शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये आपला झटका! एक आमदार वाढत नाही तोच दुसरा सोडून गेला; मकवाना यांचा राजीनामा
2
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
3
MNS Morcha: मोर्चाला कोण येणार नाही हेही मला बघायचंय; राज ठाकरेंची हिंदी सक्तीविरोधात भव्य मोर्चाची घोषणा
4
चीन जगात खळबळ उडवणार! डासांसारखा दिसणारा ड्रोन आणणार, वाचा सविस्तर
5
Air India Plane Crash: ब्लॅक बॉक्सच्या तपासात यश, डेटा झाला डाउनलोड; अपघाताचे कारण कधी समोर येणार?
6
इराण-इस्त्रायल युद्धातून भारताने घेतला धडा; आता 'ही' क्षमता दुप्पट करण्याची तयारी
7
नोकरीच्या पहिल्याच दिवशी दिला राजीनामा, कारण ऐकून HR भडकली, सोशल मीडियावर चॅट व्हायरल केली
8
'गुगल ताण देतो, देव ताण दूर करतो!' मुंबई IIT चे बॅचमेट सुंदर पिचाई आणि गौरांग दास यांच्या भेटीत काय घडलं?
9
७२ वर्षांपूर्वी असं काय घडलं की, इराण आणि अमेरिका बनले एकमेकांचे कट्टर शत्रू?
10
कर्ज घेऊन कार खरेदी करणे अधिक फायदेशीर ठरते का?
11
'इराणकडे भरपूर तेल...', ट्रम्प यांचा इराणी तेलावर डोळा; तीन दिवसात तीनवेळा केला उल्लेख
12
ती मुलगी मला पसंत नव्हती, तरी...; २३ वर्षांच्या नवरदेवाने सोशल मीडियावर पोस्ट लिहिली अन् केलं कांड!
13
भारताच्या मित्र देशात सत्तांतराचं मोठं षडयंत्र अयशस्वी; प्रमुख आर्कबिशप यांच्यासह १४ जण अटकेत
14
"मला आणि माझ्या मुलाला इच्छामरणाचा अधिकार द्या" मुंबईकराचं फडणवीसांना पत्र, कारणही सांगितलं!
15
युद्धविराम झाला तरी...! इराणचे खामेनी बेपत्ता, इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन सुरूच
16
लाखावर दर गेल्यावर युरोप मागतोय अमेरिकेकडे सोने; रस्त्याच्या खाली आहे लाखो टन सोने...
17
रील बनवताना १३व्या मजल्यावरून पडून २० वर्षीय तरुणीचा मृत्यू!
18
"...तर आईची भाषा घरा बाहेर गेलीच समजा’’, वैभव मांगलेंची खरमरीत पोस्ट, उपस्थित केले असे प्रश्न 
19
'नमस्कार फ्रॉम स्पेस...', अंतराळातून शुभांशू शुक्लांचा नवीन Video; काय म्हणाले पाहा...

हवामान बदलाने कोलमडतेय शेतीशास्त्र पीक पद्धतीत बदलाबाबत जिल्हाधिकार्‍यांच्या सूचना

By admin | Updated: May 9, 2014 00:54 IST

अहमदनगर : हवामानात मोठ्या प्रमाणात बदल होत आहे़ त्याचा पिकांवर विपरीत परिणाम होत असून, पिक पद्धतीत बदल करावा किंवा करु नये, यासाठी विद्यापीठातील शास्त्रज्ञांमध्येही एकमत झालेले नाही़ मात्र, बदलत्या हवामानानुसार पीक पद्धतीत काय बदल करावेत, याबाबत कृषी विद्यापीठाने शेतकर्‍यांना मार्गदर्शन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी दिल्या आहेत़

अहमदनगर : हवामानात मोठ्या प्रमाणात बदल होत आहे़ त्याचा पिकांवर विपरीत परिणाम होत असून, पिक पद्धतीत बदल करावा किंवा करु नये, यासाठी विद्यापीठातील शास्त्रज्ञांमध्येही एकमत झालेले नाही़ मात्र, बदलत्या हवामानानुसार पीक पद्धतीत काय बदल करावेत, याबाबत कृषी विद्यापीठाने शेतकर्‍यांना मार्गदर्शन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी दिल्या आहेत़नियोजन भवनात जिल्हाधिकारी कवडे यांच्या अध्यक्षतेखाली खरीप पिकांच्या नियोजनाची बैठक झाली़ या बैठकीत कवडे यांनी हवामानाची सद्यस्थिती जाणून घेतानाच हवामानाचा पिक पद्धतीवर मोठा परिणाम होत असल्याने शेतीशास्त्र कोलमडण्याची शक्यता व्यक्त केली़ ते म्हणाले, जिल्ह्यातील प्रत्येक महसूल मंडळात पर्जन्यमापक यंत्र बसवण्यात आले आहे. जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक म्हणजेच ५९२ मि.मी. पाऊस झालेला आहे़ असे असले तरी आगामी अंदाजानुसार सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याचे संकेत आहेत. अशा परिस्थीतीत कृषी विभाग, कृषी विद्यापीठाने पीक पध्दतीबाबत शेतकर्‍यांना योग्य ते मार्गदर्शन करावे, पिकांबाबत आकस्मिक योजना तयार करावी़ हवामानातील बदल लक्षात घेता शेतकर्‍यांनी पीकपध्दतीत बदल करण्याची गरज आहे का, हवामान बदलाचे काय परिणाम आहेत, याबाबत जिल्हास्तरावर कार्यशाळा घेऊन जनजागृती करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी कवडे यांनी दिले.हवामान बदलानुसार पीक पद्धतीत बदल करण्याबाबत राज्य सरकारने एक समिती नेमली होती़ राहुरी कृषी विद्यापीठातील संशोधक संचालकांनीही पिक पद्धतीत बदल करण्याबाबतचा अहवाल गेल्या दोन वर्षापूर्वी सादर केला होता़ मात्र, सरकारने हवामान बदलानुसार पीक पद्धतीत बदल करण्याबाबतचे अद्याप कोणतेही निर्देश दिलेले नाहीत़ त्यामुळे शेतकर्‍यांचे मोठे नुकसान होत आहे़़़़़़़़़़़़हवामानात मोठे बदल होत आहे़ अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले़ शेतकर्‍यांना शासनाने आर्थिक मदत दिली़ पण त्यामुळे शेतकर्‍यांचे नुकसान भरुन येणारे नसते़ शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी ही मदत असते़ शेतकर्‍यांनीही आगामी काळात पीक विम्याबाबत गांभिर्याने विचार करण्याची गरज आहे. - अनिल कवडे, जिल्हाधिकारी