शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
4
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
5
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
6
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
7
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
8
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
9
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
10
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
11
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
12
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
13
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
14
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
15
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
16
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
17
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
18
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
19
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
20
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान

डिजिटल इंडियाचे प्रयत्न निष्फळ; 70 टक्के खातेधारक रोखीवरच अवलंबून

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2018 14:58 IST

ग्राहकांना लगेचच पैसे काढता यावेत, बँकांमधील रांग कमी व्हावी यासाठी एटीएम सेवा सुरु करण्यात आली होती.

नवी दिल्ली : पुढील चार महिन्यांत देशभरातील निम्म्याहून अधिक एटीएम बंद होण्याच्या इशाऱ्यानंतर दोन वर्षांपूर्वी डिजिटल इंडियाच्या प्रयत्नांनाही खीळ बसल्याचे समोर आले आहे. नोटाबंदीनंतर डिजिटल ट्रान्झेक्शनमध्ये प्रचंड वाढ झाल्याचा दावा करण्यात आला असला तरीही सत्यपरिस्थिती या उलट आहे.

ग्राहकांना लगेचच पैसे काढता यावेत, बँकांमधील रांग कमी व्हावी यासाठी एटीएम सेवा सुरु करण्यात आली होती. मात्र, आरबीआयने घातलेल्या नियमांमुळे एटीएम सर्व्हिस प्रोव्हायडरना मोठा खर्च करावा लागणार आहे. एवढे मनुष्यबळ आणि कॅश व्हॅनचा ताफा परवडणारा नसल्याने सेवा पुरविणाऱ्या कंपन्या आपला गाशा गुडाळ्याची भीती व्यक्त केली जात आहे. याचा परिणाम रोजगार जाण्यावरही होणार आहे.

या पार्श्वभुमीवर नोटाबंदीला दोन वर्षे होत असताना आजही केवळ 30 टक्केच भारतीय एटीएमचा वापर करत असल्याचे समोर आले आहे. तर उर्वरित 70 टक्के बँक खातेधारक आजही रोखीवर अवलंबून आहेत. देशातील एकूण 2.38 लाख एटीएपैकी 10 टक्के एटीएम नादुरुस्त असतात. तर 80 टक्के एटीएम ही शहरामध्येच आहेत. यामुळे ग्रामीण भागात फार कमी एटीएम उपलब्ध आहेत. 

 

महाराष्ट्रात 40 किमी गेल्यावर एटीएम सापडतेप्रगत राज्य महाराष्ट्रातही ग्रमीण भागात एटीएमची कमतरता आहे. मोठ्या शहरांमधून बाहेर आल्यास लोकांना एटीएम गाठण्यासाठी 40 किमी लांब जावे लागते. ग्रामीण भागात बँक असेल तरच त्याच्या बाजुला एटीएम सापडते. मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, बिहार, पश्चिम बंगालमध्येही हीच स्थिती आहे. 

 

भारताचा जगात शेवटचा क्रमांकसीएटीएमआयचे संचालक बालासुब्रम्हण्यम यांच्या म्हणण्यानुसार जगाच्या तुलनेत भारतात सर्वात कमी एटीएम आहेत. येथे 1 लाख लोकांमागे 8.9 एटीएम तर ब्राझीलमध्ये 119.6, थायलंड 78, दक्षिण ऑफ्रिकेत 60 शेजारच्या मलेशियामध्ये 56.4 एटीएम आहेत. तर चीनमध्ये चक्क 10 लाख एटीएम सुरु आहेत. 2020 पर्यंत हाच आकडा 15 लाखांवर जाण्याचा अंदाज आहे. 

टॅग्स :atmएटीएमNote Banनोटाबंदी