शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

'छोट्या गाडीतून आले, आता शीशमहलमध्ये राहतात', राहुल गांधींची अरविंद केजरीवालांवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2025 18:55 IST

Delhi Election 2025 : दिल्लीतील निवडणूक रॅलीला संबोधित करताना राहुल गांधींनी आम आदमी पक्षासोबतच भाजपवरही जोरदार निशाणा साधला.

Delhi Election 2025 : दिल्ली विधानसभा निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. अशा परिस्थितीत राज्यातील प्रचार शिगेला पोहोचले आहे. दरम्यान, काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी मंगळवारी पटपरगंजमध्ये जाहीर सभा घेतली. यावेळी त्यांनी  भाजपसह आम आदमी पक्षावर जोरदार हल्लाबोल केला. 'आरएसएस आणि भाजप भावाभावात भांडण लावतात, तर अरविंद केजरीवाल जे मनात येईल ते बोलतात. राजकारणात आल्यावर त्यांच्याकडे एक छोटी गाडी होती, आता ते एका आलिशाय शीशमहलमध्ये राहतात,' अशी टीका राहुल गांधींनी केली

भाजपवर टीकाराहुल गांधी पुढे म्हणतात, 'मला द्वेषाच्या बाजारात प्रेमाचे दुकान उघडायचे आहे. आम्हाला द्वेषाचा भारत नकोय. आम्हाला प्रेमाचे दुकान हवे आहे. आमचा लढा संविधानासाठी आहे. 400 पार केल्यानंतर संविधान बदलू, असे भाजपने स्पष्टपणे सांगितले होते. या देशाचे संविधान सर्वांना समान मानते. या देशात कोणी घाबरू नये, असे संविधानात लिहिले आहे. भाजपवाले संविधान मानत नाहीत. या लोकांना एका जातीला दुसऱ्या जातीशी लढवायचे आहे. त्यांना तुमचे पैसे तुमच्या खिशातून काढून अब्जाधीशांना द्यायचे आहेत.'

'राम मंदिराच्या उद्घाटनात एकही गरीब दिसणार नाही. आपल्या राष्ट्रपती आदिवासी आहेत, त्यांनाही तिथे जाऊ दिले नाही. नवीन संसदेचे उद्घाटन झाले, तेव्हाही राष्ट्रपतींना बोलावले नाही. देशातील सर्व जनता समान असल्याचे संविधान सांगते. कोणीही कमी नाही, कोणी मोठा किंवा लहान नाही. भारतातील सर्व नागरिक समान आहेत. मोदींना भारताची संपत्ती अब्जाधीशांच्या हाती सोपवायची आहे. तुमच्या खिशातून पैसे काढून अब्जाधीशांना द्यायचे आहेत. अदानी हे पंतप्रधान मोदींचे खास मित्र आहेत,' अशी टीकाही त्यांनी यावेळी केली..

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीArvind Kejriwalअरविंद केजरीवालBJPभाजपाdelhi electionदिल्ली निवडणूक