शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

डिजिटल इंडिया कार्यक्रम अजूनही बाल्यावस्थेत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2015 02:09 IST

केंद्रातील सत्ताधारी मोदी सरकारच्या डिजिटल इंडिया कार्यक्रमाअंतर्गत ४,५०,००० लोकांना नोकऱ्या देण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले असले तरी या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत आतापर्यंत

नवी दिल्ली : केंद्रातील सत्ताधारी मोदी सरकारच्या डिजिटल इंडिया कार्यक्रमाअंतर्गत ४,५०,००० लोकांना नोकऱ्या देण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले असले तरी या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत आतापर्यंत किती नोकऱ्या देण्यात आल्या हे मात्र सरकार सांगू शकलेले नाही. यावरून हा कार्यक्रम अजूनही प्राथमिक अवस्थेतच असल्याचे स्पष्ट होते.रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकार पाच वर्षांच्या कालावधीत लहान शहरे आणि गावांमधील एक कोटी विद्यार्थ्यांना माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात प्रशिक्षण देणार आहे. याशिवाय संबंधित राज्यांमध्ये बीपीओ स्थापन केले जातील. सोबतच माहिती तंत्रज्ञान सेवांशी संबंधित व्यवसाय सुरू करण्याच्या दृष्टीने तीन लाख सर्व्हिस प्रोव्हायडर एजंटस् प्रशिक्षित केले जातील. तसेच दूरसंचार सेवा प्रदात्यांची गरज पूर्ण करण्याकरिता पाच लाख ग्रामीण युवकांना प्रशिक्षण दिले जाईल. राज्यसभेत खासदार विजय दर्डा यांनी विचारलेल्या एका बहुआयामी प्रश्नाच्या उत्तरात केंद्रीय दूरसंचार व माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी उपरोक्त माहिती दिली. ते म्हणाले की, डिजिटल इंडियाअंतर्गत नोकऱ्यांच्या निर्मितीकरिता ४९३ कोटी रुपये खर्चून लहान शहरे आणि ग्रामीण भागात ४८,३०० आसनी बीपीओ अथवा आयटीईएस संचालनालयाला प्रोत्साहन देण्यासाठी भारत बीपीओ संवर्धन योजना (आयबीपीएस) राबविण्यात येत आहे. यामुळे १ लाख ४५००० रोजगारांची निर्मिती होईल. इलेक्ट्रॉनिक क्षेत्रात उत्पादनाचा जेथवर प्रश्न आहे तर सरकारला संशोधित विशेष पॅकेज (एम-सिप्स) अंतर्गत १,१२,९३७ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे १५५ प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. यापैकी १०,६६९ कोटी रुपये गुंतवणुकीच्या ३९ प्रस्तावांना हिरवी झेंडी दाखविण्यात आली आहे.