शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
3
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
4
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
5
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
6
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
7
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
8
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
9
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
10
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
11
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
12
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
13
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
14
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
15
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
16
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
17
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
18
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
19
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
20
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!

द्वेष व अहंकाराचा पराभव - ममता बॅनर्जी

By admin | Updated: February 10, 2015 12:11 IST

दिल्लीतील निवडणुकीत जनतेचा विजय झाला असून द्वेष, हिंसा व अहंकाराचा पराभव झाला आहे अशा शब्दात ममता बॅनर्जी यांनी भाजपावर निशाणा साधला आहे.

ऑनलाइन लोकमत 
नवी दिल्ली, दि. १० - दिल्लीतील निवडणुकीत जनतेचा विजय झाला असून द्वेष, हिंसा व अहंकाराचा पराभव झाला आहे अशा शब्दात ममता बॅनर्जी यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. तर भाजपाच्या काळात फक्त उद्योजकांचेच अच्छे दिन आल्याने आपचा विजय झाला असे सांगत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी मोदींवर टीकास्त्र सोडले आहे. 
दिल्लीत आम आदमी पक्षाला मिळालेल्या विजयानंतर तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी अरविंद केजरीवाल यांचे कौतुक करत मोदींवरही निशाणा साधला. 'दिल्लीतील निकाल हा भारताच्या राजकारणातील महत्त्वाचे वळण ठरणार असून भारताला अशा प्रकारच्या परिवर्तनाची गरज होते असे ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे. केजरीवाल व त्यांच्या सहकार्यांचे अभिनंदन करतानाच ममता दिदींनी मोदींवर अप्रत्यक्ष टीका केली. 'हा जनतेचा विजय असून अहंकार, सूडाचे राजकारण आणि द्वेष पसरवणा-यांचा पराभव आहे' असेही त्यांनी नमूद केले. 
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनीही अऱविंद केजरीवाल यांचे अभिनंदन केले आहे. हजारे म्हणाले, केजरीवाल यांनी जनलोकपाल विधेयकाची लढाई विसरु नये व हे विधेयक पुढे न्यावे. भाजपाची विश्वासार्हता कमी झाली असून मोदी सरकारच्या काळात जनतेला अच्छे दिनाची प्रतिक्षा होती. मात्र प्रत्यक्षात फक्त उद्योजकांसाठीच अच्छे दिन आले असा टोलाही त्यांनी लगावला. भाजपाचे भ्रष्टाचारावर नियंत्रण नाही असेही त्यांनी नमूद केले. केजरीवाल यांच्या शपथविधीला उपस्थित राहणार नाही असे हजारे यांनी स्पष्ट केले.