शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
6
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
7
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
8
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
9
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
10
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
11
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
12
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
13
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
14
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
15
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
16
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
17
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
18
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
19
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
20
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकांवर डोळा ठेवूनच नोटांचा निर्णय?

By admin | Updated: November 11, 2016 04:43 IST

पाचशे आणि हजारच्या नोटांवर बंदीचा निर्णय घेण्यासाठी सरकारने तशी वेळही अचूक साधल्याचे सांगितले जात आहे. उत्तर प्रदेशात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर

मीना कमल, लखनौपाचशे आणि हजारच्या नोटांवर बंदीचा निर्णय घेण्यासाठी सरकारने तशी वेळही अचूक साधल्याचे सांगितले जात आहे. उत्तर प्रदेशात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काही पक्षांकडून बेहिशेबी मालमत्ता जमा करण्यात आली आहे. या पक्षांना मोदी सरकारने चेक (शह) दिल्याचे मानण्यात येत आहे. रोखीच्या पैशांबाबतची आकडेवारीच अधिक बोलकी आहे. उत्तर प्रदेशात मागील तीन लोकसभा निवडणुकांत म्हणजेच २००४, २००९ आणि २०१४ मध्ये राजकीय पक्षांकडे रोखीच्या स्वरूपात जमा झालेली रक्कम १,०३९ कोटी रुपये होती, तर चेकने जमा झालेली रक्कम १,२९९ कोटी रुपये होती. असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्मने ही माहिती दिली आहे. राजकीय पक्षांच्या आयकर रिटर्नचे ते विश्लेषण करतात. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत राज्यात निवडणूक आयोेगाने कारवाईत ३३० कोटी रुपये जप्त केले होते. अर्थतज्ज्ञ एस.पी. तिवारी म्हणतात की, काळा पैसा व्यवहारात आणण्यासाठी निवडणुका आणि राजकीय पक्ष हे स्रोत बनले आहेत.

ही आर्थिक आणीबाणी : मायावती पाचशे व हजारच्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेऊन सरकारने आर्थिक आणीबाणीसारखी परिस्थिती निर्माण केली आहे, अशी टीका बसपाच्या प्रमुख मायावती यांनी केली आहे. विधानसभा निवडणुकांत आपले अपयश झाकण्यासाठीच सरकारने हा निर्णय घेतला आहे, असे सांगून मायावती म्हणाल्या की, या निर्णयाने देशातील ९० टक्के नागरिक नाराज आहेत. या निर्णयानंतर नागरिकांत अशी चर्चा आहे की, केंद्र सरकारने अडीच वर्षांच्या काळात आपल्या पक्षाच्या आर्थिक मजबुतीचा सर्व बंदोबस्त करून जनतेला त्रस्त करण्याचे पाऊल उचलले आहे, असेही मायावती म्हणाल्या. आम्ही काळ्या पैशांविरोधात आम्हीही काळ्या पैशांच्या विरोधात आहोत; पण अचानक असा निर्णय घेतल्याने अराजक निर्माण झाले आहे. विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच हा निर्णय घेण्यात आल्याचेही मत सपाचे प्रमुख मुलायमसिंह यांनी व्यक्त केले आहे. हा निर्णय काही दिवसांसाठी मागे घेण्यात यावा, अशी मागणीही त्यांनी केली. ते म्हणाले की, देशाचा काळा पैसा विदेशात आणि सोन्याच्या स्वरूपात पडला आहे. मोठ्या नोटा बंद केल्याने फक्त सामान्य लोक त्रस्त होत आहेत. भाजपला फक्त निवडणुका दिसत आहेत, देश नाही. मोदी काही मोठ्या लोकांकडे देशाला गहाण ठेवू इच्छितात, असा आरोपही त्यांनी केला. प्रत्येक महिलेला सरकारने महिना पाच लाखांपर्यंतची रक्कम बँकेत जमा करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.