शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

द्वेष व अहंकाराचा पराभव - ममता बॅनर्जी

By admin | Updated: February 10, 2015 12:11 IST

दिल्लीतील निवडणुकीत जनतेचा विजय झाला असून द्वेष, हिंसा व अहंकाराचा पराभव झाला आहे अशा शब्दात ममता बॅनर्जी यांनी भाजपावर निशाणा साधला आहे.

ऑनलाइन लोकमत 
नवी दिल्ली, दि. १० - दिल्लीतील निवडणुकीत जनतेचा विजय झाला असून द्वेष, हिंसा व अहंकाराचा पराभव झाला आहे अशा शब्दात ममता बॅनर्जी यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. तर भाजपाच्या काळात फक्त उद्योजकांचेच अच्छे दिन आल्याने आपचा विजय झाला असे सांगत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी मोदींवर टीकास्त्र सोडले आहे. 
दिल्लीत आम आदमी पक्षाला मिळालेल्या विजयानंतर तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी अरविंद केजरीवाल यांचे कौतुक करत मोदींवरही निशाणा साधला. 'दिल्लीतील निकाल हा भारताच्या राजकारणातील महत्त्वाचे वळण ठरणार असून भारताला अशा प्रकारच्या परिवर्तनाची गरज होते असे ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे. केजरीवाल व त्यांच्या सहकार्यांचे अभिनंदन करतानाच ममता दिदींनी मोदींवर अप्रत्यक्ष टीका केली. 'हा जनतेचा विजय असून अहंकार, सूडाचे राजकारण आणि द्वेष पसरवणा-यांचा पराभव आहे' असेही त्यांनी नमूद केले. 
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनीही अऱविंद केजरीवाल यांचे अभिनंदन केले आहे. हजारे म्हणाले, केजरीवाल यांनी जनलोकपाल विधेयकाची लढाई विसरु नये व हे विधेयक पुढे न्यावे. भाजपाची विश्वासार्हता कमी झाली असून मोदी सरकारच्या काळात जनतेला अच्छे दिनाची प्रतिक्षा होती. मात्र प्रत्यक्षात फक्त उद्योजकांसाठीच अच्छे दिन आले असा टोलाही त्यांनी लगावला. भाजपाचे भ्रष्टाचारावर नियंत्रण नाही असेही त्यांनी नमूद केले. केजरीवाल यांच्या शपथविधीला उपस्थित राहणार नाही असे हजारे यांनी स्पष्ट केले.