शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
4
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
5
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
6
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
7
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
8
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
9
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
10
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
11
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
12
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
13
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
14
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
15
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
16
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
17
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
18
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
19
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
20
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट

कर्जमुक्त नव्हे, कर्जबाजारी केले!

By admin | Updated: June 2, 2014 23:43 IST

चुकीचा दावा : नाशिक मनपाबाबत राज यांचाच गैरसमज

चुकीचा दावा : नाशिक मनपाबाबत राज यांचाच गैरसमज
नाशिक : नाशिक महापालिकेत खूप कामे केली; परंतु ती लोकांसमोर नीट मांडता आली नाही, असे सांगणार्‍या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महापालिकेवरील साडेसहाशे कोटी रुपयांचे कर्ज फेडल्याचा दावा केला खरा; परंतु मनसे सत्तेवर आली तेव्हा अशा प्रकारचे कोणतेही कर्ज पालिकेवर नव्हते. उलट गेल्या दोन वर्षांत मनसेच्या कारकिर्दीत तब्बल साडेतीनशे कोटी रुपयांचे कर्ज काढण्याची कार्यवाही सुरू झाली आहे. त्यामुळे लोकांचा गैरसमज दूर करता करता प्रत्यक्षात राज ठाकरे यांचाच गैरसमज झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
लोकसभा निवडणुकीत मनसे उमेदवारांचा दारुण पराभव झाल्यानंतर राज ठाकरे यांनी शनिवारी सोमय्या मैदान येथे प्रथमच जाहीर सभा घेतली आणि विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले. यावेळी नाशिकमध्ये मनसेचे काम समाधानकारक नसल्याने वेळोवेळी होणार्‍या प्रश्नांच्या सरबत्तीला राज यांनी उत्तर दिले. महापालिकेवर साडेसहाशे कोटी रुपयांचे कर्ज होते, ते फेडले आणि इतकेच नव्हे तर यामुळे मोठी विकासकामे करता आली नाही, असा अप्रत्यक्ष दावा राज ठाकरे यांनी केल्याने पालिका वर्तुळातील सारेच जण बुचकळ्यात पडले आहेत.
मनसेची सत्ता आली तेव्हा महापालिकेवर साडेसहाशे कोटी रुपयांचे कोणतेही कर्ज नव्हते. महापालिकेने आजवर सर्वाधिक शंभर कोटी रुपयांचे कर्ज काँग्रेसच्या शोभा बच्छाव महापौर असताना काढले होते. कर्जरोख्याच्या माध्यमातून काढलेले हे कर्ज शिवसेनेचे दशरथ पाटील महापौर असताना फेडण्यात आले होते. त्यानंतर पालिकेवर आजवर कोणतेही कर्ज नाही. (प्रतिनिधी)
----------
गेल्या दोन वर्षांत मनसेची सत्ता आल्यानंतर आधी दोनशे कोटी रुपयांचे कर्ज काढण्यास महापालिकेला राज्य शासनाने मान्यता दिली. त्यानंतर अलीकडेच आणखी दीडशे कोटी रुपयांचे कर्ज काढण्यास मान्यता दिली. त्यानुसार कर्ज काढण्याची कार्यवाही सुरू झाली आहे.
---------
तो स्पील ओव्हर होता...
राज ठाकरे यांनी उपस्थित केलेला मुद्दा स्पील ओव्हरचा असू शकेल. पालिकेत निधीचा विचार न करता नागरी कामे मंजूर केली जातात; परंतु निधीची अडचण आली की ही कामे कार्यवाहीत अडकतात. अंदाजपत्रकात त्याचे आर्थिक दायित्व दर्शविले जाते. त्यालाच स्पील ओव्हर म्हणतात. ही कामे केली असल्याचा दावा कदाचित मनसेचा असू शकेल; परंतु त्यात विशेष असे काहीच नसते. मनसेने दायित्व कमी केले याचाच अर्थ असा की, शिवसेना-भाजपाच्या गेल्या पंचवार्षिकमधील साडेसहाशे कोटी रुपयांची कामे मार्गी लागली आणि त्या बदल्यात मनसेने नवीन कामेच केली नाहीत असा होतो. त्यामुळे मनसेने काढलेला मुद्दा प्रचाराचा की अपप्रचाराचा, असा प्रश्न निर्माण होऊ शकतो.