शहरं
Join us  
Trending Stories
1
हिमाचल प्रदेश: बिलासपूरमध्ये बसवर डोंगराचा ढिगारा कोसळला, १५ जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
निलेश घायवळचा पाय खोलात;बनावट पासपोर्ट प्रकरणासह आतापर्यंत ४ गुन्हे दाखल
3
भूस्खलन होऊन बसवर कोसळली दरड, १८ जणांचा मृत्यू, पण ३ मुलं आश्चर्यकारकरीत्या बचावली  
4
Dharashiv: मोठी बातमी! तातडीने मदत द्या, मागणी करणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांवर गुन्हे!
5
Bigg Bossचं घर सील, सर्व स्पर्धकांना लवकरच काढणार बाहेर, समोर आलं असं कारण 
6
ICC Womens World Cup 2025 : हेदर नाइटचा हिट शो! इंग्लंडनं बांगलादेशला पराभूत करत भारताला दिला धक्का
7
कस्तुरबा रुग्णालयातील पुस्तक वाटप प्रकरणाला वेगळं वळण, किशोरी पेडणेकरांचा तक्रारदारालाच प्रतिप्रश्न, म्हणाल्या...
8
धक्कादायक!! विरारमध्ये दोन तरूणांनी एकत्र संपवलं जीवन, १८व्या मजल्यावरून मारली उडी
9
अभिषेक शर्मा ICC पुरस्काराच्या शर्यतीत; त्याला कुलदीपसह झिम्बाब्वेचा गडी देणार टक्कर!
10
भर वर्गात महिलेसोबत आक्षेपार्ह चाळे करताना सापडला शिक्षक, मुलांनी रेकॉर्डे केला व्हिडीओ, कुठे घडली घटना
11
...अन् रागाच्या भरात पृथ्वी शॉनं विकेट घेणाऱ्या मुशीर खानवर उगारली बॅट; नेमकं काय घडलं? (VIDEO)
12
मार्कशीटवर दिसले स्वीमीजी... विद्यार्थ्याने ऑनलाइन केला अर्ज, विद्यापीठाने घातला वेगळाच घोळ
13
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणाचा ठाण्यात निषेध, मूक निदर्शने
14
६८ कोटींचा रस्ता ३ वर्षांपासून पूर्ण होईना; कल्याण-अंबरनाथ रस्त्याच्या कामाला अखेर मुहूर्त
15
सांगलीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; आमदार पुत्राचा थेट भाजपमध्ये प्रवेश
16
पुणे अपघात प्रकरण: गौतमी पाटीलला अश्रू अनावर, म्हणाली- "सगळे मला ट्रोल करत सुटलेत..."
17
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
18
स्मृती मानधना फ्लॉप ठरली तरी टॉपला; आता चुका सुधारून हिट शो द्यावाच लागेल, नाहीतर...
19
ICU मध्ये असलेल्या भाजप खासदाराची ममता बॅनर्जींनी घेतली भेट; म्हणाल्या, "जास्त सीरियस नाहीये."
20
अहो आश्चर्यम! महिलेने कुत्र्याच्या नावाने केलं मतदान; पोलखोल होताच पोलीसही झाले हैराण

निवडणुकांवर डोळा ठेवूनच नोटांचा निर्णय?

By admin | Updated: November 11, 2016 04:43 IST

पाचशे आणि हजारच्या नोटांवर बंदीचा निर्णय घेण्यासाठी सरकारने तशी वेळही अचूक साधल्याचे सांगितले जात आहे. उत्तर प्रदेशात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर

मीना कमल, लखनौपाचशे आणि हजारच्या नोटांवर बंदीचा निर्णय घेण्यासाठी सरकारने तशी वेळही अचूक साधल्याचे सांगितले जात आहे. उत्तर प्रदेशात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काही पक्षांकडून बेहिशेबी मालमत्ता जमा करण्यात आली आहे. या पक्षांना मोदी सरकारने चेक (शह) दिल्याचे मानण्यात येत आहे. रोखीच्या पैशांबाबतची आकडेवारीच अधिक बोलकी आहे. उत्तर प्रदेशात मागील तीन लोकसभा निवडणुकांत म्हणजेच २००४, २००९ आणि २०१४ मध्ये राजकीय पक्षांकडे रोखीच्या स्वरूपात जमा झालेली रक्कम १,०३९ कोटी रुपये होती, तर चेकने जमा झालेली रक्कम १,२९९ कोटी रुपये होती. असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्मने ही माहिती दिली आहे. राजकीय पक्षांच्या आयकर रिटर्नचे ते विश्लेषण करतात. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत राज्यात निवडणूक आयोेगाने कारवाईत ३३० कोटी रुपये जप्त केले होते. अर्थतज्ज्ञ एस.पी. तिवारी म्हणतात की, काळा पैसा व्यवहारात आणण्यासाठी निवडणुका आणि राजकीय पक्ष हे स्रोत बनले आहेत.

ही आर्थिक आणीबाणी : मायावती पाचशे व हजारच्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेऊन सरकारने आर्थिक आणीबाणीसारखी परिस्थिती निर्माण केली आहे, अशी टीका बसपाच्या प्रमुख मायावती यांनी केली आहे. विधानसभा निवडणुकांत आपले अपयश झाकण्यासाठीच सरकारने हा निर्णय घेतला आहे, असे सांगून मायावती म्हणाल्या की, या निर्णयाने देशातील ९० टक्के नागरिक नाराज आहेत. या निर्णयानंतर नागरिकांत अशी चर्चा आहे की, केंद्र सरकारने अडीच वर्षांच्या काळात आपल्या पक्षाच्या आर्थिक मजबुतीचा सर्व बंदोबस्त करून जनतेला त्रस्त करण्याचे पाऊल उचलले आहे, असेही मायावती म्हणाल्या. आम्ही काळ्या पैशांविरोधात आम्हीही काळ्या पैशांच्या विरोधात आहोत; पण अचानक असा निर्णय घेतल्याने अराजक निर्माण झाले आहे. विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच हा निर्णय घेण्यात आल्याचेही मत सपाचे प्रमुख मुलायमसिंह यांनी व्यक्त केले आहे. हा निर्णय काही दिवसांसाठी मागे घेण्यात यावा, अशी मागणीही त्यांनी केली. ते म्हणाले की, देशाचा काळा पैसा विदेशात आणि सोन्याच्या स्वरूपात पडला आहे. मोठ्या नोटा बंद केल्याने फक्त सामान्य लोक त्रस्त होत आहेत. भाजपला फक्त निवडणुका दिसत आहेत, देश नाही. मोदी काही मोठ्या लोकांकडे देशाला गहाण ठेवू इच्छितात, असा आरोपही त्यांनी केला. प्रत्येक महिलेला सरकारने महिना पाच लाखांपर्यंतची रक्कम बँकेत जमा करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.