अवजड वाहतुकीस बंदीची मागणी
By admin | Updated: November 10, 2015 21:12 IST
जळगाव- ममुराबादनाकाकडून गुरुनानकनगरातून सध्या रात्रंदिवस अवजड वाहतूक सुरू आहे. ही वाहतूक बंद केली जावी, अशी मागणी नगरसेविका उज्ज्वला बाविस्कर यांनी केली आहे. त्यांनी निवेदन प्रसिद्धीस दिले आहे. त्यात म्हटले आहे की, ममुराबाद नाका ते गुरुनानक नगरातून ट्रॅक्टर, ट्रक आदी सुसाट धावतात. वाळू नेणारे अनेक अवजड वाहन या भागातून जातात. यामुळे या भागातील रहिवाशांना त्रास होत असून, त्याबाबत कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
अवजड वाहतुकीस बंदीची मागणी
जळगाव- ममुराबादनाकाकडून गुरुनानकनगरातून सध्या रात्रंदिवस अवजड वाहतूक सुरू आहे. ही वाहतूक बंद केली जावी, अशी मागणी नगरसेविका उज्ज्वला बाविस्कर यांनी केली आहे. त्यांनी निवेदन प्रसिद्धीस दिले आहे. त्यात म्हटले आहे की, ममुराबाद नाका ते गुरुनानक नगरातून ट्रॅक्टर, ट्रक आदी सुसाट धावतात. वाळू नेणारे अनेक अवजड वाहन या भागातून जातात. यामुळे या भागातील रहिवाशांना त्रास होत असून, त्याबाबत कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.