शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

डिजिटल इंडियाचे प्रयत्न निष्फळ; 70 टक्के खातेधारक रोखीवरच अवलंबून

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2018 14:58 IST

ग्राहकांना लगेचच पैसे काढता यावेत, बँकांमधील रांग कमी व्हावी यासाठी एटीएम सेवा सुरु करण्यात आली होती.

नवी दिल्ली : पुढील चार महिन्यांत देशभरातील निम्म्याहून अधिक एटीएम बंद होण्याच्या इशाऱ्यानंतर दोन वर्षांपूर्वी डिजिटल इंडियाच्या प्रयत्नांनाही खीळ बसल्याचे समोर आले आहे. नोटाबंदीनंतर डिजिटल ट्रान्झेक्शनमध्ये प्रचंड वाढ झाल्याचा दावा करण्यात आला असला तरीही सत्यपरिस्थिती या उलट आहे.

ग्राहकांना लगेचच पैसे काढता यावेत, बँकांमधील रांग कमी व्हावी यासाठी एटीएम सेवा सुरु करण्यात आली होती. मात्र, आरबीआयने घातलेल्या नियमांमुळे एटीएम सर्व्हिस प्रोव्हायडरना मोठा खर्च करावा लागणार आहे. एवढे मनुष्यबळ आणि कॅश व्हॅनचा ताफा परवडणारा नसल्याने सेवा पुरविणाऱ्या कंपन्या आपला गाशा गुडाळ्याची भीती व्यक्त केली जात आहे. याचा परिणाम रोजगार जाण्यावरही होणार आहे.

या पार्श्वभुमीवर नोटाबंदीला दोन वर्षे होत असताना आजही केवळ 30 टक्केच भारतीय एटीएमचा वापर करत असल्याचे समोर आले आहे. तर उर्वरित 70 टक्के बँक खातेधारक आजही रोखीवर अवलंबून आहेत. देशातील एकूण 2.38 लाख एटीएपैकी 10 टक्के एटीएम नादुरुस्त असतात. तर 80 टक्के एटीएम ही शहरामध्येच आहेत. यामुळे ग्रामीण भागात फार कमी एटीएम उपलब्ध आहेत. 

 

महाराष्ट्रात 40 किमी गेल्यावर एटीएम सापडतेप्रगत राज्य महाराष्ट्रातही ग्रमीण भागात एटीएमची कमतरता आहे. मोठ्या शहरांमधून बाहेर आल्यास लोकांना एटीएम गाठण्यासाठी 40 किमी लांब जावे लागते. ग्रामीण भागात बँक असेल तरच त्याच्या बाजुला एटीएम सापडते. मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, बिहार, पश्चिम बंगालमध्येही हीच स्थिती आहे. 

 

भारताचा जगात शेवटचा क्रमांकसीएटीएमआयचे संचालक बालासुब्रम्हण्यम यांच्या म्हणण्यानुसार जगाच्या तुलनेत भारतात सर्वात कमी एटीएम आहेत. येथे 1 लाख लोकांमागे 8.9 एटीएम तर ब्राझीलमध्ये 119.6, थायलंड 78, दक्षिण ऑफ्रिकेत 60 शेजारच्या मलेशियामध्ये 56.4 एटीएम आहेत. तर चीनमध्ये चक्क 10 लाख एटीएम सुरु आहेत. 2020 पर्यंत हाच आकडा 15 लाखांवर जाण्याचा अंदाज आहे. 

टॅग्स :atmएटीएमNote Banनोटाबंदी