राहू-वाघोली रस्त्याच्या रुंदीकरणाची मागणी
By admin | Updated: June 12, 2015 17:38 IST
राहू : राहू-वाघोली या रस्त्याचे रुंदीकरणाची मागणी परिसरातील ग्रामस्थांमधून पुढे आली आहे. या रस्त्याला पडलेल्या खड्ड्यांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याने खड्डे पावसाळ्यापूर्वीच बुजविणे अपेक्षित होते. या रस्त्याकडे संबंधित खात्याचे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. या खड्ड्यंामुळे वाहनचालकांना कसरत करावी लागते. या कसरतीत अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. ...
राहू-वाघोली रस्त्याच्या रुंदीकरणाची मागणी
राहू : राहू-वाघोली या रस्त्याचे रुंदीकरणाची मागणी परिसरातील ग्रामस्थांमधून पुढे आली आहे. या रस्त्याला पडलेल्या खड्ड्यांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याने खड्डे पावसाळ्यापूर्वीच बुजविणे अपेक्षित होते. या रस्त्याकडे संबंधित खात्याचे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. या खड्ड्यंामुळे वाहनचालकांना कसरत करावी लागते. या कसरतीत अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. अपघातामध्ये अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत तर काहींना अपंगत्व आले आहे. याबाबत संबंधित खात्याने तत्काळ लक्ष देण्याची गरज आहे. याच परिसरात श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखाना तसेच गुळ उत्पादक गुर्हाळांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने वर्दळ वाढली आहे. राहूबेट हे वाळूतस्करीसाठी मोठे वाहतुकीचे आगार आहे. परिसरातील चोरटी वाळूची वाहतूक सर्वाधिक याच रस्त्याने पुणे शहराकडे होत असते. नियमबा वाहने वाळू वाहतूक करतात. त्यामुळे या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम खात्याचे अभियंता जाधव यांच्याश्ी संपर्क साधला असता ते म्हणाले की, तात्काळ या रस्त्याचे खड्डे बुजविण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे.-----------------