शहरं
Join us  
Trending Stories
1
ISRO आणखी एक विक्रम रचणार! २०३५ पर्यंत भारतीय अंतराळ स्टेशन बनवणार, पाहा कसं दिसतं मॉडेल?
2
कैद्यांना मोकाट सोडणारे ठाणे मुख्यालयातील दोन पोलीस कर्मचारी बडतर्फ, पोलिस आयुक्तांचे आदेश
3
भाजपाला कधी मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष?; अचानक घडलेल्या घडामोडींमुळे झाला विलंब, काय आहे कारण?
4
परमबीर सिंग यांच्यावर खंडणीचा आराेप करणाऱ्या बिल्डरवर फसवणूकीचा गुन्हा; अग्रवाल बंधू अटकेत
5
Video: फटाक्यांच्या आवाजानं बैल उधळला, सगळीकडे गोंधळ; गावकऱ्यांची झाली पळापळ, १ जण जखमी
6
भारतावरील 'टॅरिफ'वरून' ट्रम्प यांच्यावर टीका केली, माजी अमेरिकन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराच्या घरावर एफबीआयचा छापा
7
टिकटॉक भारतात परत सुरू होणार? नवीन अपडेट आली, सोशल मीडियावर जोरदार चर्चा
8
Video: इलेक्टिक कारच्या ऑटोमेटिक फिचरनं घेतला मालकाचा जीव?; अंगावर काटा आणणारा व्हिडिओ व्हायरल
9
ऑनलाइन फॅन्टसी गेमिंगवर अखेर बंदी; नवीन विधेयकावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची मोहोर
10
अबब! ३५ लाख जप्त, २० लाखांची रोकड जाळली; सरकारी इंजिनिअरचा 'काळा' प्रताप उघड, नेमकं काय घडलं?
11
सोलापूर: माहेराहून पैसे आण, चाबकाने मारले फटके; काजलने आयुष्य संपवले, वैष्णवी हगवणे घटनेची पुनरावृत्ती?
12
'ऑपरेशन सिंदूर'मधील शहीद जवान रामच्या घरी जन्मली 'लक्ष्मी'; ३ महिन्यांनी कुटुंबात पसरला आनंद
13
'पाकिस्तान अजूनही डंपर, असीम मुनीरनेही कबूल केले', राजनाथ सिंह यांनी मर्सिडीजच्या विधानाची खिल्ली उडवली
14
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?
15
Video: सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला अन् नाशिकमधला राडा समोर आला; कुत्र्याने बिबट्यावरच केला हल्ला
16
लवकरच ममता बॅनर्जींचे सरकार जाणार अन्..; कोलकात्यातून PM मोदींचा हल्लाबोल
17
पुणे हादरले! 'तुला किंमत चुकवावी लागेल', मानलेल्या बहिणीच्या प्रियकरानेच केली इंजिनिअर सौरभची हत्या
18
चीनची मोठी तयारी! या देशाविरोधात लढणार,समुद्रात १४ लढाऊ जहाजे उतरवले; लष्कर हाय अलर्टवर
19
६० कोटींचा सायबर फ्रॉड, ९४३ बँक खात्यांचा वापर; मुंबई पोलिसांनी १२ आरोपींना घेतले ताब्यात
20
संपूर्ण देशाची फेव्हरिट बनली ही ₹9 लाखाहून कमी किंमतीची SUV; नेक्सन, पंच, फ्रोंक्सला टाकलं मागे; विक्री घटूनही ठरली नं. 1

कर्जमुक्त नव्हे, कर्जबाजारी केले!

By admin | Updated: June 2, 2014 23:43 IST

चुकीचा दावा : नाशिक मनपाबाबत राज यांचाच गैरसमज

चुकीचा दावा : नाशिक मनपाबाबत राज यांचाच गैरसमज
नाशिक : नाशिक महापालिकेत खूप कामे केली; परंतु ती लोकांसमोर नीट मांडता आली नाही, असे सांगणार्‍या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महापालिकेवरील साडेसहाशे कोटी रुपयांचे कर्ज फेडल्याचा दावा केला खरा; परंतु मनसे सत्तेवर आली तेव्हा अशा प्रकारचे कोणतेही कर्ज पालिकेवर नव्हते. उलट गेल्या दोन वर्षांत मनसेच्या कारकिर्दीत तब्बल साडेतीनशे कोटी रुपयांचे कर्ज काढण्याची कार्यवाही सुरू झाली आहे. त्यामुळे लोकांचा गैरसमज दूर करता करता प्रत्यक्षात राज ठाकरे यांचाच गैरसमज झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
लोकसभा निवडणुकीत मनसे उमेदवारांचा दारुण पराभव झाल्यानंतर राज ठाकरे यांनी शनिवारी सोमय्या मैदान येथे प्रथमच जाहीर सभा घेतली आणि विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले. यावेळी नाशिकमध्ये मनसेचे काम समाधानकारक नसल्याने वेळोवेळी होणार्‍या प्रश्नांच्या सरबत्तीला राज यांनी उत्तर दिले. महापालिकेवर साडेसहाशे कोटी रुपयांचे कर्ज होते, ते फेडले आणि इतकेच नव्हे तर यामुळे मोठी विकासकामे करता आली नाही, असा अप्रत्यक्ष दावा राज ठाकरे यांनी केल्याने पालिका वर्तुळातील सारेच जण बुचकळ्यात पडले आहेत.
मनसेची सत्ता आली तेव्हा महापालिकेवर साडेसहाशे कोटी रुपयांचे कोणतेही कर्ज नव्हते. महापालिकेने आजवर सर्वाधिक शंभर कोटी रुपयांचे कर्ज काँग्रेसच्या शोभा बच्छाव महापौर असताना काढले होते. कर्जरोख्याच्या माध्यमातून काढलेले हे कर्ज शिवसेनेचे दशरथ पाटील महापौर असताना फेडण्यात आले होते. त्यानंतर पालिकेवर आजवर कोणतेही कर्ज नाही. (प्रतिनिधी)
----------
गेल्या दोन वर्षांत मनसेची सत्ता आल्यानंतर आधी दोनशे कोटी रुपयांचे कर्ज काढण्यास महापालिकेला राज्य शासनाने मान्यता दिली. त्यानंतर अलीकडेच आणखी दीडशे कोटी रुपयांचे कर्ज काढण्यास मान्यता दिली. त्यानुसार कर्ज काढण्याची कार्यवाही सुरू झाली आहे.
---------
तो स्पील ओव्हर होता...
राज ठाकरे यांनी उपस्थित केलेला मुद्दा स्पील ओव्हरचा असू शकेल. पालिकेत निधीचा विचार न करता नागरी कामे मंजूर केली जातात; परंतु निधीची अडचण आली की ही कामे कार्यवाहीत अडकतात. अंदाजपत्रकात त्याचे आर्थिक दायित्व दर्शविले जाते. त्यालाच स्पील ओव्हर म्हणतात. ही कामे केली असल्याचा दावा कदाचित मनसेचा असू शकेल; परंतु त्यात विशेष असे काहीच नसते. मनसेने दायित्व कमी केले याचाच अर्थ असा की, शिवसेना-भाजपाच्या गेल्या पंचवार्षिकमधील साडेसहाशे कोटी रुपयांची कामे मार्गी लागली आणि त्या बदल्यात मनसेने नवीन कामेच केली नाहीत असा होतो. त्यामुळे मनसेने काढलेला मुद्दा प्रचाराचा की अपप्रचाराचा, असा प्रश्न निर्माण होऊ शकतो.