शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
2
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
3
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
4
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
5
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
6
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
7
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
8
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
9
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
10
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
11
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
12
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
13
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
14
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
15
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
16
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
17
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

अंधारामुळे किती अतिरेकी होते ते समजले नाही - सलविंदर सिंग

By admin | Updated: January 5, 2016 16:41 IST

पठाणकोट येथील भारतीय हवाई दलाच्या तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे सुरक्षाव्यवस्थेतील अनेक गंभीर त्रुटी समोर आल्या आहेत.

ऑनलाइन लोकमत 

चंदीगड, दि. ५ - पठाणकोट येथील भारतीय हवाई दलाच्या तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे सुरक्षाव्यवस्थेतील अनेक गंभीर त्रुटी समोर आल्या आहेत. भारताच्या हद्दीत घुसल्यानंतर या अतिरेक्यांनी सर्वप्रथम गुरुदासपूरचे पोलिस अधीक्षक सलविंदर सिंग यांचे अपहरण केले  नंतर काहीवेळाने त्यांना सोडून दिले. हा हल्ला जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या अतिरेक्यांनी केल्याची शक्यता गुप्तचर यंत्रणांनी व्यक्त केली आहे.
या घटनेसंदर्भात खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना सलविंदर सिंग म्हणाले की, ३१ डिसेंबरच्या रात्री मी पाकिस्तानच्या सीमेजवळ असणा-या गुरुव्दारा येथे  दर्शनासाठी चाललो असताना अतिरेक्यांनी आमच्या गाडीचा मार्ग रोखला. 
गाडीतून उतरल्यानंतर त्यांनी माझे हात-पाय बांधले, डोळयावर पट्टी बांधली होती. रात्रीचीवेळ असल्याने नेमके किती अतिरेकी होते ते ओळखता आले नाही असे त्यांनी सांगितले. 
अपहरण झाले त्यावेळी निळा दिवा असलेली सरकारी गाडी माझ्याकडे होती. पण मी गणवेश परिधान केला नव्हता. त्यामुळे त्यांना मी पोलिस अधिकारी असल्याचे ओळखता आले नाही. निघताना ज्यावेळी त्यांना मी पोलिसात असल्याचा अंदाज आला तेव्हा त्यांनी कोणाला माहिती दिली तर गंभीर किंमत चुकवायला तयार रहा असा मला इशारा दिला होता असे सलविंदर सिंग यांनी सांगितले. 
अतिरेक्यांकडे एके-४७ रायफल्स होत्या, ते उर्दू, हिंदी आणि पंजाबी भाषेमध्ये बोलते होते अशी माहिती सलविंदर यांनी दिली. सलविंदर यांचे अपहरण केले त्यावेळी आणखी दोन जण त्यांच्यासोबत होते. जे मी सांगतोय ते खोटे असेल तर, मला फासावर लटकवा असे सलविंदर सिंग यांनी सांगितले. 
एनआयएच्या अधिका-यांनी काल सलविंदर यांची सहातास कसून चौकशी केली. आजही सलविंदर आणि त्यांच्यासोबत गाडीत असलेल्या दोघांची चौकशी होणार आहे. हल्ला झालेल्या पठाणकोटच्या हवाई तळापासून सलविंदर यांची गाडी ५०० मीटर अंतरावर सापडली होती.