होणार?
8
गर्भनिरोधक गोळ्यांचं ऑनलाइन पेमेंट फेल झालं अन् पतीचं 'लफडं' उघडं पडलं; मग पत्नीनं उचललं टोकाचं पाऊल
9
पाण्याच्या टाकीत लपवले होते ३९ लाख रुपये! जप्त केलेल्या पैशांचे आणि मालमत्तेचे पुढे काय होते?
10
राहुल गांधी विरुद्ध निवडणूक आयोग! 'मतचोरी'च्या मुद्द्यावर जनतेची साथ कुणाला? सर्व्हेतून धक्कादायक खुलासा
11
कधीही पिऊ नका 'हे' ३ ज्यूस, फायद्याऐवजी होईल नुकसान; डॉक्टरांनीच दिला धोक्याचा इशारा
12
Maharashtra Rain: कमी दाबाच्या पट्टा कसा तयार होतो, त्यामुळे महाराष्ट्रात इतका पाऊस का पडतो?
13
खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह ३ जणांची मनसेतून हकालपट्टी; राज ठाकरेंचे आदेश
14
सर्वांनी यावेळी तुटून पडा; मनोज जरांगे यांनी मुंबईकडे कूच करण्याचा संपूर्ण प्लॅनच सांगितला!
15
मनसेच्या २ माजी नगरसेवकांचा शिंदेसेनेत प्रवेश; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हाती घेतला धनुष्यबाण
16
"मनोज जरांगे, तुम्हाला एवढीच जर खाज आहे, तर ज्या शरद पवारांनी..."; आमदार लाड, दरेकर का भडकले?
17
गणेश चतुर्थी २०२५: गणेशोत्सवात कोणते नियम अवश्य पाळायलाच हवेत? पाहा, शास्त्र काय सांगते...
18
Asia Cup 2025 : विराट-रोहितच्या खांद्यावरून पाकच्या माजी क्रिकेटरचा सूर्या दादावर निशाणा, म्हणे...
19
Ganpati Invitation Messages: गणेश चतुर्थीला मित्र-नातेवाईकांना WhatsApp, Facebook वर हे खास संदेश पाठवून करा स्पेशल आमंत्रण
20
आयुष्य संपवण्यासाठी नदीत उडी मारली पण नंतर मूड बदलला, मदतीसाठी ओरडला अन्...

न्यायव्यवस्थेवरील विश्वासाला तडा जाऊ देऊ नका - सरन्यायाधीश लोढा

By admin | Updated: August 11, 2014 13:17 IST

न्यायाधीशांच्या नियुक्तीसाठी नेमलेली कॉलेजियम प्रणाली अपयशी ठरली नसून न्यायव्यवस्थेवरील जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देऊ नका असे मत सरन्यायाधीश आर.एम. लोढा यांनी मांडले आहे.

ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि. ११ - भारताच्या न्यायव्यवस्थेला बदनाम करण्याची मोहीम हा चिंतेचा विषय आहे. न्यायाधीशांच्या नियुक्तीसाठी नेमलेली कॉलेजियम प्रणाली अपयशी ठरली नसून न्यायव्यवस्थेवरील जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देऊ नका असे मत सरन्यायाधीश आर.एम. लोढा यांनी मांडले आहे.
न्यायाधीश मंजुनाथ यांची हरियाणा आणि पंजाब हायकोर्टाच्या मुख्य न्यायाधीशपदी नेमणूक करण्यास केंद्र सरकारने तीव्र विरोध दर्शवला होता. यानंतर मंजुनाथ यांनी सर्वोच्च न्यायालयात जनहीत याचिका दाखल केली होती. या याचिकेत त्यांनी न्यायाधीशांच्या नियुक्तीसाठी नेमलेल्या कॉलेजियमने केलेली शिफारस सार्वजनिक करावी अशी मागणी केली होती. सरन्यायाधीश आर.एम. लोढा यांनी सोमवारी ही याचिका फेटाळून लावली. कॉलेजियम प्रणालीची पाठराखण करत सरन्यायाधीश लोढा म्हणाले, कॉलेजियम प्रणाली अपयशी ठरलेली नाही. मी या प्रणालीनुसार नियुक्त झालो होतो. तर न्या. रोहिंतन या प्रणालीने नियुक्त झालेले शेवटचे न्यायाधीश आहेत. ही प्रणाली अपयशी ठरली असती तर आपणही अपयशी ठरतो. त्यामुळे न्यायव्यवस्थेवरील जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देऊ नका असे लोढा यांनी सुनावले. 
कॉलेजियमचा प्रमुख मी आहे. कॉलेजियमने न्या. मंजूनाथ यांच्याविषयी कोणतीही शिफारस केलेली नाही. मग तुम्हाला ही माहिती कोणी दिली ? असा सवाल करत प्रसारमाध्यमांमध्ये न्यायव्यवस्थेला बदनाम करण्याचे प्रयत्न सुरु असल्याचे लोढा यांनी नमूद केले,