शहरं
Join us  
Trending Stories
1
त्रिभाषा सूत्र १०० टक्के आम्ही महाराष्ट्रात लागू करणारच; CM देवेंद्र फडणवीसांची ठाम भूमिका
2
उद्धवजी, तुम्हाला सत्तेत येण्याचा स्कोप; फडणवीस यांची ‘ऑफर’, विधानभवनात रंगली जोरदार टोलेबाजी
3
Viral Video : चोरी करायला जिममध्ये गेला, मिळाली अशी शिक्षा की आयुष्यभर लक्षात राहील!
4
एक इंजिन फेल झाले, इंडिगोचे विमान मुंबईच्या दिशेने वळवले; दिल्ली-गोवा फ्लाईटचे आपत्कालीन लँडिंग
5
आजचे राशीभविष्य, १७ जुलै २०२५: आजचा दिवस अत्यंत लाभदायी, नोकरीत यश मिळेल
6
‘शार्क’शिवाय ‘सार्क’? अशक्य!
7
एअर इंडियाला इंधन नियंत्रण स्विचमध्ये कोणताही दोष आढळला नाही, बोईंग 787 विमानाची तपासणी पूर्ण
8
देशातील १०० जिल्ह्यांमध्ये १.७ कोटी शेतकरी आता होणार अधिक सक्षम 
9
आत्ता फक्त बिहार, नंतर तुमच्याही मानेवर तलवार! मतदार यादी व्हेरिफिकेशनचे वास्तव भयानकच...
10
राज्यातील पक्षांमध्ये तब्बल १६० ‘आघाडी’ अन् ४० ‘सेना’; राज्य निवडणूक आयोगाकडे ४२३ नोंदणीकृत पक्ष
11
बेपत्ता ६,३२४ महिला, बालकांचा महिनाभरात शोध; मुख्यमंत्री फडणवीस यांची विधान परिषदेत माहिती
12
राज्य कामगार विमा योजनेत नोंदणी नसलेल्यांनी लक्ष द्या...
13
अकबर ‘सहिष्णू’ तर औरंगजेब ‘मंदिर पाडणारा...’; आठवीच्या पाठ्यपुस्तकात एनसीईआरटीकडून उल्लेख
14
बंपर लॉटरी लागली! भारतात सापडले कच्चे तेल, छाेटे राज्य हाेणार मालामाल
15
इस्रायली उद्योजकापासून दोन मुली; पतीला न सांगता महिला गोव्यातून गेली गुहेत राहायला
16
अधिवेशन गाजणार? विरोधक करणार कोंडी; काँग्रेससह विरोधी पक्षांकडून मुद्द्यांची जुळवाजुळव सुरू
17
जुनी शस्त्रे वापरून भारताला आधुनिक युद्धे जिंकणे अवघड; सीडीएस जनरल अनिल चौहान यांचे परखड मत
18
इलेक्ट्रिक कारच्या विक्रीत २१ पट वाढ; चार्जिंग स्टेशनही तीन वर्षांत ५ पट वाढले
19
काैटुंबिक कलहातून होतेय कोवळ्या मुलांची हाेरपळ; बदलापुरात मुलीचे अपहरण; मुंब्य्रात आईच बनली क्रूर
20
रस्ते अपघातांच्या मुळाशी पोलिस का जात नाहीत? वाहनचालकच का ठरतात गुन्हेगार?

द्वेष व अहंकाराचा पराभव - ममता बॅनर्जी

By admin | Updated: February 10, 2015 12:11 IST

दिल्लीतील निवडणुकीत जनतेचा विजय झाला असून द्वेष, हिंसा व अहंकाराचा पराभव झाला आहे अशा शब्दात ममता बॅनर्जी यांनी भाजपावर निशाणा साधला आहे.

ऑनलाइन लोकमत 
नवी दिल्ली, दि. १० - दिल्लीतील निवडणुकीत जनतेचा विजय झाला असून द्वेष, हिंसा व अहंकाराचा पराभव झाला आहे अशा शब्दात ममता बॅनर्जी यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. तर भाजपाच्या काळात फक्त उद्योजकांचेच अच्छे दिन आल्याने आपचा विजय झाला असे सांगत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी मोदींवर टीकास्त्र सोडले आहे. 
दिल्लीत आम आदमी पक्षाला मिळालेल्या विजयानंतर तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी अरविंद केजरीवाल यांचे कौतुक करत मोदींवरही निशाणा साधला. 'दिल्लीतील निकाल हा भारताच्या राजकारणातील महत्त्वाचे वळण ठरणार असून भारताला अशा प्रकारच्या परिवर्तनाची गरज होते असे ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे. केजरीवाल व त्यांच्या सहकार्यांचे अभिनंदन करतानाच ममता दिदींनी मोदींवर अप्रत्यक्ष टीका केली. 'हा जनतेचा विजय असून अहंकार, सूडाचे राजकारण आणि द्वेष पसरवणा-यांचा पराभव आहे' असेही त्यांनी नमूद केले. 
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनीही अऱविंद केजरीवाल यांचे अभिनंदन केले आहे. हजारे म्हणाले, केजरीवाल यांनी जनलोकपाल विधेयकाची लढाई विसरु नये व हे विधेयक पुढे न्यावे. भाजपाची विश्वासार्हता कमी झाली असून मोदी सरकारच्या काळात जनतेला अच्छे दिनाची प्रतिक्षा होती. मात्र प्रत्यक्षात फक्त उद्योजकांसाठीच अच्छे दिन आले असा टोलाही त्यांनी लगावला. भाजपाचे भ्रष्टाचारावर नियंत्रण नाही असेही त्यांनी नमूद केले. केजरीवाल यांच्या शपथविधीला उपस्थित राहणार नाही असे हजारे यांनी स्पष्ट केले.