शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ अचानक कसे चर्चेत आले? आज मंत्रिपदाची शपथ घेणार, असे जाहीर केले...
2
भारत-पाक संघर्षात ड्रॅगनची खेळी, खरा विजय चीनचा झाल्याचा दावा; करणार तगडी कमाई, पण कशी?
3
“सरकारचे POKवर स्पष्ट धोरण नाही, युद्धकाळात पारदर्शकता राखायला हवी होती”: पृथ्वीराज चव्हाण
4
बॉलिवूडकर गप्प, पण सई ताम्हणकरने थेट घेतलं पाकिस्तानचं नाव; म्हणाली, "ज्यांना सरळ भाषा..."
5
'तोपर्यंत ऑपरेशन सिंदूर संपणार नाही...', भारताचे पाकिस्तानला सडेतोड उत्तर!
6
'अण्वस्त्रांचा मारा करू, असा इशारा पाकने दिला नव्हता; लढाई पारंपरिक पद्धतीनेच'
7
बंदी असतानाही गुजरातमध्ये दारूचा महापूर; वर्षाला १५,००० कोटींची दारू येतेय तरी कुठून?
8
'ऑपरेशन सिंदूर'च्या यशाबद्दल रेल्वेने तिकिटावर छापला PM मोदींचा फोटो; म्हणाले, "हा तर शौर्याला सलाम..."
9
भारत धर्मशाळा नाही की कुणीही यावे अन् स्थायिक व्हावे, आश्रयाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाचे परखड मत
10
"पहलगाम हल्ला दहशतवाद्यांची नाही, पर्यटकांची चूक"; पोलिसांसमोर ज्योती काय काय म्हणाली?
11
१२ वर्षांनी मोठ्या अभिनेत्यासोबत बोहल्यावर चढणार सई, लग्नाची तारीखही केली जाहीर
12
पाकच्या विजयासाठी चीनने लावता होता पूर्ण जोर, भारताची हेरगिरीही केली; अहवालातून माहिती समोर
13
“अमेरिका तहव्वूर राणाचे प्रत्यार्पण करू शकते, तर पाक सईद-लख्वी भारताला का देऊ शकत नाही”
14
आजचे राशीभविष्य २० मे २०२५ : थकबाकी मिळण्यास, व्यापारातील वसुली होण्यास उत्तम दिवस
15
धोरण बदलले अन् २२ दहशतवादी पाकमध्येच मारले; पाकिस्तानात खतरनाक दहशतवादी सैफची हत्या हे भारताच्या सक्रिय धोरणाचेच संकेत
16
जगबुडी नदीत कार कोसळून मुंबईच्या पाच जणांचा मृत्यू, वडिलांच्या अंत्यविधीसाठी जाताना मुलीचा अंत
17
चार कोटींचे आंबे अमेरिकेने नाकारले; फेकून देण्याची वेळ
18
आंतरजातीय/धर्मीय अल्पवयीन जोडप्यांनाही सुरक्षा, जिल्ह्यांतील विश्रामगृहात राहणार विशेष कक्ष
19
कोरोनाने डोके वर काढताच ठाणे पालिका ‘अलर्ट’; हाँगकाँग, सिंगापूरमुळे खबरदारी, रुग्णालय सज्ज
20
मुंबईच्या स्मशानात २ वर्षांत ४ लाख क्विंटल लाकडं जाळणार; पर्यावरणवाद्यांनी सुचवला मोक्षकाष्ठचा पर्याय, राेजगारही मिळेल 

सीबीआय चौकशीची मागणी सुप्रीम कोर्टामध्ये अमान्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2016 03:05 IST

सर्वोच्च न्यायालयाने उत्तर प्रदेशच्या मथुरेत गेल्या आठवड्यात झालेल्या हिंसाचाराची केंद्रीय तपास संस्थेद्वारे (सीबीआय) चौकशीचे आदेश देण्यास मंगळवारी नकार दिला.

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने उत्तर प्रदेशच्या मथुरेत गेल्या आठवड्यात झालेल्या हिंसाचाराची केंद्रीय तपास संस्थेद्वारे (सीबीआय) चौकशीचे आदेश देण्यास मंगळवारी नकार दिला. त्यानंतर उत्तर प्रदेश सरकारने या प्रकरणाची अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीश इम्तियाझ मुर्तझा यांच्यामार्फत चौकशी करण्याचे ठरवले आहे. ही न्यायालयीन चौकशी असेल. मथुरेतील हिंसाचारामध्ये दोन पोलीस अधिकाऱ्यांसह एकूण २९ लोक ठार झाले होते.न्यायमूर्तीद्वय पी.सी. घोष आणि अमिताव रॉय यांच्या पीठाने या प्रकरणी कुठलाही आदेश देण्यास नकार देताना याचिकाकर्त्यास अलाहाबाद उच्च न्यायालयात जाण्याची सूचना केली. दिल्ली भाजपाचे प्रवक्ता अ‍ॅड. अश्विनी उपाध्याय यांनी ही याचिका केली होती. मथुरेत मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाल्यानंतर संबंधित पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे ज्येष्ठ वकील गीता लुथरा यांनी याचिकाकर्त्याच्या वतीने सांगितले होते. समाजवादी पार्टीच्या नेतृत्वातील सरकारद्वारे सीबीआय चौकशीच्या कुठल्याही हालचाली नसून राज्यातील तपास संस्था जबाबदारी योग्यरीतीने पार पाडत नसल्याचा आरोपही याचिकेत होता. (वृत्तसंस्था)>रामवृक्षच्या दहशतीची सरकारला होती माहितीउत्तर प्रदेशच्या मथुरेतील जवाहरबाग हिंसाचाराने संपूर्ण देशात राजकीय वादळ निर्माण झाले असतानाच या प्रकरणाशी संबंधित दस्तावेजांवरून सरकारी दाव्यांच्या विपरीत वेगळेच वास्तव समोर आले आहे.जवाहरबाग पार्कमध्ये रामवृक्ष यादवच्या काळ्या साम्राज्याची इत्थंभूत माहिती सरकारमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांना फार पूर्वीपासून होती, हे न्यायालयीन कागदपत्रांवरून स्पष्ट झाले आहे.