शहरं
Join us  
Trending Stories
1
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
2
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
3
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
4
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
5
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
6
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
7
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
8
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
9
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
10
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
11
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
12
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
13
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
14
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
15
ज्या घटनेमुळे बापाने केली हत्या, त्यात आईचा होता सहभाग; कोल्हापुरातील प्रकरणात काय आले समोर?
16
BRICS शिखर परिषदेसाठी PM मोदी ब्राझीलमध्ये दाखल; भारताला काय फायदा? जाणून घ्या...
17
भारतीय चलनी नोटांवर फक्त महात्मा गांधीजींचेच चित्र का? आरबीआयने स्वतःच सांगितले कारण
18
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
19
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
20
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?

डिजिटल इंडिया कार्यक्रम अजूनही बाल्यावस्थेत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2015 02:09 IST

केंद्रातील सत्ताधारी मोदी सरकारच्या डिजिटल इंडिया कार्यक्रमाअंतर्गत ४,५०,००० लोकांना नोकऱ्या देण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले असले तरी या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत आतापर्यंत

नवी दिल्ली : केंद्रातील सत्ताधारी मोदी सरकारच्या डिजिटल इंडिया कार्यक्रमाअंतर्गत ४,५०,००० लोकांना नोकऱ्या देण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले असले तरी या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत आतापर्यंत किती नोकऱ्या देण्यात आल्या हे मात्र सरकार सांगू शकलेले नाही. यावरून हा कार्यक्रम अजूनही प्राथमिक अवस्थेतच असल्याचे स्पष्ट होते.रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकार पाच वर्षांच्या कालावधीत लहान शहरे आणि गावांमधील एक कोटी विद्यार्थ्यांना माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात प्रशिक्षण देणार आहे. याशिवाय संबंधित राज्यांमध्ये बीपीओ स्थापन केले जातील. सोबतच माहिती तंत्रज्ञान सेवांशी संबंधित व्यवसाय सुरू करण्याच्या दृष्टीने तीन लाख सर्व्हिस प्रोव्हायडर एजंटस् प्रशिक्षित केले जातील. तसेच दूरसंचार सेवा प्रदात्यांची गरज पूर्ण करण्याकरिता पाच लाख ग्रामीण युवकांना प्रशिक्षण दिले जाईल. राज्यसभेत खासदार विजय दर्डा यांनी विचारलेल्या एका बहुआयामी प्रश्नाच्या उत्तरात केंद्रीय दूरसंचार व माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी उपरोक्त माहिती दिली. ते म्हणाले की, डिजिटल इंडियाअंतर्गत नोकऱ्यांच्या निर्मितीकरिता ४९३ कोटी रुपये खर्चून लहान शहरे आणि ग्रामीण भागात ४८,३०० आसनी बीपीओ अथवा आयटीईएस संचालनालयाला प्रोत्साहन देण्यासाठी भारत बीपीओ संवर्धन योजना (आयबीपीएस) राबविण्यात येत आहे. यामुळे १ लाख ४५००० रोजगारांची निर्मिती होईल. इलेक्ट्रॉनिक क्षेत्रात उत्पादनाचा जेथवर प्रश्न आहे तर सरकारला संशोधित विशेष पॅकेज (एम-सिप्स) अंतर्गत १,१२,९३७ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे १५५ प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. यापैकी १०,६६९ कोटी रुपये गुंतवणुकीच्या ३९ प्रस्तावांना हिरवी झेंडी दाखविण्यात आली आहे.