शहरं
Join us  
Trending Stories
1
GT 'टायटन्स' जहाज बुडता बुडता वाचलं! हार्दिकच्या चुकीमुळं MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
4
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
5
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
6
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
7
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
8
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
9
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
10
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
11
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
12
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
13
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
14
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
15
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
16
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
17
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
18
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
19
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
20
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."

अंधारामुळे किती अतिरेकी होते ते समजले नाही - सलविंदर सिंग

By admin | Updated: January 5, 2016 16:41 IST

पठाणकोट येथील भारतीय हवाई दलाच्या तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे सुरक्षाव्यवस्थेतील अनेक गंभीर त्रुटी समोर आल्या आहेत.

ऑनलाइन लोकमत 

चंदीगड, दि. ५ - पठाणकोट येथील भारतीय हवाई दलाच्या तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे सुरक्षाव्यवस्थेतील अनेक गंभीर त्रुटी समोर आल्या आहेत. भारताच्या हद्दीत घुसल्यानंतर या अतिरेक्यांनी सर्वप्रथम गुरुदासपूरचे पोलिस अधीक्षक सलविंदर सिंग यांचे अपहरण केले  नंतर काहीवेळाने त्यांना सोडून दिले. हा हल्ला जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या अतिरेक्यांनी केल्याची शक्यता गुप्तचर यंत्रणांनी व्यक्त केली आहे.
या घटनेसंदर्भात खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना सलविंदर सिंग म्हणाले की, ३१ डिसेंबरच्या रात्री मी पाकिस्तानच्या सीमेजवळ असणा-या गुरुव्दारा येथे  दर्शनासाठी चाललो असताना अतिरेक्यांनी आमच्या गाडीचा मार्ग रोखला. 
गाडीतून उतरल्यानंतर त्यांनी माझे हात-पाय बांधले, डोळयावर पट्टी बांधली होती. रात्रीचीवेळ असल्याने नेमके किती अतिरेकी होते ते ओळखता आले नाही असे त्यांनी सांगितले. 
अपहरण झाले त्यावेळी निळा दिवा असलेली सरकारी गाडी माझ्याकडे होती. पण मी गणवेश परिधान केला नव्हता. त्यामुळे त्यांना मी पोलिस अधिकारी असल्याचे ओळखता आले नाही. निघताना ज्यावेळी त्यांना मी पोलिसात असल्याचा अंदाज आला तेव्हा त्यांनी कोणाला माहिती दिली तर गंभीर किंमत चुकवायला तयार रहा असा मला इशारा दिला होता असे सलविंदर सिंग यांनी सांगितले. 
अतिरेक्यांकडे एके-४७ रायफल्स होत्या, ते उर्दू, हिंदी आणि पंजाबी भाषेमध्ये बोलते होते अशी माहिती सलविंदर यांनी दिली. सलविंदर यांचे अपहरण केले त्यावेळी आणखी दोन जण त्यांच्यासोबत होते. जे मी सांगतोय ते खोटे असेल तर, मला फासावर लटकवा असे सलविंदर सिंग यांनी सांगितले. 
एनआयएच्या अधिका-यांनी काल सलविंदर यांची सहातास कसून चौकशी केली. आजही सलविंदर आणि त्यांच्यासोबत गाडीत असलेल्या दोघांची चौकशी होणार आहे. हल्ला झालेल्या पठाणकोटच्या हवाई तळापासून सलविंदर यांची गाडी ५०० मीटर अंतरावर सापडली होती.