शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
2
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
3
युद्धबंदीनंतर पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
4
फक्त एक मिस्ड कॉल किंवा SMS द्वारे PF बॅलन्स तपासा; कुठेही लॉगइन करण्याची गरज नाही
5
'युद्धबंदीचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
6
फक्त ४० रुपयांमध्ये पोटभर जेवण! 'या' बॉलिवूड कलाकाराने उघडलंय हॉटेल, चाहत्यांकडून कौतुक
7
मुलगा देशसेवेसाठी दिलाय;काही झालं तर मन घट्ट केलंय! कर्नल नितीन काळदाते यांच्या आईची कृतार्थ भावना
8
पैशांसाठी कुणावरही अवलंबून राहू नये असं वाटतं? मग आजपासून 'या' १० टीप्स फोलो करा
9
IPL Re-Start : फायनल ठरलेल्या दिवशीच खेळवण्याचा प्लॅन; पण ते कसं शक्य होईल?
10
पाकिस्तानकडून युद्धबंदीचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...
11
"बुद्धिमत्तापूर्ण आणि संतुलित"; पी चिदंबरम यांनी पंतप्रधान मोदींच्या युद्ध धोरणाचं केलं भरभरुन कौतुक
12
पुन्हा समोर आला पाकिस्तानचा दुटप्पी चेहरा; युद्धबंदीनंतर रात्री काय-काय घडलं? जाणून घ्या
13
भीषण! भरधाव कारने घराबाहेर बसलेल्या महिलेसह ४ मुलांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video
14
"काश्मीर समस्याही...!"; भारत-पाकिस्तान युद्धबंदीनंतर ट्रम्प यांचा आणखी एक मोठा दावा
15
'आम्हाला तिसऱ्या पक्षाची...', ट्रम्प यांनी काश्मीर मुद्दा उपस्थित केल्यावर प्रियंका चतुर्वेदींनी दिले उत्तर
16
पाकिस्तानचे अपयश उघड! बिकानेरमध्ये ब्रह्मोस क्षेपणास्त्र बूस्टर, नोज कॅप सापडले
17
तुमच्या मुलीच्या लग्नासाठी लाखो रुपये जमवायचेत? गुंतवणुकीसाठी 'हे' आहेत ३ बेस्ट पर्याय
18
बोरीवलीच्या नँसी व सुकरवाडी एसटी डेपोसाठी ३ महिन्यांत निविदा काढणार; परिवहन मंत्री सरनाईकांची घोषणा
19
चौकारांच्या हॅटट्रिकसह स्मृती मानधनाने साजरी केली विक्रमी सेंच्युरी!
20
Ceasefire Violation: 'PM मोदींना हे माहिती होतं, त्यामुळे त्यांनी शस्त्रसंधीचं...'; एकनाथ शिंदे पाकिस्तानवर भडकले

द्वेष व अहंकाराचा पराभव - ममता बॅनर्जी

By admin | Updated: February 10, 2015 12:11 IST

दिल्लीतील निवडणुकीत जनतेचा विजय झाला असून द्वेष, हिंसा व अहंकाराचा पराभव झाला आहे अशा शब्दात ममता बॅनर्जी यांनी भाजपावर निशाणा साधला आहे.

ऑनलाइन लोकमत 
नवी दिल्ली, दि. १० - दिल्लीतील निवडणुकीत जनतेचा विजय झाला असून द्वेष, हिंसा व अहंकाराचा पराभव झाला आहे अशा शब्दात ममता बॅनर्जी यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. तर भाजपाच्या काळात फक्त उद्योजकांचेच अच्छे दिन आल्याने आपचा विजय झाला असे सांगत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी मोदींवर टीकास्त्र सोडले आहे. 
दिल्लीत आम आदमी पक्षाला मिळालेल्या विजयानंतर तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी अरविंद केजरीवाल यांचे कौतुक करत मोदींवरही निशाणा साधला. 'दिल्लीतील निकाल हा भारताच्या राजकारणातील महत्त्वाचे वळण ठरणार असून भारताला अशा प्रकारच्या परिवर्तनाची गरज होते असे ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे. केजरीवाल व त्यांच्या सहकार्यांचे अभिनंदन करतानाच ममता दिदींनी मोदींवर अप्रत्यक्ष टीका केली. 'हा जनतेचा विजय असून अहंकार, सूडाचे राजकारण आणि द्वेष पसरवणा-यांचा पराभव आहे' असेही त्यांनी नमूद केले. 
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनीही अऱविंद केजरीवाल यांचे अभिनंदन केले आहे. हजारे म्हणाले, केजरीवाल यांनी जनलोकपाल विधेयकाची लढाई विसरु नये व हे विधेयक पुढे न्यावे. भाजपाची विश्वासार्हता कमी झाली असून मोदी सरकारच्या काळात जनतेला अच्छे दिनाची प्रतिक्षा होती. मात्र प्रत्यक्षात फक्त उद्योजकांसाठीच अच्छे दिन आले असा टोलाही त्यांनी लगावला. भाजपाचे भ्रष्टाचारावर नियंत्रण नाही असेही त्यांनी नमूद केले. केजरीवाल यांच्या शपथविधीला उपस्थित राहणार नाही असे हजारे यांनी स्पष्ट केले.