शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
2
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात
3
सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस कंपनीचा मोठा निर्णय; भारताने करार रद्द केल्यावर हायकोर्टात धाव
4
IND vs ENG: इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या 'अ' संघाची घोषणा, 'या' खेळाडूकडे कर्णधारपद!
5
पाकिस्तानला साथ देणाऱ्या तुर्कीचे जिवंत ड्रोन लागला भारताच्या हाती; नेमका कुठे सापडला ड्रोन?
6
राज्यात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या!
7
"लॉडर्स नव्हे, क्रिकेटची खरी पंढरी तर वानखेडे स्टेडियम आहे", CM देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण
8
'...तर मविआ सरकारमध्ये हसन मुश्रीफ गृहमंत्री झाले असते'; संजय राऊत यांचा पुस्तकात स्फोटक दावा
9
Wankhede Stadium: "या नावांमध्ये माझं नाव का घातलं मला माहिती नाही", शरद पवार स्टॅण्ड नामकरणावेळी काय बोलले?
10
Dharashiv Accident: धाराशिवमध्ये दोन कारची समोरासमोर धडक, १० जण जखमी
11
भारताने आखली रणनीती; सिंधू पाणी करारानंतर आता पाकिस्तानला आणखी एक झटका बसणार...
12
पीककर्ज नाकारणाऱ्या बँकांविरुध्द कायदेशीर कारवाई होणार, चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश
13
'भारतीय सैन्य पंतप्रधान मोदींच्या चरणी नतमस्तक'; वाद उफळताच मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांची सावरासारव
14
ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला लीक झाली? काँग्रेसच्या प्रश्नावर सरकारने दिले स्पष्टीकरण...
15
अल्पसंख्यांक विद्यार्थिनीला प्रवेश नाकारला, शाळा सचिवाविरोधात गुन्हा दाखल
16
Pune: वाघोलीतील १० एकर जमीन हडपण्याचा प्रयत्न; पीआयसह चौघांवर गुन्हा दाखल
17
Ulhasnagar Crime: ठार मारण्याची धमकी, शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर अनसैर्गिक अत्याचार; उल्हासनगरातील घटना 
18
कामाची गोष्ट! किती वेळानंतर बंद करावा एसी?; ९०% लोकांना माहित नाही बरोबर उत्तर
19
बापरे! फोनमुळे बिघडतोय तुमच्या मणक्याचा आकार; टेक्स्ट नेक म्हणजे काय? 'ही' आहेत लक्षणं
20
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार

देश-परदेश लालू आंबे

By admin | Updated: June 6, 2015 00:11 IST

लिची, आंब्यावर माझा आणि राबडीचाच हक्क

लिची, आंब्यावर माझा आणि राबडीचाच हक्क
लालूप्रसाद यादव: झाडे मी लावली होती
पाटणा: बिहारच्या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी असणार्‍या झाडांचे फळे कोणी घ्यायची यावरुन जितनराम मांझी आणि नितीशकुमार यांच्यामध्ये चाललेल्या वादात आणखी दोन माजी मुख्यमंत्र्यांचा समावेश झाला आहे. या बंगल्याच्या बागेतील फळे खाण्याचा पहिला अधिकार माझा व माझी पत्नी राबडीदेवी यांचाच आहे, कारण ती झाडे मी लावली आहेत असे सांगत लालू प्रसाद यादव यांनी या वादामध्ये प्रवेश केला आहे.
लिची और आम के पेड पर मेरा और राबडीका हक है, हमने ही वहाँ पेड लगाये थे, असे सांगत लालू प्रसाद यांनी त्या फळांवर हक्क सांगितला आहे. मुख्यमंत्रीपद गेले तरी मांझी यांनी १, अणे मार्ग हा बंगला सोडलेला नाही. त्यामुळे, या बंगल्याच्या बागेतील झाडांची फळे त्यांना मिळू नयेत यासाठी नितिशकुमार यांनी झाडांची राखण करण्यासाठी पोलीस शिपायांची नेमणूक केली आहे. त्यावरुनच हा वाद सुरु झाला आहे.
लोकसभा निवडणुकीमध्ये दारुण पराभव झाल्यानंतर बिहारच्या राजकारणात प्रभावी असणारे महादलित कार्ड खेळत नितीशकुमार यांनी मांझी यांना मुख्यमंत्रीपदावर बसवले. पण आधी केवळ प्यादे वाटणारे मांझी नितीशकुमार यांच्यावरच चाल करून गेल्यावर त्यांना हटविण्यात आले. नितीशकुमार पुन्हा मुख्यमंत्री झाले असले तरी जितनराम मांझी व नितिश यांच्यातील वाद संपण्याची चिन्हे दिसत नाहीत.

चौकट:
फळझाडांची मुळे कुठवर?
वरवर बालिश वाटणार्‍या या वादाचा संबंध बिहारच्या आगामी निवडणुकांमुळे तापत चाललेल्या राजकारणाशी आहे. लिची, आंब्याच्या या वादात भाजपानेही प्रवेश केला आहे. भाजपा आणि जितनराम मांझी यांनी नितिशकुमार यांनी आपल्या कृत्यातून महादलितांचा अपमान केल्याचा आरोप केला आहे. नितीश यांनी मी आवाम(जनता) ची काळजी करतो तर मांझी आम (आंबे)ची काळजी करत बसले आहेत असा टोमणा मारला आहे. लालूप्रसाद यादव आणि नितीशकुमार यांनी भाजपाविरोधात लढण्यासाठी शड्डू ठोकले असले तरी त्यांचे खरे मनोमिलन अद्याप झालेले नाही. आता लोहियांचे हे शिष्य फळांसाठी असेच भांडत बसतात का समाजवादी तत्वाला जागून फळे वाटून खातात ते पाहता येईल.