शहरं
Join us  
Trending Stories
1
Local Body Elections: नगरांच्या निवडणुकांमध्ये 'दुसरा' टप्पा, काही ठिकाणी २० डिसेंबरला मतदान
2
हाताला सलाइन, नाकाला ऑक्सिजन पाइप; छगन भुजबळांचा रुग्णालयातून प्रचार, भावनिक होत म्हणाले...
3
IND vs SA 1st ODI : टॉस गमावला, पण मॅच जिंकली! कसोटीतील बिघाडीनंतर टीम इंडियाची वनडे मालिकेत आघाडी
4
“कितीही करा कल्ला, मालवण शिवसेनेचाच बालेकिल्ला”: एकनाथ शिंदे; निलेश राणेंचेही केले कौतुक
5
“मुंबईत ठाकरेंचे काही चालणार नाही, उद्धव यांनी राज यांना सोबत घेऊन चूक केली”; कुणाचा दावा?
6
“नवरा १००₹ देत नव्हता, पण देवाभाऊ लाडक्या बहिणींना १५०० देतात”; भाजपा नेत्यांचे विधान चर्चेत
7
SIR तपासात गडबड उघड! गोव्यात ९० हजार मतदारांवरील मोठी विसंगती आली समोर; अधिकारी म्हणाले...
8
०१ डिसेंबरला रेल्वे नियम बदलणार! तत्काळ तिकिटासाठी लागणार OTP; मुंबईतील ‘या’ ट्रेनपासून सुरू
9
“जिकडे बॉम्बे असेल तिकडे मुंबई करू, शाळेची नावेही बदलू”; उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला निर्धार
10
IND vs SA 1st ODI : कुलदीपनं ३ चेंडूत फिरवली मॅच! एकाच ओव्हरमध्ये २ विकेट्स अन्...
11
VIDEO : "समझने वालों को इशारा काफी!" विराटला गंभीरची मिठी; पण रोहितची रिअ‍ॅक्शनच ठरली 'शोस्टॉपर'
12
दिल्लीतील पराभवानंतर अवध ओझा सरांचा राजकारणाला रामराम; AAP मधून बाहेर पडले...
13
VIDEO : "उपकार विसरू नका! नाहीतर…" बेताल वक्तव्य करणाऱ्या SA कोचला गावसकरांनी दिली ताकीद
14
IND vs SA : अनुभवी फलंदाजांनी पेश केला खास नजराणा; किंग कोहली अन् रोहितसह KL राहुलनं दाखवला क्लास!
15
छेड काढल्याचा आरोप, वैद्यकीय अधिकाऱ्याला नातेवाईकांची मारहाण
16
२४ तासांत ७ स्फोटांनी हादरले बलुचिस्तान! रेल्वे ट्रॅक बॉम्बने उडवला; पोलिस ठाण्यावर ग्रेनेड हल्ला
17
गीता जयंती २०२५: सगळी भगवद्गीता नको, सुखी जीवनासाठी ५ उपदेश कायम लक्षात ठेवा; वाचा, गीतासार
18
आईच्या कुशीत झोपलेल्या चिमुकल्याला बिबट्या घेऊन गेला, गावात भीतीचे वातावरण...
19
जगाला धक्का! नामिबियात 'एडोल्फ हिटलर' सलग पाचव्यांदा विजयी; वाद वाढताच नेत्याने घेतला मोठा निर्णय...
20
'रनमशिन' कोहलीचा मोठा पराक्रम! क्रिकेटच्या देवाला मागे टाकत बनला वनडेतील शतकांचा 'बादशहा'
Daily Top 2Weekly Top 5

अंधारामुळे किती अतिरेकी होते ते समजले नाही - सलविंदर सिंग

By admin | Updated: January 5, 2016 16:41 IST

पठाणकोट येथील भारतीय हवाई दलाच्या तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे सुरक्षाव्यवस्थेतील अनेक गंभीर त्रुटी समोर आल्या आहेत.

ऑनलाइन लोकमत 

चंदीगड, दि. ५ - पठाणकोट येथील भारतीय हवाई दलाच्या तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे सुरक्षाव्यवस्थेतील अनेक गंभीर त्रुटी समोर आल्या आहेत. भारताच्या हद्दीत घुसल्यानंतर या अतिरेक्यांनी सर्वप्रथम गुरुदासपूरचे पोलिस अधीक्षक सलविंदर सिंग यांचे अपहरण केले  नंतर काहीवेळाने त्यांना सोडून दिले. हा हल्ला जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या अतिरेक्यांनी केल्याची शक्यता गुप्तचर यंत्रणांनी व्यक्त केली आहे.
या घटनेसंदर्भात खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना सलविंदर सिंग म्हणाले की, ३१ डिसेंबरच्या रात्री मी पाकिस्तानच्या सीमेजवळ असणा-या गुरुव्दारा येथे  दर्शनासाठी चाललो असताना अतिरेक्यांनी आमच्या गाडीचा मार्ग रोखला. 
गाडीतून उतरल्यानंतर त्यांनी माझे हात-पाय बांधले, डोळयावर पट्टी बांधली होती. रात्रीचीवेळ असल्याने नेमके किती अतिरेकी होते ते ओळखता आले नाही असे त्यांनी सांगितले. 
अपहरण झाले त्यावेळी निळा दिवा असलेली सरकारी गाडी माझ्याकडे होती. पण मी गणवेश परिधान केला नव्हता. त्यामुळे त्यांना मी पोलिस अधिकारी असल्याचे ओळखता आले नाही. निघताना ज्यावेळी त्यांना मी पोलिसात असल्याचा अंदाज आला तेव्हा त्यांनी कोणाला माहिती दिली तर गंभीर किंमत चुकवायला तयार रहा असा मला इशारा दिला होता असे सलविंदर सिंग यांनी सांगितले. 
अतिरेक्यांकडे एके-४७ रायफल्स होत्या, ते उर्दू, हिंदी आणि पंजाबी भाषेमध्ये बोलते होते अशी माहिती सलविंदर यांनी दिली. सलविंदर यांचे अपहरण केले त्यावेळी आणखी दोन जण त्यांच्यासोबत होते. जे मी सांगतोय ते खोटे असेल तर, मला फासावर लटकवा असे सलविंदर सिंग यांनी सांगितले. 
एनआयएच्या अधिका-यांनी काल सलविंदर यांची सहातास कसून चौकशी केली. आजही सलविंदर आणि त्यांच्यासोबत गाडीत असलेल्या दोघांची चौकशी होणार आहे. हल्ला झालेल्या पठाणकोटच्या हवाई तळापासून सलविंदर यांची गाडी ५०० मीटर अंतरावर सापडली होती.