अहमदनगर : हवामानात मोठ्या प्रमाणात बदल होत आहे़ त्याचा पिकांवर विपरीत परिणाम होत असून, पिक पद्धतीत बदल करावा किंवा करु नये, यासाठी विद्यापीठातील शास्त्रज्ञांमध्येही एकमत झालेले नाही़ मात्र, बदलत्या हवामानानुसार पीक पद्धतीत काय बदल करावेत, याबाबत कृषी विद्यापीठाने शेतकर्यांना मार्गदर्शन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी दिल्या आहेत़नियोजन भवनात जिल्हाधिकारी कवडे यांच्या अध्यक्षतेखाली खरीप पिकांच्या नियोजनाची बैठक झाली़ या बैठकीत कवडे यांनी हवामानाची सद्यस्थिती जाणून घेतानाच हवामानाचा पिक पद्धतीवर मोठा परिणाम होत असल्याने शेतीशास्त्र कोलमडण्याची शक्यता व्यक्त केली़ ते म्हणाले, जिल्ह्यातील प्रत्येक महसूल मंडळात पर्जन्यमापक यंत्र बसवण्यात आले आहे. जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक म्हणजेच ५९२ मि.मी. पाऊस झालेला आहे़ असे असले तरी आगामी अंदाजानुसार सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याचे संकेत आहेत. अशा परिस्थीतीत कृषी विभाग, कृषी विद्यापीठाने पीक पध्दतीबाबत शेतकर्यांना योग्य ते मार्गदर्शन करावे, पिकांबाबत आकस्मिक योजना तयार करावी़ हवामानातील बदल लक्षात घेता शेतकर्यांनी पीकपध्दतीत बदल करण्याची गरज आहे का, हवामान बदलाचे काय परिणाम आहेत, याबाबत जिल्हास्तरावर कार्यशाळा घेऊन जनजागृती करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी कवडे यांनी दिले.हवामान बदलानुसार पीक पद्धतीत बदल करण्याबाबत राज्य सरकारने एक समिती नेमली होती़ राहुरी कृषी विद्यापीठातील संशोधक संचालकांनीही पिक पद्धतीत बदल करण्याबाबतचा अहवाल गेल्या दोन वर्षापूर्वी सादर केला होता़ मात्र, सरकारने हवामान बदलानुसार पीक पद्धतीत बदल करण्याबाबतचे अद्याप कोणतेही निर्देश दिलेले नाहीत़ त्यामुळे शेतकर्यांचे मोठे नुकसान होत आहे़़़़़़़़़़़़हवामानात मोठे बदल होत आहे़ अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले़ शेतकर्यांना शासनाने आर्थिक मदत दिली़ पण त्यामुळे शेतकर्यांचे नुकसान भरुन येणारे नसते़ शेतकर्यांना दिलासा देण्यासाठी ही मदत असते़ शेतकर्यांनीही आगामी काळात पीक विम्याबाबत गांभिर्याने विचार करण्याची गरज आहे. - अनिल कवडे, जिल्हाधिकारी
हवामान बदलाने कोलमडतेय शेतीशास्त्र पीक पद्धतीत बदलाबाबत जिल्हाधिकार्यांच्या सूचना
By admin | Updated: May 9, 2014 00:54 IST