शहरं
Join us  
Trending Stories
1
संरक्षण दलांसोबत अधिक समन्वयाने काम करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे सुतोवाच
2
भारताच्या सीमेवर अवकाशातूनही करडी नजर; ISRO लॉन्च करणार RISAT-1B, काय आहे खास वैशिष्टे?
3
SSC Result 2025: दहावीचा निकाल उद्या जाहीर होणार! विद्यार्थ्यांना कधी आणि कुठे पाहता येणार? जाणून घ्या
4
एका झटक्यात सोन्याच्या दरात २००० रुपयांपेक्षा अधिक घसरण; खरेदीपूर्वी पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
5
Mehraj Malik : "रेशनचा मोठा तुटवडा; दुकानांमध्ये पीठ, तांदूळ, साखर उपलब्ध नाही, जनतेमध्ये भीतीचं वातावरण"
6
Virat Kohli Test Retirement: 'किंग कोहली'ची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती; १४ वर्षांचा 'विराट' प्रवास थांबवला!
7
"देशात परिस्थिती काय अन् ही थायलंडमध्ये...", नेटकऱ्यांच्या ट्रोलिंगमुळे भारती सिंहला रडू कोसळलं
8
व्यवसायातही कोहलीची 'विराट' कामगिरी; फक्त टॅक्सच ६६ कोटींचा भरला; नेटवर्थ किती असेल?
9
अरेच्चा! तालिबान सरकारने अफगाणिस्तानात बुद्धिबळ खेळावर घातली बंदी, कारण...
10
7 मे रोहित अन् 12 मे विराट; टेस्ट क्रिकेटमधून 'ROKO' युगाचा अंत, अशी होती दोघांची कारकीर्द
11
हैदराबादच्या प्रसिद्ध 'कराची बेकरी'ची तोडफोड; पाकिस्तानविरोधी घोषणा देत केली 'ही' मागणी
12
लग्नाच्या पहिल्याच रात्री पती टेरेसवर झोपला, नववधूचा शाळेपासूनचा प्रियकर आला, अन्...
13
Suicide Blast: पाकिस्तानात दहशतवाद्यांचा पोलिसांच्या गाडीजवळ आत्मघाती बॉम्बस्फोट, २ ठार
14
पाकिस्तानवरील कारवाईदरम्यान बंद केले होते ३२ विमानतळ, आता सरकारनं घेतला महत्त्वाचा निर्णय; जाणून घ्या
15
अभिनेता स्टेजवर अचानक बेशुद्ध होऊन कोसळला! तातडीने रुग्णालयात दाखल, नेमकं काय घडलं?
16
निष्काळजीपणाचा कळस! आई आजारी, लेकाच्या हातात रक्ताची बॉटल; नवऱ्याने ओढला स्ट्रेचर अन्...
17
सचिन तेंडुलकर 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' बघतात! समीर चौघुलेंनी सांगितला किस्सा, म्हणाले- "त्यांनी माझं स्कीट.."
18
पायऱ्या चढा किंवा उतरा आणि हार्ट ॲटॅकची भीती विसरा; गंभीर आजारही होतील छूमंतर
19
Numerology: ७, १६ आणि २५ जन्मतारीख असलेल्यांना जन्मतः मिळते चाणाक्ष बुद्धी आणि तीक्ष्ण नजर!
20
Video: 'आय लव्ह यू यार... प्लीज उठ जा...'; हुतात्मा सुरेंद्र कुमार यांच्या पत्नीचा मन हेलावून टाकणारा आक्रोश

इसिसला थोपविण्यासाठी डावपेचांवर चर्चा

By admin | Updated: January 17, 2016 01:38 IST

पश्चिम आशियात सक्रिय इस्लामिक स्टेटस् आॅफ इराक अ‍ॅण्ड सिरिया (इसिस) या दहशतवादी संघटनेच्या सोशल मीडियावरील प्रचारास भारतीय नागरिक बळी पडत असल्याच्या

नवी दिल्ली : पश्चिम आशियात सक्रिय इस्लामिक स्टेटस् आॅफ इराक अ‍ॅण्ड सिरिया (इसिस) या दहशतवादी संघटनेच्या सोशल मीडियावरील प्रचारास भारतीय नागरिक बळी पडत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी शनिवारी एक उच्चस्तरीय बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच केंद्र आणि राज्यातील सुरक्षा यंत्रणेला अतिसतर्क राहण्याचे निर्देशही गृहमंत्र्यांनी यावेळी दिले.या बैठकीला गृहमंत्रालय, केंद्रीय गुप्तचर संस्था आणि सुरक्षा संस्थांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह १३ राज्यांचे पोलीस प्रमुख उपस्थित होते.अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार इसिसद्वारे सोशल मीडियाच्या माध्यमाने भारतीय तरुणांना आकर्षित करण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांवर बैठकीत विचारविनिमय झाला. तसेच शेजारील देशात या संघटनेच्या वाढत्या प्रभावापासून भारतीय तरुणांचा बचाव करण्याकरिता सुरक्षा संस्थांनी नवे डावपेच आखले पाहिजे अशी गरज व्यक्त करण्यात आली. त्याअनुषंगाने अल्पसंख्यक समुदायातील लोकांच्या विकासासाठी चांगल्या योजना, त्यांना इसिसच्या प्रभावातून वाचविण्याकरिता ठोस उपाय आणि पोलीस विभागाला माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात अधिक कार्यक्षम बनविण्याबाबतच्या सूचना समोर आल्या. राजनाथसिंह यांनी बैठकीला मार्गदर्शन करताना सांगितले की, भारतीय परंपरा आणि कौटुंबिक संस्काराच्या आधारे या धोक्याचा सामना केला जाऊ शकतो. शेजारील देशांच्या तुलनेत भारतात इसिसचा अत्यल्प अथवा नाहीच्या बरोबरीत प्रभाव आहे. परंतु तरीही चौफेर सतर्क राहण्याची गरज आहे. भारतातील बहुतांश मुस्लीम संघटनांनी इसिस आणि तिच्या दहशतवादी विचारसरणीला विरोध केला आहे याबद्दल गृहमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले. बैठकीला महाराष्ट्रासह विविध राज्यांचे पोलीस प्रमुख उपस्थित होते. (वृत्तसंस्था)