शहरं
Join us  
Trending Stories
1
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
2
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
3
४० हजार एन्ट्री फी, अख्खी रात्र 'Nude Party'; विना कपडे येणार होते २१ मुले-मुली, आयोजकांना अटक
4
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
5
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
6
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
7
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
8
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
9
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
10
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
11
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
12
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
13
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
14
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
15
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
16
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
17
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
18
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
19
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”

आपत्कालीन स्थितीत आता डायल करा 112 नंबर

By admin | Updated: May 8, 2016 18:55 IST

केंद्रीय दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांनी भारतात 112 नंबरला आपत्कालीन नंबर होण्यासाठी मान्यता दिली आहे.

 ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 8- केंद्रीय दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांनी भारतात 112 नंबरला आपत्कालीन नंबर होण्यासाठी मान्यता दिली आहे. 1 जानेवारी 2018पासून ही 112 नंबरची सेवा सुरू होणार असून, या सेवेअंतर्गत लोकांना पोलिसांकडून तात्काळ मदत मिळणार आहे. 
अमेरिकेच्या 911च्या आपत्कालीन नंबरच्या धर्तीवर 112 हा नंबर निवडण्याचा केंद्रीय दूरसंपर्क मंत्र्यांनी निर्णय घेतला आहे. सिम कार्ड बंद झालेले अथवा आऊटगोइंग कॉलची सेवा खंडित झालेले ग्राहकही आपत्कालीन स्थितीत या नंबरवर फोन करू शकतात, अशी माहिती रविशंकर प्रसाद यांनी दिली आहे. प्रत्येक विभागासाठी वेगवेगळे विशेष नंबर देण्यात आले आहेत. पोलिसांसाठी 100 नंबर, फायर ब्रिगेडसाठी 101 नंबर, अँब्युलन्ससाठी 102 नंबर, आपत्कालीन स्थितीत 108 नंबर देण्यात आले आहेत. मात्र आता 112 नंबरवर यापैकी कोणत्याही प्रकारची तक्रार करता येणार आहे. कायद्यानुसार प्रत्येक मोबाईलमध्ये पॅनिक बटन नावानं ही यंत्रणा जोडण्यात येणार आहे. 
पॅनिक बटनद्वारे ग्राहकाला 112 नंबरवर आपत्कालीन कॉल करता येणार आहे. हा एक नंबर डायल केल्यास इतरही महत्त्वाच्या नंबरवर याची माहिती पोहोचणार आहे, अशी सुविधा देण्यात आली आहे. या पॅनिक बटनमध्ये जीपीएस यंत्रणाही बसवण्याची मोबाईल कंपन्यांना सक्ती करण्यात आली आहे.