शहरं
Join us  
Trending Stories
1
'तिला न्याय देण्याऐवजी भाजपच्या व्यवस्थेने आरोपींना वाचवले'; राहुल गांधींचे पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र
2
दोन महिलांपुढे पायलटनेही हात टेकले; विमानात जोरजोरात भांडत बसल्या अन् पुढे असे घडले...
3
टेस्लाची पहिली कार मॉडल Y लाँच, किंमत २३ लाख नाही, तुमचा आमचा श्वास रोखणारी... EMI किती?
4
'श्रीमंत' बनेल तुमचं मूल, या ६ मार्गांनी 'सुरक्षा कवच' तयार करा; महागाई देखील मार्ग अडवू शकणार नाही
5
सोने सांभाळण्याची भीती वाटते? ऑनलाईन पर्यायातून मिळेल जास्त नफा, कशी करायची गुंतवणूक?
6
अल्पसंख्याक अन् एससी-एसटींविरुद्ध भेदभाव केल्यास होणार तुरुंगवास; काँग्रेसच्या 'रोहित वेमुला' विधेयकात काय?
7
वाहन उद्योग क्षेत्रासाठी आजचा दिवस महत्त्वाचा; एकाचवेळी दोन दिग्गज कंपन्या भारतात एन्ट्री करणार
8
निमिषा प्रियाचा जीव वाचवण्यासाठी आणखी एक आशेचा किरण! येमेनच्या बंद खोलीत चर्चा सुरू
9
...नाहीतर भारत-पाकिस्तानमध्ये अण्वस्त्र युद्ध झालं असतं; डोनाल्ड ट्रम्प यांचा स्फोटक दावा
10
Video: प्रतीक्षा संपली, इलॉन मस्क यांची भारतात एन्ट्री! असं आहे Tesla चं मुंबईतील पहिलं शोरुम
11
"कमी बोला, जास्त काम करा"; पक्षातील नेत्यांना एकनाथ शिंदेंच्या कानपिचक्या, म्हणाले...
12
Stock Market Today: २० अंकांनी घसरुन उघडला सेन्सेक्स; फार्मा आणि मेटल क्षेत्रात खरेदी, थोड्याच वेळात का आली तेजी?
13
जगातील सर्वात वृद्ध धावपटू फौजा सिंग यांचे वयाच्या ११४ व्या वर्षी निधन; महामार्गावर झाला होता अपघात
14
क्रूरतेचा कळस! सैनिकाचे पोट फाडून त्यात ठेवला बॉम्ब; नक्षलवादी योगेंद्र कसा पकडला गेला?
15
हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप, विवाहितेचे कापले केस; दीड वर्षाच्या चिमुकलीसह महिलेनं संपवलं आयुष्य
16
हे तर भयंकरच! मुंबई लोकल की, मृत्यूचे कारण?; 8 वर्षात 8 हजार 273 प्रवाशांचा मृत्यू
17
इराणची भीती संपेना! इस्राइलवर आता विश्वासच नाही; पुन्हा करतायत युद्धाची तयारी
18
पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला पाकिस्तानी नेत्यांनी घडवून आणला होता, अहवालात मोठा दावा
19
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
20
ओला इलेक्ट्रीक स्कूटरवर महाराष्ट्रात गंडांतर; ३८५ शोरूम पडले बंद

देश-परदेश लालू आंबे

By admin | Updated: June 6, 2015 00:11 IST

लिची, आंब्यावर माझा आणि राबडीचाच हक्क

लिची, आंब्यावर माझा आणि राबडीचाच हक्क
लालूप्रसाद यादव: झाडे मी लावली होती
पाटणा: बिहारच्या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी असणार्‍या झाडांचे फळे कोणी घ्यायची यावरुन जितनराम मांझी आणि नितीशकुमार यांच्यामध्ये चाललेल्या वादात आणखी दोन माजी मुख्यमंत्र्यांचा समावेश झाला आहे. या बंगल्याच्या बागेतील फळे खाण्याचा पहिला अधिकार माझा व माझी पत्नी राबडीदेवी यांचाच आहे, कारण ती झाडे मी लावली आहेत असे सांगत लालू प्रसाद यादव यांनी या वादामध्ये प्रवेश केला आहे.
लिची और आम के पेड पर मेरा और राबडीका हक है, हमने ही वहाँ पेड लगाये थे, असे सांगत लालू प्रसाद यांनी त्या फळांवर हक्क सांगितला आहे. मुख्यमंत्रीपद गेले तरी मांझी यांनी १, अणे मार्ग हा बंगला सोडलेला नाही. त्यामुळे, या बंगल्याच्या बागेतील झाडांची फळे त्यांना मिळू नयेत यासाठी नितिशकुमार यांनी झाडांची राखण करण्यासाठी पोलीस शिपायांची नेमणूक केली आहे. त्यावरुनच हा वाद सुरु झाला आहे.
लोकसभा निवडणुकीमध्ये दारुण पराभव झाल्यानंतर बिहारच्या राजकारणात प्रभावी असणारे महादलित कार्ड खेळत नितीशकुमार यांनी मांझी यांना मुख्यमंत्रीपदावर बसवले. पण आधी केवळ प्यादे वाटणारे मांझी नितीशकुमार यांच्यावरच चाल करून गेल्यावर त्यांना हटविण्यात आले. नितीशकुमार पुन्हा मुख्यमंत्री झाले असले तरी जितनराम मांझी व नितिश यांच्यातील वाद संपण्याची चिन्हे दिसत नाहीत.

चौकट:
फळझाडांची मुळे कुठवर?
वरवर बालिश वाटणार्‍या या वादाचा संबंध बिहारच्या आगामी निवडणुकांमुळे तापत चाललेल्या राजकारणाशी आहे. लिची, आंब्याच्या या वादात भाजपानेही प्रवेश केला आहे. भाजपा आणि जितनराम मांझी यांनी नितिशकुमार यांनी आपल्या कृत्यातून महादलितांचा अपमान केल्याचा आरोप केला आहे. नितीश यांनी मी आवाम(जनता) ची काळजी करतो तर मांझी आम (आंबे)ची काळजी करत बसले आहेत असा टोमणा मारला आहे. लालूप्रसाद यादव आणि नितीशकुमार यांनी भाजपाविरोधात लढण्यासाठी शड्डू ठोकले असले तरी त्यांचे खरे मनोमिलन अद्याप झालेले नाही. आता लोहियांचे हे शिष्य फळांसाठी असेच भांडत बसतात का समाजवादी तत्वाला जागून फळे वाटून खातात ते पाहता येईल.